शहरं
Join us  
Trending Stories
1
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
4
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
5
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
6
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
7
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
8
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
9
घ्या पैसे, करा पेरणी; राज्याचा कृषी कर्ज टक्का वाढला!
10
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
11
विशेष लेख: महापालिकेचा कारभारही हायकोर्टानेच करायचा का..?
12
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
13
विशेष लेख: अकरावी प्रवेशात शिक्षण विभाग नापास!
14
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
15
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
16
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
17
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
18
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
19
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
20
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!

भूजलपातळीत घट; संत्रा, लिंबू बागा धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2019 13:33 IST

अकोला: मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याचा परिणाम यावर्षी विदर्भातील फळबागांवर झाला असून, आजमितीस पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे.

अकोला: मागच्या वर्षी कमी पाऊस झाल्याचा परिणाम यावर्षी विदर्भातील फळबागांवर झाला असून, आजमितीस पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यातील धरणात केवळ १८ टक्केच जलसाठा शिल्लक आहे. भूगर्भपातळीत प्रचंड घट झाल्याने बागांना देण्यासाठी पाणीच नसल्याने संत्रा, लिंबू फळबागा वाळण्याच्या स्थितीत पोहोचल्या आहेत.विदर्भात १ लाख २५ हजार हेक्टरवर संत्रा असून, २५ ते ३० हजार हेक्टरवर लिंबू आहे. कागदी लिंबू क्षेत्र अकोला जिल्ह्यत सर्वात जास्त आहे; परंतु मागील काही वर्षांपासून पावसाची सरासरी घटली असून, गत दोन वर्षांपासून तर सरासरीच्या अर्धाही पाऊस होत असल्याने भूगर्भात पाणी साठण्याचे प्रमाण कमी झाले आहे. धरण, सिंचन प्रकल्पही भरले नाही. भूगर्भातील पाणी कमी झाल्याने शेतकऱ्यांना फळे, भाजीपाला पिके घेणे कठीण झाले. यावर्षी त्यात भर पडली. बुलडाणा जिल्ह्याची स्थिती विदारक असून, या जिल्ह्यात यावर्षी सरासरी १ मीटरने भूगर्भसाठा कमी झाल्याचे धक्कादायक चित्र आहे. या जिल्ह्यात पाणीच उपलब्ध नसल्याने भाजीपाला पिके तर घेणे बंद आहे, आता फळ पिके वाचविताना शेतकरी हैराण झाला आहे. पाणीच नसल्याने फळ झाडे वाळण्याच्या स्थितीत पोहोचली आहे. तेच चित्र अकोला जिल्ह्याचे असून, जवळपास सर्व धरणांचा साठा कमी झाला आहे. भूगर्भपातळी घटल्याने लिंबू उत्पादक शेतकऱ्यांना ही झाडे वाचविताना बरेच कष्ट घ्यावे लागत आहे; पण पाणीच उपलब्ध नसल्याने काही बागा वाळण्याच्या स्थितीत पोहोेचल्या आहेत.वाशिम, अमरावतीचे चित्रही भीषण आहे. सिंचन प्रकल्पामध्ये जे पाणी आहे ते पिण्यासाठी आरक्षित असल्याने शेतकºयांवर फळबागा टिकविण्याचे संकट उभे ठाकले आहे. विशेष यावर्षी मार्च महिन्यापासून सूर्य आग ओकत आहे. एप्रिलच्या पहिल्या आठवड्यातच पारा ४४ पार झाला. परिणामी बाष्पीभवनाचा वेग वाढला आहे.- उपाययोजनाशेतकºयांनी यावर्षी बहार न घेता ज्यांच्याकडे थोडी फार पाण्याची व्यवस्था आहे त्यांनी ठिबक पद्धतीने झाडाच्या बुंध्याजवळ पाणी द्यावे. झाडाच्या बुंध्याजवळ, आळ््यात पालापाचोळ््याचे मल्चिंग आवरण टाकावे.

 

टॅग्स :Akolaअकोलाagricultureशेती