शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

तासिका तत्त्वावरील गुरूजी मजुरीवर!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:24 IST

किती दिवस जगायचे असे? राज्यात १७-१८ हजार सहायक प्राध्यापकांचे जागा रिक्त आहेत. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्याही रखडल्या आहे. तासिका ...

किती दिवस जगायचे असे?

राज्यात १७-१८ हजार सहायक प्राध्यापकांचे जागा रिक्त आहेत. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांच्या नियुक्त्याही रखडल्या आहे. तासिका दर वाढवून देण्याबाबत शासनाने पत्र काढले, परंतु अद्याप दर वाढविले नाहीत. आरक्षणाचाही मुद्दा असल्याने, तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांना जीवन कसे जगावे, असा प्रश्न सतावत आहे. यातून शासनाने मार्ग काढण्याची अपेक्षा आहे.

-प्रा.डॉ.उमेश घोडेस्वार

शासन प्राध्यापक भरतीबाबत अत्यंत उदासीन आहे. हजारो जागा रिक्त असतानाही शासनाकडून पदभरती होत नाही. तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या प्राध्यापकांनी मानधनही कमी मिळते. त्यामुळे अनेकांना शेतमजुरी करावी लागत आहे. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा भागवावा, असा प्रश्न सतावत आहे.

- प्रा.देवेंद्रसिंग सोळंके, सेट-नेट बेरोजगारांची समस्या वेगळीच

सेट-नेट झालेले शेकडो उच्च शिक्षितांची समस्याही गंभीर बनली आहे. उच्च शिक्षितांची बेरोजगारी वाढत आहे. त्यांची नियुक्ती किंवा रोजगार उपलब्ध केला नाही, तर त्यांचे वय वाढेल. त्यांची कौशल्यशक्ती संपत आहे. नेट-सेट, पीएच.डी, एमफील करण्यासाठी जीवनातील ७-८ वर्षे खर्ची घालावी लागतात. त्यानंतरही नोकरी मिळत नाही, ही शोकांतिका आहे. नंतर नोकरी मिळाली, तरीही ती केवळ १२-१५ वर्षेच करावी लागते. कारण वय वाढलेले असते.

यासाेबतच प्राध्यापक भरतीसाठी मोठ्या प्रमाणात डोनेशन मागितल्या जाते. एवढा पैसा आणावा तरी कुठून, त्यामुळे प्राध्यापक संघटनांकडून भरती प्रक्रियाही आयोगामार्फत करावी. सहायक प्राध्यापकांनी प्रति दिवस दीड हजार रुपये मानधन द्यावे, तरच त्यांची आर्थिक बाजू मजबूत होईल.

१० वर्षांपासून लटकला प्रश्न

गत दहा वर्षांपासून सहायक प्राध्यापकांची भरती प्रक्रिया लटकली आहे. प्राध्यापकांच्या संघटनांनी यासाठी सातत्याने आंदोलने केली, परंतु शासनाने त्याकडे लक्ष दिले नाही. सहायक प्राध्यापकांच्या रिक्त जागांचा अनुशेष वाढत आहे. राज्यातील १३ हजारांवर सहायक प्राध्यापकांची पदे रिक्त आहेत. आंदोलने केल्यावर संघटनांना केवळ भरतीचे आश्वासन दिले जाते, परंतु पुढे काहीच केल्या जात नाही. तासिका तत्त्वावरील प्राध्यापकांची नियुक्ती तासिका दरात वाढ आदी प्रश्न प्रलंबितच आहेत.