शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानने अटारी, वाघा बॉर्डरचे गेट उघडले; धास्ती एवढी की पाकिस्तानींनाही घेत नव्हते...
2
खून प्रकरणातील आरोपी असलेल्या बजरंग दलाच्या कार्यकर्त्याचीच हत्या; मंगळुरू शहरात प्रचंड तणाव
3
काश्मीरात सर्च ऑपरेशन सुरूच, आतापर्यत ३००० जण ताब्यात; जंगलात लपलेत पहलगाम हल्ल्याचे दहशतवादी
4
संजय राऊतांनी PM मोदींच्या नेतृत्वक्षमतेवर घेतली शंका; म्हणाले, “शाह यांचा राजीनामा का घेत नाही”
5
चिनी कर्मचाऱ्यांना पगारही मिळत नाहीये, ट्रम्प टॅरिफमुळे कारखाने होताहेत बंद; कामगार उतरले रस्त्यावर
6
हॉटेलमधील 'तो' पदार्थ खाणं पडलं महागात! निक्की तांबोळीला ICU मध्ये केलं दाखल, आता कशी आहे अभिनेत्रीची तब्येत?
7
"हा, आम्ही दहशतवादी पोसले पण आता..."; संरक्षण मंत्र्यानंतर बिलावल भुट्टोनेही दिली कबुली
8
Nashik Hit and Run: भावासमोरच जयश्रीने सोडला जीव, नाशिकमध्ये पिकअपने तीन वाहनांना उडवले
9
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला 'हे' उपाय केले असता घरात येईल सुख समृद्धी!
10
"आता आर-पार करण्याची वेळ आलीय...", जावेद अख्तर यांनी पहलगाम हल्ल्यावरून पाकिस्तानला फटकारलं
11
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
12
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
13
Delhi Rains : पावसाचे थैमान! दिल्ली-NCR मध्ये रस्ते पाण्याखाली, १०० फ्लाइट्स लेट; ४ जणांनी गमावला जीव
14
Ganga Saptami 2025: गंगा सप्तमीला केले जाते पितृतर्पण; कसे आणि का? सविस्तर जाणून घ्या!
15
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
16
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
17
Adani Enterprises Q4 Results: जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
18
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
19
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
20
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल

जिल्ह्यात हगणदारीमुक्ती कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

अकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली असली तरी, अनेक गावांत घरात बांधलेल्या शौचालयांचा ...

अकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली असली तरी, अनेक गावांत घरात बांधलेल्या शौचालयांचा वापर न करता, उघड्यावर शौच वारी सुरू असल्याने, गावांच्या वेशीवर घाण कायमच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

स्वच्छ भारत अभियान, निर्मल भारत अभियान व घरकुल योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी ग्रामीण भागातील लाभार्थींना शासनामार्फत प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१२ मध्ये जिल्ह्यात करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ८४२ गावांपैकी ८३६ गावे मार्च २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली. २०१२ ते नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ६ हजार १८८ वैयक्तिक शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात आली होती. सद्य:स्थितीत ६९ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर असून, जिल्ह्यातील २ लाख ६३७ कुटुंबांकडे अद्याप वैयक्तिक शौचालयांची सुविधा नाही. या कुटुंबांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शौचालय बांधकामांसाठी अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत गेल्या ऑक्टोबरमध्ये शासनाकडे सादर करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त जाहीर करण्यात आली; मात्र घरात शौचालय असूनही अनेक गावांत त्याचा वापर करण्यात येत नसल्याने आणि उघड्यावर शौच वारी सुरू असल्याने गावाच्या वेशीवर घाण कायम आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील हगणदारीमुक्ती कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

बांधण्यात आलेली शौचालये (तालुकानिहाय)

अकोला ३८,०९३

अकोट ३१,९५६

बाळापूर २९,४३०

बार्शीटाकळी २७,३१६

मूर्तिजापूर २८,२९५

पातूर २१,५७१

तेल्हारा २९,५२७

जिल्ह्यात शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या

२६३७

शौचालयांचे बांधकाम जिल्ह्यात प्रगतिपथावर

६९

गावात ९५ टक्के कुटुंबांकडे शौचालय सुविधा आहे. पाच टक्के कुटुंबांकडे शौचालय नाही. घरात शौचालय असलेल्या कुटुंबांपैकी ५५ ते ६० टक्के कुटुंब शौचालयाचा वापर करीत असून, उर्वरित ३५ ते ४० टक्के कुटुंब घरात शौचालय असूनही त्याचा वापर करीत नाही. शौचालय असलेल्या कुटुंबांनी शौचालयाचा वापर केला पाहिजे.

-दिलीप मोहोड, सरपंच, आखतवाडा

शौचालयाचा वापर कशासाठी?

जिल्ह्यात अनेक घरांत बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर शौचविधीसाठी करण्यात येत नाही. कुटार, कडबा तसेच विविध टाकाऊ वस्तू ठेवण्यासाठी शौचालयांचा वापर करण्यात येत असल्याचे चित्र अनेक गावांत दिसते.