शहरं
Join us  
Trending Stories
1
"राजकारण बंद करेन, पण आता..."; काँग्रेसमध्ये प्रवेश करताच प्रशांत जगतापांनी मांडली भूमिका
2
पाकिस्तानला अजूनही 'ऑपरेशन सिंदूर'ची भीती! सीमेवर अँटी-ड्रोन सिस्टीम बसवले
3
ठाकरे-शिंदेंनी प्रयत्न केले, पण अखेर काँग्रेसमध्ये गेले; प्रशांत जगताप यांची राजकीय कारकीर्द
4
भाजपानं 'या' राज्यात इतिहास रचला, पहिल्यांदाच पक्षाचा महापौर बनला; विधानसभा निवडणुकीपूर्वी मोठा संकेत
5
"आम्हाला मुलांमध्ये अजिबात रस नाही"; २ मैत्रिणी एकमेकींच्या प्रेमात झाल्या वेड्या, बांधली लग्नगाठ
6
Swami Samartha: आपल्यावर सद्गुरू कृपा आहे की नाही हे ओळखण्याचा सोपा मार्ग जाणून घ्या
7
५२ आठवड्यांच्या उच्चांकी स्तरावर 'हा' शेअर; आज जोरदार तेजी, चांदीतील तेजी ठरतेय कारण
8
जयंत पाटील 'मातोश्री'वर उद्धव ठाकरेंच्या भेटीला; मुंबईत NCP शरद पवार गट ठाकरे बंधूंसोबत येणार?
9
"हॉस्पिटलनेच माझ्या पतीला मारलं, मला म्हणाले..."; पत्नीने सांगितली काळजात चर्र करणारी गोष्ट
10
महायुतीचा फॉर्म्युला ठरला, मुंबईत जागावाटपाचा तिढा सुटला; भाजपा-शिंदेसेना किती जागा लढणार?
11
२ देशांसोबत मिळून चीननं शेजारील देशात चढवला जोरदार हल्ला, ४५४ इमारती उद्ध्वस्त; शेकडो अटकेत
12
नोकरी गेली तरी आर्थिक चक्र थांबू नका! संकटकाळात EMI आणि SIP चे व्यवस्थापन कसे कराल? तज्ज्ञांचा सल्ला
13
मोहम्मद युनूस यांचा तो एक निर्णय, ज्यामुळे बांगलादेश आज हिंसाचाराच्या आगीत होरपळतोय...
14
कोणती सरकारी बँक देतेय सर्वात स्वस्त पर्सनल लोन? कोणत्याही बँकेतून कर्ज घेण्यापूर्वी पाहा डिटेल्स
15
UPSC यशानंतर IPS अधिकारी बनली पूर्वा चौधरी, सौंदर्यासोबतच वादामुळे चर्चेत, जाणून घ्या प्रकरण
16
कोकण रेल्वेची प्रवाशांना मोठी भेट; मुंबईतून सुटणाऱ्या ‘या’ ट्रेनचे कोच कायमस्वरुपी वाढले
17
सोनं विक्रमी उच्चांकावर, चांदी एका झटक्यात १३११७ रुपयांनी उसळली! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
काँग्रेसची १२५हून अधिक तिकिटे फायनल; प्रदेश निवड समितीच्या बैठकीत १५ मिनिटांत आटोपली चर्चा
19
"२१ कोटींची मागणी आणि...", अक्षय खन्नाची 'दृश्यम ३' सिनेमातून एक्झिट, अखेर खरं कारण समोर
20
MS Dhoni Pension: बीसीसीआय महेंद्रसिंह धोनीला किती पेन्शन देते? जाणून घ्या!
Daily Top 2Weekly Top 5

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव होत असताना पारधीतांडावासीयांना नरकयातना!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

या गावात गेल्या दोन वर्षांपासून वीज नाही. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी दीड किलोमीटर अंतरावरील टिटवा गावात जावे लागते. ...

या गावात गेल्या दोन वर्षांपासून वीज नाही. मोबाईल चार्जिंग करण्यासाठी दीड किलोमीटर अंतरावरील टिटवा गावात जावे लागते. पिण्याचे पाणीसुद्धा दीड किलोमीटर अंतरावरील एका विहिरीतून आणावे लागते. सुविधांचा अभाव असल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थ्यांनी शिक्षणसुद्धा सोडले आहे. या लहानशा तांड्यावर स्वातंत्र्यानंतरही विविध समस्या आहेत. येथील हा बहुगुलीत समाज नरकयातना भोगत असून, शासनाच्या विविध योजनेचा लाभसुद्धा मिळत नाही. लोकप्रतिनिधींचेसुद्धा लक्ष नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.

तुमचं गाव रेकॉर्डवर नाही!

गावात वीज पुरवठा मिळावा म्हणून ग्रामस्थांनी वारंवार चकरा मारल्या. परंतु, बार्शीटाकळी वीज कंपनीचे अधिकारी म्हणतात की, तुमचं गाव रेकॉर्डवर नाही. तांड्यावरील मोहन मधुकर पवार, एकनाथ जाधव, भारत राठोड, परशुराम चव्हाण हे ग्रामस्थ सांगतात की, गावात कधी ग्रामसेवक दिसला नाही. पिण्याचे पाणी दीड किमीवरील एका विहिरीतून आणावे लागते. सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.