शहरं
Join us  
Trending Stories
1
उज्ज्वला थिटेंना झटका! राजन पाटलांच्या सुनबाईच अनगरच्या नगराध्यक्ष होणार, न्यायालयात नेमके काय घडले?
2
'ब्लॅक फ्रायडे' म्हणजे काळा शुक्रवार...! मग भरमसाठ डिस्काऊंट देऊन साजरा का करतात कंपन्या...? 
3
Travel : कोल्डड्रिंकपेक्षाही स्वस्त पेट्रोल, इतर गोष्टीही खिशाला परवडणाऱ्या; भारतीयांसाठी व्हिसा फ्री आहे 'हे' बेट!
4
दत्त जयंती २०२५: श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण कसे कराल? पाहा, नियम-योग्य पद्धत
5
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
6
बिहार काँग्रेसच्या पराभवाची फाईल दिल्लीत उघडणार; ६१ उमेदवार जिल्हावार अहवाल सादर करणार
7
भारताला २० वर्षांनी पुन्हा मान! शताब्दी 'राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा २०३०' चे यजमानपद या शहराच्या पारड्यात...
8
मोठी बातमी! २ कोटी लोकांचे आधार क्रमांक कायमचे बंद झाले; UIDAI ने सुरु केली मोहिम...
9
Cyclone Senyar: 'सेन्यार'ने वेग घेतला! दक्षिण आणि पूर्व किनाऱ्यावर ७२ तास राहणार मोठा धोका
10
Pune Crime: "तिच्या बेडरुममध्ये झोपवलं आणि..."; कोल्हापुरातील व्यक्तीसोबत पुण्यातील महिलेने काय काय केलं?
11
१० रुपयांपेक्षाही कमी किंमतीच्या शेअरची कमाल, झटक्यात २०% वाढला भाव; खरेदीसाठी गुंतवणूकदारांची झुंबड
12
सात जन्माच्या साथीदारानेच केली क्रूरता! पतीमुळे ४ वर्षांच्या चिमुकल्याची आई ९ महिने तडफडत राहिली.. 
13
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
14
सोनिया जी, राहुल जी आन् मी..., कर्नाटक सत्तासंघर्षावर खर्गेंचे मोठे सेंकत! पुढचे 48 तास महत्वाचे; "200% 'तेच' CM होणार"
15
कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय; रेअर अर्थ मॅग्नेट उत्पादनाला भारतात मोठी गती मिळणार
16
मायक्रोसॉफ्टचा बाजार उठणार की काय? गुगल कॉम्प्युटर, लॅपटॉपसाठी आणतेय ऑपरेटिंग सिस्टीम...
17
टीम इंडियाचा दबदबा संपत चाललाय, काही जण तर..; लाजिरवाण्या पराभवानंतर हर्षा भोगलेंनी सुनावलं
18
पंडित देशमुख खुनाचा मुद्दा २० वर्षांनंतर प्रचारात, मोहोळच्या देशमुखांसोबत काय घडलं होतं?
19
'थोडी वाट पाहा, फोन करतो', मुख्यमंत्री बदलाच्या चर्चेदरम्यान राहुल गांधींचा डीके शिवकुमार यांना मेसेज
20
एकनाथ शिंदे सत्ता मिळवून दिघे साहेबांचे स्वप्न साकारणार की गणेश नाईक पुन्हा दूर ठेवणार?
Daily Top 2Weekly Top 5

बागायतदारांना ‘कोरडवाहू’ची मदत!

By admin | Updated: January 22, 2015 02:05 IST

बागायतीच्या मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकरी बाद.

संतोष येलकर / अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये कोरडवाहू, बागायती व फळबाग शेतीसाठी मदत दिली जात आहे; मात्र बागायतदार शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या मदतीत खरीपपूर्वी कपाशीची लागवड करणार्‍या बागायतदार कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीची मदत दिली जात आहे. त्यामुळे बागायतदार शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या सरकारी मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्‍यांना बाद करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. त्यानुसार मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून जिल्हानिहाय मदत निधीचे वितरण करण्यात आले असून, मदतीची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. या मदतीमध्ये अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंंत आणि बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंंत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये जिरायती (कोरडवाहू) शेतीसाठी प्रतिहेक्टर ४ हजार ५00 रुपये, बागायती शेतीसाठी प्रतिहेक्टर ९ हजार रुपये आणि फळबागांसाठी प्रतिहेक्टर १२ हजार रुपये मदत दिली जात आहे. बागायतदार शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर ९ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप करण्यात येत असले तरी, मे महिन्यात मान्सूनपूर्व कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी पिकांची लागवड करणार्‍या बागायतदार शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीसाठी दिली जाणारी मदत वाटप केली जात आहे. बागायती शेतीप्रमाणेच मान्सूनपूर्व कपाशी तसेच सोयाबीन व तूर इत्यादी पिकांना विहिरी, बोअर व शेततळ्यातून पाणी देऊन पिकांना जगविले जाते. त्यानुसार सरकारकडून बागायतदार शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या मदतीप्रमाणेच कापूस, सोयाबीन व तूर इत्यादी बागायती पिकांसाठीही बागायतदार शेतकर्‍यांना हेक्टरी ९ हजार रुपये मदत मिळणे अपेक्षित असताना, या बागायतदार शेतकर्‍यांना मात्र कोरडवाहू शेतीसाठी दिली जाणारी हेक्टरी ४ हजार ५00 रुपयांप्रमाणे मदत दिली जात आहे. त्यामुळे बागायत पिकांसाठी देण्यात येणार्‍या मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्‍यांना बाद करण्यात आल्याची बाब समोर येत आहे.

 *बागायती पिकांचे निकष कोणते?

      बागायती पिकांप्रमाणेच मान्सूनपूर्व कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी पिकांची लागवड केली जाते. विहीर, बोअर, शेततळी व कॅनॉलमधील पाण्याचा वापर करून ही पिके घेतली जातात. इतर बागायती पिकांप्रमाणेच ही पिके घेतली जात असताना, बागायती शेतीसाठी दिली जाणारी मदत मात्र या पिकांसाठी दिली जात नाही. त्यामुळे बागायती पिकांचे निकष कोणते, असा प्रश्न दुष्काळग्रस्त कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.