शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

वन्यप्राण्यांचा हैदोस ; शेतकरी रात्री राखणीला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:09 IST

अमोल सोनोने पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी हैराण झाला आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण ...

अमोल सोनोने

पांढुर्णा : पातूर तालुक्यातील पांढुर्णा शिवारात वन्यप्राण्यांचा हैदोस वाढला असून, शेतकरी हैराण झाला आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी शेतकरी जीवाची पर्वा न करता रात्री शेतात मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. याकडे वनविभागाने लक्ष देऊन वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.

पांढुर्णा शिवारात यंदा शेतकऱ्यांनी हरभऱ्याला पसंती दिली असून, परिसरात हरभऱ्याचे क्षेत्र वाढले आहे. सद्यस्थितीत हरभरा घाटे असलेल्या अवस्थेत, तर काही शेतकऱ्यांचा हरभरा सोंगणीला आला आहे. रात्रीच्या सुमारास रानडुकरे, नीलगायी, हरणांचे कळप शेतात शिरून पिकांची नासाडी करीत असल्याचे चित्र आहे. पांढुर्णा येथील शेतकरी दीपक पुंडलिक देवकते यांच्या एक एकरातील हरभरा वन्यप्राण्यांनी फस्त केल्याचा प्रकार घडला आहे. त्यामुळे शेतकरी शेतात रात्री मुक्काम करीत असल्याचे चित्र आहे. वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्याठी शेतकरी रात्री राखणीला जात असून, मुक्काम करीत आहेत. यंदा खरीप हंगामात सततचा पाऊस व परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी संकटात आहेत. रबी हंगामावर आशा असताना वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तविली आहे. त्यामुळे वनविभागाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन तत्काळ पंचनामा करून मदत द्यावी, अशी मागणी होत आहे. (फोटो)

-----------------------------------------------------------

खरीप हंगामात पिकांचे नुकसान झाल्याने कर्ज काढून रबी हंगामात पेरणी केली, चांगले उत्पादन होईल अशी आशा आहे; मात्र वन्यप्राण्यांच्या हैदोसामुळे चिंता वाढली आहे. पंडित देवकते, शेतकरी, पांढुर्णा, ता. पातूर

------------------------------------------------------------------

पंचनामा करून मदत देण्याची मागणी

वन्यप्राण्यांकडून पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असल्याने उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वनविभागाने नुकसानग्रस्त भागात पंचनामा करून मदत देण्याची मागणी होत आहे.