शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
6
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
7
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
8
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
9
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
10
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
11
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
12
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
13
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
14
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
15
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
16
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
17
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
18
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
19
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...
20
Raksha Bandhan 2025: यंदाही रक्षाबंधनाला भद्राचे सावट? पंचक सुरु होण्याआधी 'या' मुहूर्तावर बांधा राखी!

वाढत्या तापमानाचा भुईमुगाला फटका!

By admin | Updated: April 10, 2017 01:27 IST

संकट : महान परिसरात पाण्याची पातळी गेली खोल, कांद्याचे पीक सुकले

महान : दिवसेंदिवस वाढत असलेला तापमानाचा महान परिसरातील भुईमूग पिकाला फटका बसत आहे. पिके सुकली असून, पाण्याचा वापरही वाढला आहे. एकीकडे पाण्याची पातळी कमी झालेली असताना पाण्याची मागणी वाढल्याने शेतकऱ्यांसमोर संकट वाढले आहे. महान व परिसरात यावर्षी शेकडो एकर जमिनीत शेतकऱ्यांनी भुईमूग पिकास पसंती देऊन पेरणी केली आहे.मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी भुईमूग लागवड व पेरणीस एक महिना उशिराने झाली असल्याने सध्याच्या परिस्थितीत भुईमुगाचे पीक फुलावरच आहे. भुईमूग पिकास आठवड्यातून किमान एक दिवस निश्चित करून शेतकरीवर्ग पाणी द्यायचे; परंतु दिवसेंदिवस उष्णतेत वाढ होत असल्याने भुईमुगाचे पीक सुकत आहे, तर कांद्याचे पीक पिवळे पडत असून, शेतकरी संकटात पडला आहे. भुईमूग पिकांवर भर उन्हात मावा नामक रोगाने ग्रासले आहे.भुईमूग पिकांची परिस्थिती बघता भुईमुगास तिसऱ्याच दिवशी पाणी देण्यास शेतकऱ्यांनी सुरू केले आहे. ज्या शेतकऱ्यांजवळ भरपूर पाणी आहे, त्यांना चिंता नाही; परंतु ज्या शेतकऱ्यांच्या विहिरीला कमी प्रमाणात पाणी आहे, त्यांची चिंता वाढली आहे. उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या कालावधीतच महान परिसरातील अनेक शेतकऱ्यांच्या विहिरीचे पाणी खूप प्रमाणात कमी झाल्याने विहिरी उपशावर आल्या आहेत. या नवीन संकटामुळे तोंडातला घास हिरावून जाण्याची शक्यता आहे, तसेच महान व परिसरात यावर्षी अत्यंत कमी प्रमाणात कांद्याची लागवड शेतकऱ्यांनी केली असून, कांद्यावरसुद्धा उष्ण तापमानाचा फटका बसत असून, कांद्याचे पीक पिवळे पडत असून, माना टाकत आहे. उत्पादन घटण्याची शक्यता ४भुईमूग व कांदा या दोन्ही रब्बी पिकांच्या लागवडीवर शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागतो. उष्ण तापमानाचा फटका वरील दोन्ही पिकांना बसून उत्पादनात घट येण्याची शक्यता आहे. पिके तयार होण्यास एक ते दीड महिन्याचे अंतर बाकी आहे. ऐनवेळेवर विहिरीचे पाणी कमी होणार, याची थोडीफारही कल्पना शेतकऱ्यांना नव्हती. अगोदरच शेतकऱ्यांनी महागडे बी-बियाणे, रासायनिक खते खरेदी करून लागवड व पेरणी केली.त्यानंतर निंदण, डवरे, भरी, युरिया देऊन आवश्यक त्या वेळेस कीटकनाशकाची फवारणी केली. गेल्यावर्षीही बसला होता फटका मागच्या वर्षी कांद्याला भाव मिळाला नसून, शेतकऱ्यांना लावलेला खर्चही काढता आला नाही. त्या कारणामुळे अनेक शेतकऱ्यांना बँकेकडून घेतलेले कर्जही फेडता आले नाही. कांद्याला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी उसनवारी करून यावर्षी भुईमूग पिकास प्राधान्य दिले. उष्ण तापमान व पाण्याच्या कमतरतेमुळे शेतकऱ्यांसमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.