शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
2
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
3
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
4
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
5
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल तीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
8
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
9
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
10
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
11
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
12
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
13
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
14
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
15
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
16
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी'मध्ये सलमान खानची एन्ट्री, 'या' भूमिकेत दिसणार भाईजान
18
Monorail Accident: ट्रॅक सोडला, मधोमध अडकली! मोनोरेलचा वडाळ्याजवळ अपघात, ट्रायल रनवेळी घडली घटना
19
Shocking! संतापलेल्या पतीने पत्नीचे नाक कापले, ब्लेडने बोटांवरही वार केले; त्यानंतर जे घडलं...
20
'आम्हालाही दिलासा द्या..,' Vi ला मिळालेल्या दिलास्यानंतर Airtel नं का म्हटलं असं? सरकारकडे जाणार कंपनी

जिल्ह्यात धो-धो पाऊस; खरीप धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

अकोला : गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गत दोन महिन्यांमध्ये ...

अकोला : गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गत दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात दोनवेळा अतिवृष्टी झाली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामातील पिके पिवळी पडत असून, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. लागवडीवर केलेला खर्च वसूल होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने दाणादाण करीत तोंडी आलेला घास हिरावला होता. यंदाही तसेच चित्र असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

यंदा खरीप हंगामात समाधानकारक उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना होती; मात्र पावसाळा सुरू होण्यास विलंब झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात मूग व उडदाचे पीक घेता आले नाही. ज्या भागात मूग, उडदाची पेरणी झाली. त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविल्याच्या घटना घडल्या आहेत. जुलै महिन्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हापासून सतत ढगाळ वातावरण आणि कधी रिमझिम, तर कधी जोरदार पाऊस पडत असल्याने कपाशी, तूर व सोयाबीन आदी पिके पिवळी पडत आहेत.

-----------------------

शेतीच्या आंतरमशागतीची कामे खोळंबली

सततच्या पावसामुळे पिकांमध्ये तण वाढले असून, निंदणी, वखरणी, कोळपणी आदी आंतरमशागतीची कामे थांबली आहेत. तण वाढत असल्याने, पिके धोक्यात आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे कापूस, तूर व सोयाबीन या पिकांवर रोगराई पसरली आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे गळून पडली, तर काही भागात बोंडसळ झाली आहे. तसेच सोयाबीन शेंगा गळत असल्याचे चित्र आहे.

--------------------------

तोंडी आलेला घास हिरावण्याची भीती

सद्यस्थितीत सोयाबीन पीक बहरले असून, भाव चांगला असल्याने शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न होण्याची आशा होती; मात्र अतिपावसाने तोंडी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. तसेच तेल्हारा, बाळापूर तालुक्यात कपाशी वेचणीला आली असून, पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

-----------------------------

सतत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. पिकांवर मावा, बोंडअळी, पांढरी माशी या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांमध्ये तण वाढले असून, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- सुनील घोगरे, शेतकरी, टाकळी खुरेशी.