शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

भूजलपातळीत घट; संत्रा, लिंबू बागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:33 IST

अकोला: मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याचा परिणाम यावर्षी विदर्भातील फळबागांवर झाला असून, आजमितीस पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला: मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याचा परिणाम यावर्षी विदर्भातील फळबागांवर झाला असून, आजमितीस पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. भूगर्भपातळीत प्रचंड घट झाल्याने बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने संत्रा, लिंबू फळबागा वाळण्याच्या स्थितीत पोहोचल्या आहेत.विदर्भात १ लाख २५ हजार हेक्टरवर संत्रा असून, २५ ते ३० हजार हेक्टरवर लिंबू आहे. कागदी लिंबू क्षेत्र अकोला जिल्ह्यत सर्वात जास्त आहे; परंतु मागील काही वर्षांपासून पावसाची सरासरी घटली असून, गत दोन वर्षांपासून तर सरासरीच्या अर्धाही पाऊस होत असल्याने भूगर्भात पाणी साठण्याचे प्रमाण कमी झाले आहे. धरण, सिंचन प्रकल्पही भरले नाही. भूगर्भातील पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला पिके घेणे कठीण झाले. यावर्षी त्यात भर पडली. बुलडाणा जिल्ह्याची स्थिती विदारक असून, या जिल्ह्यात यावर्षी सरासरी १ मीटरने भूगर्भसाठा कमी झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. या जिल्ह्यात पाणीच उपलब्ध नसल्याने भाजीपाला पिके तर घेणे बंद आहे, आता फळ पिके वाचविताना शेतकरी हैराण झाला आहे. पाणीच नसल्याने फळ झाडे वाळण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. तेच चित्र अकोला जिल्ह्याचे असून, जवळपास सर्व धरणांचा साठा कमी झाला आहे. भूगर्भपातळी घटल्याने लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना ही झाडे वाचविताना बरेच कष्ट घ्यावे लागत आहे; पण पाणीच उपलब्ध नसल्याने काही बागा वाळण्याच्या स्थितीत पोहोेचल्या आहेत.वाशिम, अमरावतीचे चित्रही भीषण आहे. सिंचन प्रकल्पामध्ये जे पाणी आहे ते पिण्यासाठी आरक्षित असल्याने शेतकºयांवर फळबागा टिकविण्याचे संकट उभे ठाकले आहे. विशेष यावर्षी मार्च महिन्यापासून सूर्य आग ओकत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पारा ४४ पार झाला. परिणामी बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.- उपाययोजनाशेतकºयांनी यावर्षी बहार न घेता ज्यांच्याकडे थोडी फार पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी ठिबक पद्धतीने झाडाच्या बुंध्याजवळ पाणी द्यावे. झाडाच्या बुंध्याजवळ, आळ््यात पालापाचोळ््याचे मल्चिंग आवरण टाकावे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती