शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
2
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
3
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
4
पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
5
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
6
मित्रपक्षांना चर्चेत गुंतवत स्वबळाचाच डाव टाकण्याची भाजपाची खेळी?; इच्छुकही करतायेत 'डबल गेम'
7
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
8
एस एस राजामौलींच्या 'वाराणसी'चं बजेट १३०० कोटी? प्रियंका चोप्रा म्हणाली, "अर्धे पैसे माझ्या..."
9
शरीफ उस्मान हादी यांचा मारेकरी देश सोडून पळाला? बांगलादेश पोलिसांनी सत्य परिस्थिती केली स्पष्ट
10
Stock Markets Today: शेअर बाजारात जोरदार तेजी, सेन्सेक्स ३४० अकांनी तर निफ्टी ११५ अंकांनी वधारला; IT Stocks सुस्साट
11
देशभक्तीला बॉक्स ऑफिसवरील यशाचा फॉर्म्युला समजणं हा अपमान..., विकी कौशलची स्पष्ट प्रतिक्रिया
12
भाजपाच्या नजरेने RSS कडे पाहणे चुकीचे; सरसंघचालक मोहन भागवत यांनी असं विधान का केले?
13
Post Office मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹८९,९९० चं फिक्स व्याज, पैसेही सुरक्षित आणि मिळणार सरकारची गॅरेंटी
14
काँग्रेस-शरद पवारांसोबत आघाडी करून शिंदेसेनेने २ नगरपरिषदेत भाजपाच्या तोंडचा घास हिसकावला
15
'धुरंधर'च्या 'शरारत' गाण्यातून तमन्ना भाटियाला दिग्दर्शकाने दाखवला बाहेरचा रस्ता, म्हणाला- "मला सिनेमात आयटम साँग..."
16
'बांगलादेशातील अराजकतेला युनूस जबाबदार, भारतासोबतचे संबंधही बिघडवले'; शेख हसीना यांचा जोरदार हल्लाबोल
17
नांदेडमधील लोह्यात एकाच कुटुंबातील सहाही उमेदवारांचा पराभव, ‘घराणेशाही संपवू’ म्हणणाऱ्या भाजपचा धुव्वा
18
आणखी एक मुस्कान! मेरठच्या 'सौरभ' हत्याकांडासारखा प्लॅन बनवला; पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीचे केले तुकडे
19
वंचित बहुजन आघाडी दुर्लक्षित राहिली, पण एक नगराध्यक्ष पदासह या ठिकाणांवर मारलीय बाजी
20
नगराध्यक्ष एकाचा, बहुमत दुसऱ्याचे! जनतेतून निवडीमुळे नगर परिषदांत 'पॉवर गेम' रंगणार; ५ वर्षे संघर्षाची ठिणगी?
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंसेवी संस्थांचा आखडता हात

By admin | Updated: July 13, 2014 21:36 IST

सौंदर्यीकरणासाठी ‘ग्रीन अकोला, क्लीन अकोला’ संकल्पना सादर केली.

अकोला : मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी शहराच्या सौंदर्यीकरणासाठी 'ग्रीन अकोला, क्लीन अकोला' संकल्पना सादर केली. मध्यंतरी काही स्वयंसेवी संस्थांनी बैठकीत वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचा संकल्पदेखील केला. मनपाकडे २३ हजार वृक्ष पडून असताना, लागवडीसाठी अनेकांनी आखडता हात घेतला. त्यामुळे 'ग्रीन अकोला' संकल्पनेला तडा जाण्याची शक्यता असल्याने अकोलेकरांनी समोर येण्याची गरज आहे. र्मयादित भौगोलिक क्षेत्रफळ व निर्माणाधीन इमारतींच्या बांधकामाचा परिणाम वृक्षांवर होत आहे. शहरातील सार्वजनिक जागा तसेच लेआऊटमधील खुल्या जागांवर अनधिकृत बांधकाम होत असल्याने मोठय़ा प्रमाणात वृक्षतोड सुरू आहे. संपूर्ण शहरातील सांडपाणी थेट मोर्णा नदीच्या पात्रात सोडले जात असल्याने जल प्रदूषणासह पर्यावरणाला धोका निर्माण झाला. जळगाव,अमरावती व नागपूर शहराच्या सौंदर्यीकरणात वृक्ष लागवडीमुळे भर पडली आहे. शिवाय हवेच्या प्रदूषणाला काही अंशी आळा बसला आहे. त्याच धर्तीवर मनपा आयुक्त डॉ.कल्याणकर यांनी ह्यग्रीन अकोला क्लीन अकोलाह्ण संकल्पना अकोलेकरांसमोर ठेवली. शहर विकासाची दूरदृष्टी ठेवणार्‍या अधिकार्‍यांना अकोलेकरांच्या भक्कम पाठबळाची आवश्यकता आहे. मध्यंतरी अनेक स्वयंसेवी संस्थांनी शहराच्या विकासात ह्यखारीह्णचा वाटा उचलण्याची हमी देत, वृक्ष लागवडीसाठी पुढाकार घेतला. प्रशासनाने एक लाख वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठेवले असून, तूर्तास २३ हजार वृक्ष जमा झाले आहेत. अनेक दानशूर व्यक्तींनी नाव गोपनीय ठेवण्याच्या अटीवर निस्वार्थ भावनेने वृक्ष दिल्याची माहिती आहे; परंतु वृक्ष लागवडीसाठी मनपाकडे तेवढय़ा प्रमाणात ट्रिगार्ड उपलब्ध नसल्याने समस्या निर्माण झाली. शिवाय, वृक्ष लागवड करण्यासाठी काही स्वयंसेवी संस्थांनीच आखडता हात घेतला. ही बाब लक्षात घेता, प्रशासनाने स्वत:च वृक्ष लागवडीला १२ जुलैपासून सुरुवात केली आहे.

** सुविधा हव्यात, दायित्वाचा विसर

सुंदर बगिचा, प्रशस्त व स्वच्छ रस्ते, पथदिवे, स्वच्छ पाणीपुरवठा, वॉकिंग ट्रॅक, पदपाथसह अतिक्रमणमुक्त अकोला सर्वांना हवे आहे. या सर्व सुविधा पुरविण्याची जबाबदारी मनपावर ढकलल्या जाते; परंतु एक अकोलेकर या नात्याने आपले कर्तव्य व दायित्व काय, यावर कोणीही विचार करीत नाही. मनपाच्या सामाजिक उपक्रमात नगरसेवक, व्यापारी, उद्योजक, शिक्षण संस्था चालक, सामाजिक संघटनांसह सर्वसामान्य नागरिकांनी सहभागी होण्याची गरज आहे. तरच खर्‍या अर्थाने अकोला ह्यग्रीनह्ण होईल.