शहरं
Join us  
Trending Stories
1
Uttarakhand Cloudburst: उत्तराखंडमध्ये पावसाचा कहर, यमुनोत्री मार्गावर ढगफुटी; अनेक कामगार बेपत्ता, बचावकार्य सुरू
2
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
3
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा, प्रकृतीचा त्रास जाणवेल, आज 'या' राशींनी घ्या काळजी
4
शक्ती कायद्याची एक वर्षानंतर झाली आठवण; केंद्राचे पत्र जुलै २०२४ मध्ये; राज्याने आता नेमली समिती
5
उद्धव ठाकरेंकडून मराठीचा राजकीय वापर, त्रिभाषा सूत्राचा अहवाल स्वीकारणारेच आज विरोधात : फडणवीस
6
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
7
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
8
चुका सुधारणार की मारच खात राहणार?
9
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
10
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
11
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
12
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
13
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
14
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
15
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
16
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
17
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
18
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
19
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
20
पतीचं निस्वार्थ प्रेम! शेफाली जरीवालाच्या अंत्यसंस्कारावेळी परागच्या 'त्या' कृतीने वेधलं लक्ष, व्हिडीओ पाहून डोळे पाणावतील

हगणदरीमुक्तीचा गवगवा कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2018 14:00 IST

अकोला: जिल्ह्यातील गावे हगणदरीमुक्त झाल्याचा गवगवा जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ कागदावरच केला. प्रत्यक्षात गावात जाताना रुमाल बांधूनच जावे लागते.

अकोला: जिल्ह्यातील गावे हगणदरीमुक्त झाल्याचा गवगवा जिल्हा परिषद प्रशासनाने केवळ कागदावरच केला. प्रत्यक्षात गावात जाताना रुमाल बांधूनच जावे लागते. शौचालयांची निर्मिती केवळ कागदावरच करून प्रशासनाने मोठा घोटाळा केला आहे. त्याची चौकशी तातडीने करण्याची मागणी जिल्हा परिषद स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी गुरुवारी केली.जिल्हा परिषद अध्यक्ष संध्या वाघोडे यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. त्यावेळी अर्थ व शिक्षण सभापती पुंडलिकराव अरबट, समाजकल्याण सभापती रेखा अंभोरे, कृषी व पशुसंवर्धन सभापती माधुरी गावंडे, महिला व बालकल्याण सभापती देवका पातोंड यांच्यासह सदस्य, अधिकारी उपस्थित होते.ग्रामीण भाग हगणदरीमुक्त झाल्याचे कागदोपत्री दाखविण्यात आले आहे. प्रत्यक्षात अनेक गावांमध्ये शौचालयांची निर्मितीच झाली नाही. शौचालय असले, तरी त्याचा वापर केला जात नाही, त्यामुळे गावांमध्ये जाताना नाकाला रुमाल लावूनच जावे लागते, ही वस्तुस्थिती आहे. त्याचवेळी जिल्हा परिषद प्रशासनाकडून गवगवा सुरू आहे, हा विरोधाभास असल्याचे सदस्य शोभा शेळके यांनी सभागृहात सांगितले. त्यावेळी अध्यक्ष वाघोडे यांनी बेसलाइन सर्व्हेनुसार गावे हगणदरीमुक्त झाल्याचे म्हटले. त्यावर काही सदस्यांनी शौचालय निर्मितीच्या कामात मोठा भ्रष्टाचार असल्याचे म्हटले. त्यामध्ये अधिकारी-कर्मचारीही तेवढेच दोषी आहेत. चौकशी केल्यास संपूर्ण घोटाळा बाहेर येईल, त्यासाठी चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली. सोबतच हगणदरीमुक्त झालेल्या गावांमध्ये गुड मॉर्निंग पथके पुन्हा सुरू करावी, त्यासाठी नियोजन करण्याचेही सभेत सांगण्यात आले.जिल्हा परिषद हायस्कूल अडगाव येथील मुख्याध्यापक भारसाकळे यांच्यावर गैरवर्तन केल्याप्रकरणी कारवाईस प्रचंड विलंब लावला जात आहे. त्यातून त्यांना वाचविण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप सदस्य गोपाल कोल्हे यांनी केला. त्यावर उपशिक्षणाधिकारी दिनेश तरोळे यांनी महिनाभरात नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सभागृहात सांगितले.

- उद्यानाचे ३२ लाख शेळी गटासाठी वळतेसमाजकल्याण विभागाने दलित वस्त्यांमध्ये ज्येष्ठांसाठी विरंगुळा केंद्र, उद्यान निर्मितीसाठी तरतूद केलेला ३२ लाखांचा निधी शेळी गट वाटपासाठी वळते करण्याची सूचना अध्यक्ष वाघोडे यांनी केली. त्यानुसार ठराव घेण्यात आला.

- ८४ खेडी दुरुस्तीच्या माहितीस ठेंगा१० कोटी २० लाख रुपयांपेक्षाही अधिक निधी दुरुस्तीसाठी खर्च केल्यानंतरही ८४ खेडी योजनेतील गावांमध्ये पिण्याचे पाणी टाक्यांमध्ये पोहोचतच नाही. त्यामुळे त्या कामांमध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाल्याने दुरुस्ती कामांची माहिती गेल्या तीन सभांपासून मागितली जात आहे. सदस्य गोपाल कोल्हे यांनी पाठपुरावा सुरूच ठेवला. तिसरी सभा उजाडली तरीही माहिती न देता जिल्हा परिषदेला झुलवत ठेवण्याचा प्रकार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून सुरू आहे. विशेष म्हणजे, ८४ खेडी योजना चालविण्यासाठी जिल्हा परिषदेला कोट्यवधींचा भुर्दंड सहन करावा लागत आहे.

 

टॅग्स :AkolaअकोलाSwachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानAkola ZPअकोला जिल्हा परिषद