शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

तेल्हारा तालुक्यात दमदार पाऊस; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST

तेल्हारा : पंधरा दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी विजांच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार आगमन केले. तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून, ...

तेल्हारा : पंधरा दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी विजांच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार आगमन केले. तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून, ढगाळ वातावरण कायम आहे. तालुक्यात अवघ्या काही दिवसांनंतर सोयाबीन सोंगणी सुरू होणार असून, कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन, मूग, उडिद, तूर ज्वारी या पिकांची पेरणी केली असून, जिवापार जपली आहेत. पीक घरात येण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना अचानक जोरदार पावसाची हजेरी लावल्याने अनेक पिके मातीमोल होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तालुक्यातील काही भागांत कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. दि. २२ सप्टेंबरला दमदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांची पडझड झाली आहे. कपाशीला लागलेल्या फुलपात्या गळून पडल्या असून, शेतात पाणीच पाणी साचले आहे. हवामान खात्याने अजूनही पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा ज्वारी, तूर पिकांनाही फटका बसला असून, रोगराई वाढण्याची शक्यता आहे. सततच्या संकटाने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

-------------------

सौंदाळा परिसरात पांढऱ्या सोन्याची मातीमोल भावात विक्री

सौंदाळा : परिसरात (पांढऱ्या सोन्याची) कापसाची आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी ६१०० रुपयांपासून ते १०,००१ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल खरेदी केली. मात्र, सद्य:स्थितीत कापसाची मातीमोल भावात विक्री होत असून, शेतकरी हतबल झाला आहे. परिसरात कापसाला प्रतिक्विंटल ३,५०० ते ५,५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत. सततच्या पावसाने कपाशीच्या बोंड्या काळ्या पडत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट होत आहे. पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होण्याची भीती आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

-------------------

कापसाचे पीक पाण्यामुळे खराब झाले आहे. कपाशीच्या बोंड्या कळ्या झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी कापसाचे भाव ८००० रुपये होते. यावर्षी मुहूर्तावर दहा हजारावर भाव मिळाला, मात्र, आता मातीमोल भावात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याचे चित्र आहे.

- गणेश गोतमारे, शेतकरी.