शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

बागायतदारांना ‘कोरडवाहू’ची मदत!

By admin | Updated: January 22, 2015 02:05 IST

बागायतीच्या मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकरी बाद.

संतोष येलकर / अकोला: राज्यातील दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी सरकारकडून मदत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये कोरडवाहू, बागायती व फळबाग शेतीसाठी मदत दिली जात आहे; मात्र बागायतदार शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या मदतीत खरीपपूर्वी कपाशीची लागवड करणार्‍या बागायतदार कापूस उत्पादक शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीची मदत दिली जात आहे. त्यामुळे बागायतदार शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या सरकारी मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्‍यांना बाद करण्यात येत असल्याची बाब समोर येत आहे. यावर्षीच्या पावसाळ्यात अत्यल्प पाऊस झाल्याने विदर्भ आणि मराठवाड्यासह राज्यात खरीप हंगामातील पिके शेतकर्‍यांच्या हातून गेली. नापिकीमुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत शेतकरी हवालदिल झाला. या पृष्ठभूमीवर विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनादरम्यान दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारकडून सात हजार कोटींचे पॅकेज जाहीर करण्यात आले. त्यामध्ये दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांसाठी मदतही जाहीर करण्यात आली. त्यानुसार मदत वाटपाच्या पहिल्या टप्प्यात शासनाकडून जिल्हानिहाय मदत निधीचे वितरण करण्यात आले असून, मदतीची रक्कम शेतकर्‍यांच्या बँक खात्यात जमा करण्याचे काम प्रशासनामार्फत सुरू करण्यात आले आहे. या मदतीमध्ये अल्प व अत्यल्पभूधारक शेतकर्‍यांना दोन हेक्टर र्मयादेपर्यंंत आणि बहुभूधारक शेतकर्‍यांना एक हेक्टर र्मयादेपर्यंंत मदतीचे वाटप करण्यात येत आहे. त्यामध्ये जिरायती (कोरडवाहू) शेतीसाठी प्रतिहेक्टर ४ हजार ५00 रुपये, बागायती शेतीसाठी प्रतिहेक्टर ९ हजार रुपये आणि फळबागांसाठी प्रतिहेक्टर १२ हजार रुपये मदत दिली जात आहे. बागायतदार शेतकर्‍यांना प्रतिहेक्टर ९ हजार रुपयांप्रमाणे मदतीचे वाटप करण्यात येत असले तरी, मे महिन्यात मान्सूनपूर्व कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी पिकांची लागवड करणार्‍या बागायतदार शेतकर्‍यांना कोरडवाहू शेतीसाठी दिली जाणारी मदत वाटप केली जात आहे. बागायती शेतीप्रमाणेच मान्सूनपूर्व कपाशी तसेच सोयाबीन व तूर इत्यादी पिकांना विहिरी, बोअर व शेततळ्यातून पाणी देऊन पिकांना जगविले जाते. त्यानुसार सरकारकडून बागायतदार शेतकर्‍यांना दिल्या जाणार्‍या मदतीप्रमाणेच कापूस, सोयाबीन व तूर इत्यादी बागायती पिकांसाठीही बागायतदार शेतकर्‍यांना हेक्टरी ९ हजार रुपये मदत मिळणे अपेक्षित असताना, या बागायतदार शेतकर्‍यांना मात्र कोरडवाहू शेतीसाठी दिली जाणारी हेक्टरी ४ हजार ५00 रुपयांप्रमाणे मदत दिली जात आहे. त्यामुळे बागायत पिकांसाठी देण्यात येणार्‍या मदतीतून कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्‍यांना बाद करण्यात आल्याची बाब समोर येत आहे.

 *बागायती पिकांचे निकष कोणते?

      बागायती पिकांप्रमाणेच मान्सूनपूर्व कपाशी, सोयाबीन व तूर इत्यादी पिकांची लागवड केली जाते. विहीर, बोअर, शेततळी व कॅनॉलमधील पाण्याचा वापर करून ही पिके घेतली जातात. इतर बागायती पिकांप्रमाणेच ही पिके घेतली जात असताना, बागायती शेतीसाठी दिली जाणारी मदत मात्र या पिकांसाठी दिली जात नाही. त्यामुळे बागायती पिकांचे निकष कोणते, असा प्रश्न दुष्काळग्रस्त कापूस उत्पादक बागायतदार शेतकर्‍यांकडून उपस्थित केला जात आहे.