शहरं
Join us  
Trending Stories
1
युएन महासभेत गाझाचा मुद्दा; ट्रम्प यांनी मुनीर आणि शरीफ यांच्या पाठिंब्याचा केला खुलासा!
2
वांगचूक यांना सोडा; तरच लडाखबाबत केंद्राशी चर्चा करू! एलएबीच्या भूमिकेला केडीएचा ठाम पाठिंबा
3
४.५ लाख महिला अत्याचाराच्या बळी! देशात महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण वाढले, महाराष्ट्र दुसऱ्या स्थानी
4
गाझात युद्ध थांबविण्यासाठी ट्रम्प यांची २० कलमी योजना इस्रायलला मान्य!
5
बिहारमध्ये एकूण ७.४२ कोटी मतदार; एसआयआरपूर्वीपेक्षा ४७ लाख कमी
6
यंदाचा मान्सून ठरला 'घातक'; अतिवृष्टी, पूरामुळे देशात १,५२८ जणांचा गेला बळी! 
7
यशस्वी खेळाडू होण्यासाठी स्वत:प्रती प्रामाणिक राहा; व्हीव्हीएस लक्ष्मण यांचा नवोदित खेळाडूंना सल्ला
8
किशोरवयीन मुलांमध्ये जाणवते 'व्हिटॅमिन डी'ची कमतरता; अनेक गंभीर आजारांचा वाढतोय धोका
9
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
10
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
11
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
12
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
13
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
14
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
15
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
16
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
17
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
18
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
19
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
20
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 

कस्तुरबा गांधी रुग्णालयात आरोग्य तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 22, 2021 04:17 IST

शहरात दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट अकोला: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कडक निर्बंध लागू केले ...

शहरात दुपारी रस्त्यांवर शुकशुकाट

अकोला: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी कडक निर्बंध लागू केले आहेत. सकाळी अकरा वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्याची परवानगी आहे. त्यानंतर दुपारी शहरातील सर्व रस्त्यांवर शुकशुकाट दिसून येतो. उन्हाच्या तीव्रतेमुळेही नागरिक घराबाहेर पडण्याचे टाळत आहेत.

साहित्य खरेदीसाठी नागरिकांची झुंबड

अकोला: कोरोना विषाणूच्या संसर्गाला आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनाने कड़क निर्बंध लागू केले आहेत. नागरिकांची गैरसोय होणार नाही, ही बाब लक्षात घेता जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे. या दरम्यानच्या काळात वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होताना दिसत आहे. यावेळी कोरोनाच्या नियमांचे पालन केले जात नसल्यामुळे कोरोनाच्या प्रसाराची शक्यता बळावली आहे.

पूर्व व दक्षिण झोनमध्ये सर्वे

अकोला: शहरात फेब्रुवारी महिन्यापासून कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढल्याचे समोर आले आहे. यातही प्रामुख्याने पूर्व व दक्षिण झोनमध्ये कोरोनाचा मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला आहे. याठिकाणी कोरोना बाधितांची आढळून येणारी संख्या लक्षात घेता प्रशासनाने या दोन्ही झोनमध्ये सर्वे करण्यासाठी शिक्षकांची नियुक्ती केली आहे. मागील काही दिवसांपासून शिक्षक व आशा वर्कर यांच्या वतीने या दोन्ही झोनमध्ये नागरिकांचा आरोग्य सर्वे केला जात आहे.

बाजारपेठेत वाहतुकीची कोंडी

अकोला: कोरोना विषाणूच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाने सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत नागरिकांना जीवनावश्यक वस्तूंची खरेदी करण्यासाठी परवानगी दिली आहे. यादरम्यान, शहरातील जुना भाजी बाजार, मोहम्मद अली रोड, टिळक रोड तसेच खुले नाट्यगृह ते फतेह अली चौकापर्यंत साहित्य खरेदीसाठी जमलेल्या नागरिकांमुळे वाहतुकीची मोठ्या प्रमाणात कोंडी झाली होती. यावेळी पोलिसांनी वाहतुकीची कोंडी सोडवली.

विद्युत पुरवठा सुरळीत होईना!

अकोला: शहरात 18 मे रोजी रात्री अचानक आलेल्या चक्रीवादळामुळे मोठ मोठे वृक्ष उन्मळून पडले. यामध्ये विद्युत खांब वाकले तसेच अनेक ठिकाणच्या विद्युत तारा तुटल्यामुळे शहराच्या विविध भागात अंधार पसरला होता. दरम्यान, या नैसर्गिक आपत्तीचा सामना करताना महावितरण कंपनीचे कर्मचारी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही भागात अद्यापही विद्युत पुरवठा खंडित असल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.