शहरं
Join us  
Trending Stories
1
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
2
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
3
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
4
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
5
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
6
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
7
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
8
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
9
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
10
'मनसेसोबत युती केली तरच फायदा होईल'; उद्धव ठाकरेंच्या बैठकीत राज ठाकरेंसोबत जाण्याचा 'सूर'
11
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
12
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!
13
'आमच्यावर युद्ध लादले; आत्मसमर्पण करणार नाही', खमेनी यांचा इस्रायसह अमेरिकेलाही थेट इशारा
14
राजा रघुवंशी नव्हे, 'या' व्यक्तीशी होणार होतं सोनमचं लग्न, २५ गुणही जुळलेले! मग का मोडलं नातं? 
15
जिद्दीला सॅल्यूट! २३ वेळा अपयश पण मानली नाही हार; शेतकऱ्याचा लेक झाला असिस्टंट कमांडंट
16
आमच्या कार चालवायचे थांबवा! सिट्रोएनने C3 साठी युरोपमध्ये जारी केला इशारा
17
भाजपा सरकारच्या ‘या’ निर्णयाचे जयंत पाटलांनी केले स्वागत; गडकरींचा उल्लेख करत म्हणाले...
18
कुंडलीतच पतीच्या हत्येचा योग...! राजापूर्वी दुसऱ्याच मुलासोबत ठरलं होतं सोनमचं लग्न, पंडितजींनी वाचवलं
19
Ashadhi Ekadashi 2025: विठ्ठल नामोच्चारात हृदयविकार टाळण्याची ताकद? वैद्यकीय संशोधन सांगते...
20
उत्पन्न वाढलं, महागाईही नियंत्रणात पण खिशात पैसेच शिल्लक राहत नाहीत; बचत झाली कमी, कर्ज वाढली

सांगळूद परिसरात पावसाची जोरदार हजेरी

By रवी दामोदर | Updated: September 27, 2022 17:50 IST

ग्रामस्थांची काही दिवसांपासून होत असलेल्या उकाड्यापासून सुटका

अकोला: गत चार-पाच दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने शेतशिवारात मशागतीच्या कामांना वेग आला आहे. मात्र काही दिवसांपासून सुरू असलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. दरम्यान, मंगळवारी दुपारच्या सुमारास अकोला तालुक्यातील सांगळूद परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. अचानक आलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली होती. दुसरीकडे, नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे.

मंगळपारी सकाळपासूनच पावसाचे वातारवण नसल्याने शेतशिवार मशागतीच्या कामांनी फूलून गेले होते. मात्र दुपारच्या सुमारास अचानक पावसाने जोरदार हजेरी लावली. त्यामुळे शेतात असलेल्या शेतमजुरांसह शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. पावसामुळे बळीराजासह नागरिकांना दिलासा मिळाला आहे. सांगळूद परिसरात पुरेसा पाऊस पडल्याने मशागतीची कामे थांबली होती.

थांबलेला पाऊस सक्रीय होणार का?

सध्या शेतात सोयाबीन, कपाशी व तूरीचे पीक बहरलेले आहे. काही भागात कापूस वेचणीला सुरुवात झाली आहे, तर काही भागात सोयाबीन सोंगणी सुरू आहे. दरम्यान, पावसाने अचानक हजेरी लावल्याने शेतकऱ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. ऐन सोंगणी व वेचणीच्या वेळी पाऊस सक्रीय होणार की काय, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे.

टॅग्स :Akolaअकोला