शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
2
VIDEO: उत्तरकाशीमध्ये ढगफुटी; १४ सेकंदात सगळं गाव उद्ध्वस्त, घरांसह अनेकजण ढिगाऱ्याखाली गाडले गेले
3
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
4
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
5
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
6
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
7
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव
8
ट्रम्प यांच्या वक्तव्याने भारतीय गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फटका; फक्त 'या' क्षेत्रात झाली वाढ
9
बिहारनंतर आता या राज्यातही होणार मतदार याद्यांचं पुनरीक्षण, निवडणूक आयोगाने दिले आदेश   
10
कॅनडात खलिस्तान्यांच्या कुरापती सुरुच; 'रिपब्लिक ऑफ खलिस्तान' नावाने उभारले बनावट दूतावास
11
मंत्रिमंडळ बैठकीत ७ मोठे निर्णय; स्टार्टअप उद्योजगता धोरण जाहीर, समृद्धी फ्रेट कॉरिडॉर मंजूर
12
मराठीशी पंगा महागात! निशिकांत दुबेंच्या अडचणी वाढण्याची शक्यता; मनसेकडून याचिका दाखल
13
VIDEO: दोन बैलांमध्ये भांडण, स्कूटीवाल्या मुलीला बसली जोरदार धडक, ती रस्त्यावर पडली अन् मग...
14
टाटा ग्रुपचा मोठा धमाका! शेअर बाजारात येणार आणखी एका कंपनीचा IPO, गुंतवणूकदार मालामाल होणार?
15
२०,५००% रिटर्न! बिहारच्या या कंपनीनं ५ वर्षांत ₹१ लाखांचे केले ₹२ कोटी, तुमच्याकडे आहे का?
16
Amit Shah: विक्रमी अमित शाह! 'अशी' कामगिरी करणारे पहिलेच गृहमंत्री, अडवाणींनाही टाकले मागे
17
बिहारमध्ये डोमिसाईल पॉलिसी मंजूर; शिक्षक भरतीमध्ये ८५ टक्के बिहारींनाच नोकरी मिळणार
18
पाकिस्तानातील प्रत्येक सहावा व्यक्ती भिकारी; परदेशात पसरलं नेटवर्क, दरवर्षी ११७ ट्रिलियन कमाई
19
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; घटस्फोटानंतर 12 कोटी रुपये अन् BMW कार मागणाऱ्या पत्नीला काय मिळाले?
20
युजवेंद्र चहलने घटस्फोटावर उघडपणे विधान केल्यानंतर Ex-पत्नी धनश्रीची पोस्ट, म्हणाली- शांतता...

जीएसटीमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाला फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:38 IST

अकोला: जीएसटी (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी देशभरात जुलै महिन्यापासून सुरू झाली. ब्रॅण्ड नेमवर चालणार्‍या अनेक कंपन्यांनी लघू व्यापार्‍यांना थेट दिला जाणारा माल थांबविला. ज्या व्यापार्‍यांकडे जीएसटी कोड आहे, अशा व्यापार्‍यांनाच माल दिला जात आहे. त्यामुळे देशभरातील दळण-वळणावर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देसंचालकांकडून मालवाहतुकीच्या भाड्यात कपातब्रॅण्ड नेमवर चालणार्‍या अनेक कंपन्यांनी लघू व्यापार्‍यांना थेट दिला जाणारा माल थांबविलाज्या व्यापार्‍यांकडे जीएसटी कोड आहे, अशा व्यापार्‍यांनाच माल दिला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जीएसटी (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी देशभरात जुलै महिन्यापासून सुरू झाली. ब्रॅण्ड नेमवर चालणार्‍या अनेक कंपन्यांनी लघू व्यापार्‍यांना थेट दिला जाणारा माल थांबविला. ज्या व्यापार्‍यांकडे जीएसटी कोड आहे, अशा व्यापार्‍यांनाच माल दिला जात आहे. त्यामुळे देशभरातील दळण-वळणावर परिणाम झाला आहे. मालवाहतूक करणार्‍या मालवाहू वाहनांना फारसे काम मिळत नसल्याने आता ट्रान्सपोर्ट संचालकांकडून मालवाहतुकीच्या भाड्यात कपात करण्यात आली आहे. अप्रत्यक्षरीत्या जीएसटी अंमलबजावणीचा आर्थिक फटका ट्रान्सपोर्ट संचालकांना सोसावा लागत आहे. वस्तू आणि सेवा कर लागल्यानंतर  सर्वसामान्य जनतेला महागाई कमी झाल्याचे जाणवेल, असा दावा अर्थशास्त्राशी जुळलेल्या जाणकारांकडून केला जात होता; मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच समोर आली आहे. जीएसटीचे फायदे कमी आणि तोटेच जास्त अनुभवाला येत असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर साखर, तेल, शेंगदाणे, साबुदाण्याचे भाव वधारले. सर्वसामान्य जनतेला कराचा फटाका बसू लागला. लोकांकडून आणि व्यापार्‍यांकडून मागणी कमी झाल्यामुळे अप्रत्यक्षरीत्या ट्रान्सपोर्टचालकांचा चक्का जाम झाला आहे. जाम झालेल्या चक्क्याला गती मिळावी म्हणून ट्रान्सपोर्ट असोसिशनने देशपातळीवर मालवाहतुकीच्या भाड्याच्या दरात कपात केली आहे. मालवाहतुकीत कपात झाल्यानंतरही अद्याप विस्कटलेली घडी सुरळीत झालेली नाही. जीएसटी लागू होण्याआधी जूनमध्ये अकोला किराणा बाजारात  ५0 ते ६0, फळांच्या बाजारात ३0-३५, औद्योगिक वसाहतीत शेकडो ट्रक माल येत असे आणि असाच माल भरून अकोल्यातून रवाना होत असे. आता मात्र ही संख्या अध्र्यापेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे व्यापार ठप्प होत आहे. व्यापारात मंदी आल्याने मालवाहतूक करणार्‍या ट्रान्सपोर्टच्या कामावर परिणाम दिसून येत आहे.

जीएसटीमुळे झालेला संभ्रमात अनेक जण पोळले जात असून, शासनाने कराबाबतचे धोरण निश्‍चित करावे. एकीकडे काम नाही अन् दुसरीकडे महामार्गांवर जीएसटीच्या नावावर लुटल्या जात आहे. मालवाहतुकीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आल्याशिवाय राहणार नाही.- जावेद खान, ट्रान्सपोर्ट व्यवसायीक, अकोला.