शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

जीएसटीमुळे ट्रान्सपोर्ट व्यवसायाला फटका 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2017 02:38 IST

अकोला: जीएसटी (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी देशभरात जुलै महिन्यापासून सुरू झाली. ब्रॅण्ड नेमवर चालणार्‍या अनेक कंपन्यांनी लघू व्यापार्‍यांना थेट दिला जाणारा माल थांबविला. ज्या व्यापार्‍यांकडे जीएसटी कोड आहे, अशा व्यापार्‍यांनाच माल दिला जात आहे. त्यामुळे देशभरातील दळण-वळणावर परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देसंचालकांकडून मालवाहतुकीच्या भाड्यात कपातब्रॅण्ड नेमवर चालणार्‍या अनेक कंपन्यांनी लघू व्यापार्‍यांना थेट दिला जाणारा माल थांबविलाज्या व्यापार्‍यांकडे जीएसटी कोड आहे, अशा व्यापार्‍यांनाच माल दिला जात आहे

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: जीएसटी (वस्तू व सेवा कर) अंमलबजावणी देशभरात जुलै महिन्यापासून सुरू झाली. ब्रॅण्ड नेमवर चालणार्‍या अनेक कंपन्यांनी लघू व्यापार्‍यांना थेट दिला जाणारा माल थांबविला. ज्या व्यापार्‍यांकडे जीएसटी कोड आहे, अशा व्यापार्‍यांनाच माल दिला जात आहे. त्यामुळे देशभरातील दळण-वळणावर परिणाम झाला आहे. मालवाहतूक करणार्‍या मालवाहू वाहनांना फारसे काम मिळत नसल्याने आता ट्रान्सपोर्ट संचालकांकडून मालवाहतुकीच्या भाड्यात कपात करण्यात आली आहे. अप्रत्यक्षरीत्या जीएसटी अंमलबजावणीचा आर्थिक फटका ट्रान्सपोर्ट संचालकांना सोसावा लागत आहे. वस्तू आणि सेवा कर लागल्यानंतर  सर्वसामान्य जनतेला महागाई कमी झाल्याचे जाणवेल, असा दावा अर्थशास्त्राशी जुळलेल्या जाणकारांकडून केला जात होता; मात्र वस्तुस्थिती काही वेगळीच समोर आली आहे. जीएसटीचे फायदे कमी आणि तोटेच जास्त अनुभवाला येत असल्याचे सर्वसामान्यांचे मत आहे. जीएसटीच्या अंमलबजावणीनंतर साखर, तेल, शेंगदाणे, साबुदाण्याचे भाव वधारले. सर्वसामान्य जनतेला कराचा फटाका बसू लागला. लोकांकडून आणि व्यापार्‍यांकडून मागणी कमी झाल्यामुळे अप्रत्यक्षरीत्या ट्रान्सपोर्टचालकांचा चक्का जाम झाला आहे. जाम झालेल्या चक्क्याला गती मिळावी म्हणून ट्रान्सपोर्ट असोसिशनने देशपातळीवर मालवाहतुकीच्या भाड्याच्या दरात कपात केली आहे. मालवाहतुकीत कपात झाल्यानंतरही अद्याप विस्कटलेली घडी सुरळीत झालेली नाही. जीएसटी लागू होण्याआधी जूनमध्ये अकोला किराणा बाजारात  ५0 ते ६0, फळांच्या बाजारात ३0-३५, औद्योगिक वसाहतीत शेकडो ट्रक माल येत असे आणि असाच माल भरून अकोल्यातून रवाना होत असे. आता मात्र ही संख्या अध्र्यापेक्षाही कमी झाली आहे. त्यामुळे व्यापार ठप्प होत आहे. व्यापारात मंदी आल्याने मालवाहतूक करणार्‍या ट्रान्सपोर्टच्या कामावर परिणाम दिसून येत आहे.

जीएसटीमुळे झालेला संभ्रमात अनेक जण पोळले जात असून, शासनाने कराबाबतचे धोरण निश्‍चित करावे. एकीकडे काम नाही अन् दुसरीकडे महामार्गांवर जीएसटीच्या नावावर लुटल्या जात आहे. मालवाहतुकीवर अवलंबून असलेल्या हजारो कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आल्याशिवाय राहणार नाही.- जावेद खान, ट्रान्सपोर्ट व्यवसायीक, अकोला.