शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी ; रखडलेल्या पेरण्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

----------------------------------- वणी रंभापूर, बोरगाव मंजू जोरदार पाऊस ; शेतकरी सुखावला ! वणी रंभापूर : वातावरणात झालेल्या बदलाचा फटका शेतकऱ्यांना ...

-----------------------------------

वणी रंभापूर, बोरगाव मंजू जोरदार पाऊस ; शेतकरी सुखावला !

वणी रंभापूर : वातावरणात झालेल्या बदलाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ; मात्र यंदा पावसाने दडी दिल्याने खरीप हंगामातील पिके करपल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. बुधवारी पावसाने परिसरात जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली असून, रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. गत दोन-तीन दिवसांपासून पावसाचे आगमन होत असल्याने शेतकरी सुखावला आहे.

यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभी वणी रंभापूर, बोरगाव मंजू परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. त्यानंतर गत पंधरा ते वीस दिवस पावसाने दडी दिल्याने अंकुरलेली पिके सुकण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. गत दोन-तीन दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. तसेच रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे.

----------------------------------

पिंपळखुटा परिसरात पिकांना जीवनदान !

पिंपळखुटा : जून महिन्यात मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरातील चान्नी, उमरा, राहेर, अडगाव, चांगेफळ, शिरपूर, वाहाळा बु. परिसरात शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. परीसरात शंभर टक्के पेरणी आटोपल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडले होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. ते शेतकरी पिके वाचविण्यासाठी धावपळ सुरू होती. पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. दि. १० जुलै रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. सध्या शेतकरी डवरणीच्या कामात व्यस्त आहेत.

----------------------------------------

मुंडगाव, लोहारी परिसरात पेरण्यांना वेग

मुंडगाव: मुंडगाव, लोहारी परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. परिसरामध्ये शुक्रवारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. परिसरातील शेतकरी खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तूर, कपाशीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. परिसरात यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी यंदा मूग, उडिदाच्या पिकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

--------------------------------

अकोला : शहरानजीक असलेल्या खरप परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने नाल्यांना पूर आला होता. दरम्यान, नाल्याकाठच्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

--------------------------------