शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

जिल्ह्यात पावसाची जोरदार हजेरी ; रखडलेल्या पेरण्यांना वेग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:14 IST

----------------------------------- वणी रंभापूर, बोरगाव मंजू जोरदार पाऊस ; शेतकरी सुखावला ! वणी रंभापूर : वातावरणात झालेल्या बदलाचा फटका शेतकऱ्यांना ...

-----------------------------------

वणी रंभापूर, बोरगाव मंजू जोरदार पाऊस ; शेतकरी सुखावला !

वणी रंभापूर : वातावरणात झालेल्या बदलाचा फटका शेतकऱ्यांना सहन करावा लागत आहे. गतवर्षी अतिवृष्टी झाल्याने खरीप हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते ; मात्र यंदा पावसाने दडी दिल्याने खरीप हंगामातील पिके करपल्याने शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावले आहे. बुधवारी पावसाने परिसरात जोरदार हजेरी लावल्याने खरीप हंगामातील पिकांना संजीवनी मिळाली असून, रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. गत दोन-तीन दिवसांपासून पावसाचे आगमन होत असल्याने शेतकरी सुखावला आहे.

यंदा मृग नक्षत्राच्या प्रारंभी वणी रंभापूर, बोरगाव मंजू परिसरात चांगला पाऊस झाल्याने शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. त्यानंतर गत पंधरा ते वीस दिवस पावसाने दडी दिल्याने अंकुरलेली पिके सुकण्याच्या मार्गावर होते. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती. गत दोन-तीन दिवसांपासून परिसरात जोरदार पाऊस झाल्याने पिकांना संजीवनी मिळाली आहे. तसेच रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे.

----------------------------------

पिंपळखुटा परिसरात पिकांना जीवनदान !

पिंपळखुटा : जून महिन्यात मृग नक्षत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने परिसरातील चान्नी, उमरा, राहेर, अडगाव, चांगेफळ, शिरपूर, वाहाळा बु. परिसरात शेतकऱ्यांनी पेरणी आटोपली होती. परीसरात शंभर टक्के पेरणी आटोपल्याने शेतकऱ्यांना पावसाची प्रतीक्षा होती. त्यानंतर पावसाने दडी मारल्याने पिके संकटात सापडले होते. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची व्यवस्था आहे. ते शेतकरी पिके वाचविण्यासाठी धावपळ सुरू होती. पिके सुकण्याच्या मार्गावर असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. दि. १० जुलै रोजी पावसाने दमदार हजेरी लावल्याने पिकांना जीवनदान मिळाले आहे. सध्या शेतकरी डवरणीच्या कामात व्यस्त आहेत.

----------------------------------------

मुंडगाव, लोहारी परिसरात पेरण्यांना वेग

मुंडगाव: मुंडगाव, लोहारी परिसरात पावसाने दडी मारल्यामुळे पेरण्या सुरू झाल्या नव्हत्या. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले होते. परिसरामध्ये शुक्रवारपासून पावसाने दमदार हजेरी लावल्याने रखडलेल्या पेरण्यांना वेग आला आहे. परिसरातील शेतकरी खरीप हंगामामध्ये सोयाबीन, तूर, कपाशीची मोठ्या प्रमाणात पेरणी करतात. परिसरात यंदा सोयाबीनचा पेरा वाढण्याची शक्यता आहे. शेतकऱ्यांनी यंदा मूग, उडिदाच्या पिकाकडे पाठ फिरविल्याचे चित्र दिसून येत आहे.

--------------------------------

अकोला : शहरानजीक असलेल्या खरप परिसरात बुधवारी पहाटेच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. विजांच्या कडकडाटासह पावसाने हजेरी लावल्याने नाल्यांना पूर आला होता. दरम्यान, नाल्याकाठच्या शेतात पावसाचे पाणी साचल्याने तलावाचे स्वरूप प्राप्त झाले होते. त्यामुळे खरीप हंगामातील पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने शेतकरी चिंतेत आहे.

--------------------------------