शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
2
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
3
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
4
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
5
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
6
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
7
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
8
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
9
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
10
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
11
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
12
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

तेल्हारा तालुक्यात दमदार पाऊस; शेतकरी संकटात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:22 IST

तेल्हारा : पंधरा दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी विजांच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार आगमन केले. तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून, ...

तेल्हारा : पंधरा दिवस उसंत घेतलेल्या पावसाने मंगळवारी विजांच्या कडकडाटासह तालुक्यात जोरदार आगमन केले. तालुक्यात मुसळधार पाऊस झाला असून, ढगाळ वातावरण कायम आहे. तालुक्यात अवघ्या काही दिवसांनंतर सोयाबीन सोंगणी सुरू होणार असून, कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. पावसामुळे शेतकऱ्यांच्या तोंडी आलेला घास वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

शेतकऱ्यांनी खरीप हंगामात कपाशी, सोयाबीन, मूग, उडिद, तूर ज्वारी या पिकांची पेरणी केली असून, जिवापार जपली आहेत. पीक घरात येण्यासाठी काही दिवस शिल्लक असताना अचानक जोरदार पावसाची हजेरी लावल्याने अनेक पिके मातीमोल होण्याच्या मार्गावर असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे. तालुक्यातील काही भागांत कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे. दि. २२ सप्टेंबरला दमदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पिकांची पडझड झाली आहे. कपाशीला लागलेल्या फुलपात्या गळून पडल्या असून, शेतात पाणीच पाणी साचले आहे. हवामान खात्याने अजूनही पावसाचा अंदाज वर्तविल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसाचा ज्वारी, तूर पिकांनाही फटका बसला असून, रोगराई वाढण्याची शक्यता आहे. सततच्या संकटाने शेतकरी हतबल झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

-------------------

सौंदाळा परिसरात पांढऱ्या सोन्याची मातीमोल भावात विक्री

सौंदाळा : परिसरात (पांढऱ्या सोन्याची) कापसाची आवक सुरू झाली आहे. सुरुवातीला व्यापाऱ्यांनी ६१०० रुपयांपासून ते १०,००१ रुपयांपर्यंत प्रतिक्विंटल खरेदी केली. मात्र, सद्य:स्थितीत कापसाची मातीमोल भावात विक्री होत असून, शेतकरी हतबल झाला आहे. परिसरात कापसाला प्रतिक्विंटल ३,५०० ते ५,५०० रुपयांपर्यंत भाव मिळत आहेत. सततच्या पावसाने कपाशीच्या बोंड्या काळ्या पडत असून, शेतकऱ्यांच्या उत्पादनात कमालीची घट होत आहे. पावसामुळे सोयाबीनचे नुकसान होण्याची भीती आहे. शेतकरी आर्थिक अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.

-------------------

कापसाचे पीक पाण्यामुळे खराब झाले आहे. कपाशीच्या बोंड्या कळ्या झाल्या आहेत. दोन महिन्यांपूर्वी कापसाचे भाव ८००० रुपये होते. यावर्षी मुहूर्तावर दहा हजारावर भाव मिळाला, मात्र, आता मातीमोल भावात विक्री करावी लागत आहे. त्यामुळे लागवडीचा खर्च वसूल होत नसल्याचे चित्र आहे.

- गणेश गोतमारे, शेतकरी.