शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
4
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
5
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
6
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
7
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
8
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
9
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
10
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
11
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
12
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
13
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
14
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
15
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
16
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
17
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
18
"आम्ही इंग्रजी आहोत का? इथे लंडनमधून राहायला आलोय का?" बावनकुळेंनी ठाकरे बंधूंना सुनावलं
19
IPL लिलावात अनसोल्डचा टॅग; त्याच पठ्ठ्यानं विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत विक्रमी द्विशतकासह रचला इतिहास
20
"भजन करायला थोडीच बसलोय, मठ पुरेसे आहेत...!"; हा श्लोक म्हणत CM योगी भरविधानसभेत कडाडले
Daily Top 2Weekly Top 5

विकासासाठी करवाढ; महापौरांचे विरोधकांना उत्तर

By admin | Updated: May 27, 2017 00:58 IST

अकोला: शहराचा विकास करण्यासाठी पैशाची नितांत गरज असते. यातील काही निधी शासनाकडून मिळतो तसेच नागरिकांकडून मिळणाऱ्या मालमत्ता करातून हा पैसा गोळा करावा लागतो.

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला: शहराचा विकास करण्यासाठी पैशाची नितांत गरज असते. यातील काही निधी शासनाकडून मिळतो तसेच नागरिकांकडून मिळणाऱ्या मालमत्ता करातून हा पैसा गोळा करावा लागतो. परंतु मागील १६ वर्षापासून मालमत्ता करात वाढ केलीच नाही. म्हणूनच यावेळी कर वाढीचा निर्णय घ्यावा लागल्याची माहिती महापालिकेचे महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी दिली.शहराचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर केंद्र आणि राज्य शासनामार्फत प्राप्त निधीत महापालिकेला आर्थिक हिस्सा जमा करणे आवश्यक आहे. अनेकदा शासनाकडून निधी प्राप्त होत असला तरी त्यामध्ये जमा करण्यासाठी मनपाकडे पैसा उपलब्ध राहत नसल्यामुळे शासनाचा निधी परत जातो. अकोलेकरांना मागील १६ वर्षांमध्ये कर आकारणी करण्यात आली नव्हती. या सर्व बाबींचे भान ठेवण्याची गरज असून, शहराच्या विकासासाठी कर वाढीचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. विरोधकांचे आरोप सपशेल खोडून काढत महापौरांनी कर वाढीचे समर्थन केले.महापालिकेने शहरातील मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतर सुधारित करवाढीच्या नोटिस जारी केल्या. नागरिकांना दुप्पट, तीनपट कर आकारल्यामुळे नागरिकांमध्ये संताप पसरला आहे. या मुद्यावर विरोधी पक्ष काँग्रेस, शिवसेना व भारिप-बमसंने आंदोलनाचे हत्यार उपसताच विरोधकांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी खुद्द महापौर विजय अग्रवाल पुढे सरसावले. शहरातील विकास कामांसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी प्राप्त होत असला तरी त्यामध्ये मनपाचा आर्थिक हिस्सा जमा होत नसल्यामुळे शासनाचा निधी परत जातो. त्याचा परिणाम विकास कामांवर होत असल्यामुळे शासनानेदेखील मनपाला उत्पन्न वाढविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार मालमत्तांचा सर्व्हे करून सुधारित कर लागू केल्याची माहिती महापौर अग्रवाल यांनी दिली. तरी शहराच्या विकासासाठी सर्वांनी योगदान देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. पत्रकार परिषदेला उपमहापौर वैशाली शेळके, स्थायी समिती सभापती बाळ टाले, गटनेता राहुल देशमुख, सभागृहनेता गीतांजली शेगोकार उपस्थित होत्या. ‘सेल्फ असेसमेंट’चा गैरफायदा घेतला!१७ वर्षांपूर्वी मनपाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन न करता ‘सेल्फ असेसमेंट’ ( नागरिकांनी स्वत: घर मोजून सांगितलेले क्षेत्रफळ) केले होते. सदर पुनर्मूल्यांकन किती प्रामाणिकपणे झाले असेल, याबद्दल शंका आहे. त्याचा मनपा कर्मचाऱ्यांसह मालमत्ताधारकाने गैरफायदा घेतल्यामुळे कराचे उत्पन्न वाढले नसल्याचे महापौरांनी सांगितले. बिल्डरांनी केली फसवणूकमनपाने पहिल्यांदाच ‘जीआयएस’ प्रणालीचा वापर करून मालमत्तांचे इमारत, प्लॉटचे क्षेत्रफळ गृहीत धरून सर्वेक्षण केले. सदनिकांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना खरेदी खतावर कमी क्षेत्रफळ दाखवून बिल्डरांनी सदनिकेची विक्री केली. मनपाच्या मोजमापात खरे क्षेत्रफळ समोर आल्यामुळे त्यावर वस्तुनिष्ठ कर आकारणी केल्याचे महापौर अग्रवाल यांनी स्पष्ट केले.विकासावरही बोलावे!सत्ताधारी असो किंवा प्रशासनाच्या निर्णयावर टीका, आरोप करण्याचे विरोधकांना अधिकार आहेत. जे विरोध करतात त्यांनीच या शहराची लूट चालवली आहे. आमचे ध्येय विकास कामांचे असून, शहरात सुरू असणाऱ्या विकास कामांवरही विरोधकांनी बोलावे, असा टोला महापौर विजय अग्रवाल यांनी कोणत्या पक्षाचे नाव न घेता हाणला.