शहरं
Join us  
Trending Stories
1
पार्थच्या व्यवहाराचे ४२ कोटी कोण भरणार? मुंढव्यातील वादग्रस्त व्यवहार आज रद्द होणार?
2
तीन शहरांत रेकी, विषही तयार; अतिरेक्यांचा मोठा कट उधळला, गुजरात एटीएसने पकडले ३ अतिरेकी
3
महाराष्ट्र्रात १३ हजार बोगस कंपन्यांना टाळे; जीएसटीविरोधीत मोहीम
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
6
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
7
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
8
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
9
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
10
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
11
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
12
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
13
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
14
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
15
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
16
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
17
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
18
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
19
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
20
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर

खाऊ च्या पैशांतून चिमुकल्यांची दुष्काळग्रस्त शेतक-यांना मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2016 01:51 IST

लक्ष्मीचंद विद्यालयाचा उपक्रम; नाम फाउंडेशनकडे रक्कम सुपूर्द.

साहेबराव राठोड/ मंगरुळपीर (जि. वाशिम) : शेतकर्‍यांची परिस्थिती पाहता, तालुक्यातील शेलूबाजार येथील लक्ष्मीचंद विद्यालयाच्या चिमुकल्यांनी जमा केलेले खाऊचे पैसे दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांना मदत म्हणून दिले. शाळेतर्फे होणार्‍या अन्य खर्चाला आळा घालून शाळा व विद्यार्थ्यांंची एकत्रित रकमेचा धनादेश नाम फाउंडेशनच्या बँक खात्यात जमा करण्यात आला. शेलूबाजार येथील सुरेशचंद्र कर्नावट हे नेहमीच गरजूंना मदत करतात. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली संस्थेच्या विद्यार्थ्यांंनीही दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी आपल्यापरीने मदतीचा हात पुढे केला आहे. लक्ष्मीचंद विद्यालयाच्या इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांंनी जमा केलेले १ हजार १५५ रुपये आणि शाळा व्यवस्थापनाने नवीन वर्ष साजरे करण्यासाठी येणार्‍या अवांतर खर्चाला फाटा दिला व ही रक्कम नाम फाउंडेशनच्या स्टेट बँकेतील खात्यात जमा करण्यात आले. दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांबाबत शिक्षकांनी विद्यार्थ्यांंना माहिती दिली. या सामाजिक कार्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या उद्देशाने विद्यार्थ्यांंनी खाऊची रक्कम जमा करून दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी हा उपक्रम राबविला. विद्यार्थ्यांंना मुख्याध्यापक भुसारी, पर्यवेक्षक राऊत तसेच वर्गशिक्षक विनोद मारुती सुर्वे यांचे मार्गदर्शन लाभले.