शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी ते केले तर चीन उद्ध्वस्त होईल'; ड्रॅगनची भारताशी जवळीक वाढल्याने डोनाल्ड ट्रम्प यांची धमकी
2
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
3
२ दिवसांत निर्णय घ्या, अन्यथा मुंबईत धडकू, मनोज जरांगे यांचा इशारा; आरक्षण घेतल्याशिवाय आता माघार नाही, काठी उगारली तर सरकारच उलथवून टाकणार
4
आजचे राशीभविष्य, २६ ऑगस्ट २०२५: वाद-विवादापासून दूर राहा, गोड बोलून कामे पूर्ण कराल
5
‘सरकारने मागणीला गांभीर्याने घ्यावे, घराघरांतून मराठा समाज मुंबईला येणार’, मनोज जरांगे यांचा इशारा
6
'रिझर्व्हेशन'ची स्पेलिंगही न येणारे मुंबईला निघाल्यास ओबीसी रस्त्यावर उतरतील: लक्ष्मण हाकेंचा इशारा
7
२६ लाख लाडक्या बहिणींचे मानधन रोखले, छाननीचे काम सुरू, २.२९ कोटी बहिणींचे मानधन मात्र सुरूच
8
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
9
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
10
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
11
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
12
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
13
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
14
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
15
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
16
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
17
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
18
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
19
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
20
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द

जिल्ह्यात हगणदारीमुक्ती कागदावरच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:43 IST

अकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली असली तरी, अनेक गावांत घरात बांधलेल्या शौचालयांचा ...

अकोला : स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली असली तरी, अनेक गावांत घरात बांधलेल्या शौचालयांचा वापर न करता, उघड्यावर शौच वारी सुरू असल्याने, गावांच्या वेशीवर घाण कायमच आहे. त्यामुळे जिल्ह्यातील हगणदारीमुक्ती केवळ कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

स्वच्छ भारत अभियान, निर्मल भारत अभियान व घरकुल योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासाठी ग्रामीण भागातील लाभार्थींना शासनामार्फत प्रत्येकी १२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. २०१२ मध्ये जिल्ह्यात करण्यात आलेल्या पायाभूत सर्वेक्षणानुसार जिल्ह्यातील ८४२ गावांपैकी ८३६ गावे मार्च २०१८ पर्यंत हगणदारीमुक्त घोषित करण्यात आली. २०१२ ते नोव्हेंबर २०२० अखेरपर्यंत जिल्ह्यात २ लाख ६ हजार १८८ वैयक्तिक शौचालयांची बांधकामे पूर्ण करण्यात आली होती. सद्य:स्थितीत ६९ शौचालयांची बांधकामे प्रगतिपथावर असून, जिल्ह्यातील २ लाख ६३७ कुटुंबांकडे अद्याप वैयक्तिक शौचालयांची सुविधा नाही. या कुटुंबांना शौचालय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शौचालय बांधकामांसाठी अनुदानाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागामार्फत गेल्या ऑक्टोबरमध्ये शासनाकडे सादर करण्यात आला आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्ह्यात ८३६ गावे हगणदारीमुक्त जाहीर करण्यात आली; मात्र घरात शौचालय असूनही अनेक गावांत त्याचा वापर करण्यात येत नसल्याने आणि उघड्यावर शौच वारी सुरू असल्याने गावाच्या वेशीवर घाण कायम आहे. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील हगणदारीमुक्ती कागदावरच असल्याचे वास्तव आहे.

बांधण्यात आलेली शौचालये (तालुकानिहाय)

अकोला ३८,०९३

अकोट ३१,९५६

बाळापूर २९,४३०

बार्शीटाकळी २७,३१६

मूर्तिजापूर २८,२९५

पातूर २१,५७१

तेल्हारा २९,५२७

जिल्ह्यात शौचालय नसलेल्या कुटुंबांची संख्या

२६३७

शौचालयांचे बांधकाम जिल्ह्यात प्रगतिपथावर

६९

गावात ९५ टक्के कुटुंबांकडे शौचालय सुविधा आहे. पाच टक्के कुटुंबांकडे शौचालय नाही. घरात शौचालय असलेल्या कुटुंबांपैकी ५५ ते ६० टक्के कुटुंब शौचालयाचा वापर करीत असून, उर्वरित ३५ ते ४० टक्के कुटुंब घरात शौचालय असूनही त्याचा वापर करीत नाही. शौचालय असलेल्या कुटुंबांनी शौचालयाचा वापर केला पाहिजे.

-दिलीप मोहोड, सरपंच, आखतवाडा

शौचालयाचा वापर कशासाठी?

जिल्ह्यात अनेक घरांत बांधण्यात आलेल्या शौचालयाचा वापर शौचविधीसाठी करण्यात येत नाही. कुटार, कडबा तसेच विविध टाकाऊ वस्तू ठेवण्यासाठी शौचालयांचा वापर करण्यात येत असल्याचे चित्र अनेक गावांत दिसते.