शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

जिल्ह्यात हगणदारीमुक्ती कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

अकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली असली तरी, अनेक गावांत घरात बांधलेल्या शौचालयांचा ...

अकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली असली तरी, अनेक गावांत घरात बांधलेल्या शौचालयांचा वापर न करता, उघड्यावर शौच वारी सुरू असल्याने, गावांच्या वेशीवर घाण कायमच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

स्वच्छ भारत अभियान, निर्मल भारत अभियान व घरकुल योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी ग्रामीण भागातील लाभार्थींना शासनामार्फत प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१२ मध्ये जिल्ह्यात करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ८४२ गावांपैकी ८३६ गावे मार्च २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली. २०१२ ते नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ६ हजार १८८ वैयक्तिक शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात आली होती. सद्य:स्थितीत ६९ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर असून, जिल्ह्यातील २ लाख ६३७ कुटुंबांकडे अद्याप वैयक्तिक शौचालयांची सुविधा नाही. या कुटुंबांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शौचालय बांधकामांसाठी अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत गेल्या ऑक्टोबरमध्ये शासनाकडे सादर करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त जाहीर करण्यात आली; मात्र घरात शौचालय असूनही अनेक गावांत त्याचा वापर करण्यात येत नसल्याने आणि उघड्यावर शौच वारी सुरू असल्याने गावाच्या वेशीवर घाण कायम आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील हगणदारीमुक्ती कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

बांधण्यात आलेली शौचालये (तालुकानिहाय)

अकोला ३८,०९३

अकोट ३१,९५६

बाळापूर २९,४३०

बार्शीटाकळी २७,३१६

मूर्तिजापूर २८,२९५

पातूर २१,५७१

तेल्हारा २९,५२७

जिल्ह्यात शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या

२६३७

शौचालयांचे बांधकाम जिल्ह्यात प्रगतिपथावर

६९

गावात ९५ टक्के कुटुंबांकडे शौचालय सुविधा आहे. पाच टक्के कुटुंबांकडे शौचालय नाही. घरात शौचालय असलेल्या कुटुंबांपैकी ५५ ते ६० टक्के कुटुंब शौचालयाचा वापर करीत असून, उर्वरित ३५ ते ४० टक्के कुटुंब घरात शौचालय असूनही त्याचा वापर करीत नाही. शौचालय असलेल्या कुटुंबांनी शौचालयाचा वापर केला पाहिजे.

-दिलीप मोहोड, सरपंच, आखतवाडा

शौचालयाचा वापर कशासाठी?

जिल्ह्यात अनेक घरांत बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर शौचविधीसाठी करण्यात येत नाही. कुटार, कडबा तसेच विविध टाकाऊ वस्तू ठेवण्यासाठी शौचालयांचा वापर करण्यात येत असल्याचे चित्र अनेक गावांत दिसते.