शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये उलटफेर! शेख हसीना यांना विरोध करणारा पक्ष फुटला,जमातमध्ये आश्रय घेतला
2
प्रशासनाचा गलथान कारभार! निवडणूक एका ठिकाणी, अधिकाऱ्यांनी प्रक्रिया केली दुसरीकडे; उमेदवाराच्या विजयानंतर शासनाला आली जाग
3
TATA Steel विरोधात खटला दाखल; १४८ अब्ज रुपयांच्या नुकसान भरपाईची मागणी, प्रकरण काय?
4
जिममध्ये जाणाऱ्यांनो सावधान! १९ वर्षीय विद्यार्थ्याचा प्रोटीन शेक प्यायल्याने मृत्यू; नेमकं काय घडलं?
5
IT Manager Gang Rape: हॉटेलमध्ये आले, दीड वाजेपर्यंत पार्टी आणि गुप्तांगावर जखमा; मॅनेजर सामूहिक बलात्कार प्रकरणाची Inside Story
6
Ashes मध्ये तुफान राडा! जो रूटने मार्नस लाबुशेनचा कॅच घेण्यावरून मैदानात गोंधळ, पाहा VIDEO
7
क्रूरतेचा कळस! जावई झाला हैवान; सासू-सासरे आणि बायकोवर तलवारीने केले सपासप वार
8
एकावर मिळणार ४ बोनस शेअर्स; रेकॉर्ड डेट २०२६ च्या पहिल्या आठवड्यात, वर्षभरात 'या' शेअरनं केलाय पैसा दुप्पट
9
VIDEO: डिटर्जंट, युरिया अन् रिफाईंड तेल; अंधेरीत नामांकित ब्रँड्सच्या पिशव्यांमध्ये भरलं भेसळयुक्त दूध, घरात सुरु होतं रॅकेट
10
"फक्त बांगलादेशातच नाही, तर बंगालमध्येही हिंदू सुरक्षित नाहीत"; भाजपाचा ममता बॅनर्जींवर गंभीर आरोप
11
दोन वर्षांत २९००० डॉक्टर, अभियंते, अकाउंटंट्सनी पाकिस्तान सोडले, जगभरात आसिम मुनीर यांची नामुष्की
12
PMC Elections : दोन्ही राष्ट्रवादीची चर्चा फिस्कटली;शरद पवार गटाची काँग्रेस, उद्ववसेनेशी चर्चा सुरू
13
बॉक्सिंग डे कसोटीतील विजयासह इंग्लंडनं साधला मोठा डाव; ऑस्ट्रेलियाला धक्का देत टीम इंडियाशी बरोबरी
14
प्रेयसीच्या नादात हिमांशू भारद्वाजने आधी विकली स्वतःची किडनी, नंतर रॅकेटमध्ये झाला सामील
15
४० किलो स्फोटकांचा वापर आणि २०२३ पासून सुरू होती तयारी; लाल किल्ला स्फोट प्रकरणात खळबळजनक खुलासा!
16
Truecaller चा खेळ संपणार? TRAI च्या एका निर्णयामुळे २५ कोटी भारतीयांच्या फोनमधून 'हे' ॲप गायब होण्याची शक्यता!
17
शाकंभरी नवरात्र २०२५: पौषात रविवारपासून सुरु होतोय शाकंभरी नवरात्रोत्सव; काय आहे महत्त्व आणि कुलाचार?
18
महापालिका निवडणूक : "...तर ताकद दाखवावी लागेल", अमोल मिटकरींचा भाजपाला इशारा, जागांवरून काय फिस्कटले?
19
"यश त्याच्या डोक्यात गेलं आहे"; 'दृश्यम ३'च्या निर्मात्यांची अक्षय खन्नावर सडकून टीका, कायदेशीर नोटीस पाठवणार
20
एलपीजी ते बँकिंग आणि पॅन-आधार, १ जानेवारी २०२६ पासून काय काय बदलणार? थेट खिशावर होणार परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा तालुक्यात दमदार पाऊस; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST

तेल्हारा : पंधरा दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी विजांच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार आगमन केले. तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून, ...

तेल्हारा : पंधरा दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी विजांच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार आगमन केले. तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून, ढगाळ वातावरण कायम आहे. तालुक्यात अवघ्या काही दिवसांनंतर सोयाबीन सोंगणी सुरू होणार असून, कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन, मूग, उडिद, तूर ज्वारी या पिकांची पेरणी केली असून, जिवापार जपली आहेत. पीक घरात येण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना अचानक जोरदार पावसाची हजेरी लावल्याने अनेक पिके मातीमोल होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तालुक्यातील काही भागांत कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. दि. २२ सप्टेंबरला दमदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांची पडझड झाली आहे. कपाशीला लागलेल्या फुलपात्या गळून पडल्या असून, शेतात पाणीच पाणी साचले आहे. हवामान खात्याने अजूनही पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा ज्वारी, तूर पिकांनाही फटका बसला असून, रोगराई वाढण्याची शक्यता आहे. सततच्या संकटाने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

-------------------

सौंदाळा परिसरात पांढऱ्या सोन्याची मातीमोल भावात विक्री

सौंदाळा : परिसरात (पांढऱ्या सोन्याची) कापसाची आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी ६१०० रुपयांपासून ते १०,००१ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल खरेदी केली. मात्र, सद्य:स्थितीत कापसाची मातीमोल भावात विक्री होत असून, शेतकरी हतबल झाला आहे. परिसरात कापसाला प्रतिक्विंटल ३,५०० ते ५,५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत. सततच्या पावसाने कपाशीच्या बोंड्या काळ्या पडत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट होत आहे. पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होण्याची भीती आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

-------------------

कापसाचे पीक पाण्यामुळे खराब झाले आहे. कपाशीच्या बोंड्या कळ्या झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी कापसाचे भाव ८००० रुपये होते. यावर्षी मुहूर्तावर दहा हजारावर भाव मिळाला, मात्र, आता मातीमोल भावात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याचे चित्र आहे.

- गणेश गोतमारे, शेतकरी.