शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

जिल्ह्यात धो-धो पाऊस; खरीप धोक्यात!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 25, 2021 04:19 IST

अकोला : गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गत दोन महिन्यांमध्ये ...

अकोला : गेल्या तीन दिवसांपासून सतत ढगाळ वातावरण आणि पाऊस सुरू असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गत दोन महिन्यांमध्ये जिल्ह्यात दोनवेळा अतिवृष्टी झाली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सद्यस्थितीत खरीप हंगामातील पिके पिवळी पडत असून, कपाशीचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. लागवडीवर केलेला खर्च वसूल होणार की नाही, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. गतवर्षी परतीच्या पावसाने दाणादाण करीत तोंडी आलेला घास हिरावला होता. यंदाही तसेच चित्र असल्याने शेतकरी धास्तावला आहे.

यंदा खरीप हंगामात समाधानकारक उत्पादन होण्याची आशा शेतकऱ्यांना होती; मात्र पावसाळा सुरू होण्यास विलंब झाल्याने जिल्ह्यातील बहुतांश भागात मूग व उडदाचे पीक घेता आले नाही. ज्या भागात मूग, उडदाची पेरणी झाली. त्या भागातील अनेक शेतकऱ्यांनी अज्ञात रोगाचा प्रादुर्भाव झाल्याने उभ्या पिकावर ट्रॅक्टर फिरविल्याच्या घटना घडल्या आहेत. जुलै महिन्यात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तेव्हापासून सतत ढगाळ वातावरण आणि कधी रिमझिम, तर कधी जोरदार पाऊस पडत असल्याने कपाशी, तूर व सोयाबीन आदी पिके पिवळी पडत आहेत.

-----------------------

शेतीच्या आंतरमशागतीची कामे खोळंबली

सततच्या पावसामुळे पिकांमध्ये तण वाढले असून, निंदणी, वखरणी, कोळपणी आदी आंतरमशागतीची कामे थांबली आहेत. तण वाढत असल्याने, पिके धोक्यात आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे कापूस, तूर व सोयाबीन या पिकांवर रोगराई पसरली आहे. पावसामुळे कपाशीची बोंडे गळून पडली, तर काही भागात बोंडसळ झाली आहे. तसेच सोयाबीन शेंगा गळत असल्याचे चित्र आहे.

--------------------------

तोंडी आलेला घास हिरावण्याची भीती

सद्यस्थितीत सोयाबीन पीक बहरले असून, भाव चांगला असल्याने शेतकऱ्यांना भरघोस उत्पन्न होण्याची आशा होती; मात्र अतिपावसाने तोंडी आलेला घास हिरावण्याची भीती शेतकऱ्यांमध्ये आहे. तसेच तेल्हारा, बाळापूर तालुक्यात कपाशी वेचणीला आली असून, पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.

-----------------------------

सतत ढगाळ वातावरण आणि पावसामुळे पिके पिवळी पडत आहेत. पिकांवर मावा, बोंडअळी, पांढरी माशी या कीड व रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पिकांमध्ये तण वाढले असून, सोयाबीनचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

- सुनील घोगरे, शेतकरी, टाकळी खुरेशी.