शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
आजचे राशीभविष्य- ६ ऑक्टोबर २०२५: आजचा दिवस आनंददायी, नोकरी व्यवसायात फायदाच फायदा!
3
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
4
उपचारांवरचा खर्च नाकारणे म्हणजेच हक्काचे उल्लंघन; केरळ हायकोर्टाने एलआयसीला सुनावले
5
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
6
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
7
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
8
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
9
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
10
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
11
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
12
खोकल्याच्या औषधात होते विषारी रसायन; महाराष्ट्रासह सहा राज्यांत सीडीएससीओची तपासणी
13
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
14
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
15
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
16
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
17
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
18
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
19
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
20
अतिवृष्टीमुळे डोंगर खचून २० ठार; १२ तासांत ३०० मिमीपेक्षा जास्त पावसाने हाहाकार; घरे वाहून गेली, शेकडो पर्यटक अडकले

आधी शहराचा विकास हवा; मगच हद्दवाढ करा!

By admin | Updated: January 28, 2016 00:42 IST

‘लोकमत परिचर्चे’त उमटला सूर; ग्रामस्थांना सहन करावा लागेल कराचा भुर्दंड.

अकोला: महानगरपालिकेची प्रस्तावित हद्दवाढ करण्यात यावी; मात्र आधी शहराचा विकास करावा, मगच शहरानजीकच्या २१ गावांचा मनपा हद्दीत समावेश करावा, असा सूर ह्यलोकमतह्णच्यावतीने आयोजित परिचर्चेत सोमवारी उमटला.अकोला महानगरपालिकेच्या हद्दवाढीचा प्रस्ताव असून, यामध्ये शहरानजीकच्या २१ गावांचा समावेश प्रस्तावित आहे. शहरालगतच्या गावांमध्ये रस्ते, पाणी व इतर मूलभूत सुविधांसह गावांच्या विकासासाठी शहराची हद्दवाढ होणे आवश्यक आहे. हद्दवाढ झाल्याशिवाय शहरालगतच्या गावांचा विकास होणार नाही. त्यामुळे शहरानजीकच्या २१ गावांचा मनपा हद्दीत समावेश आवश्यक आहे. हद्दवाढ झाल्यास गावांचा विकास होणार असून, बेरोजगारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यास मदत होईल, असा विचार यावेळी मांडण्यात आला. तथापि, महानगरपालिका अस्तिवात आल्यापासून शहराचाच पाहिजे तसा विकास झाला नाही. आधी शहराचा विकास करण्यात यावा; नंतर शहरानजीकच्या गावांचा मनपा हद्दीत समावेश करावा, अशी भूमिका परिचर्चेत सहभागी बहुतांश वक्त्यांनी मांडली. मनपाची हद्दवाढ झाल्यास शहरानजीकच्या गावांमधील ग्रामस्थांना नाहक कराचा भुर्दंंड सहन करावा लागेल. ग्रामीण भागात विकासाच्या योजना राबविण्यात येत असून, हद्दवाढ झाल्यानंतर मनपा क्षेत्रात २१ गावे समाविष्ट केल्यास या गावांचा विकास होणार की नाही, याबाबत खात्री नाही. शहराचा विकास नाही, तर हद्दवाढ करून गावांचा समावेश कसा होईल.धी शहराचा विकास करण्यात यावा, नंतर शहराची हद्दवाढ करण्यात यावी, असा विचार मांडण्यात आला.