शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 2047 पर्यंत देशाचे नेतृत्व करावे, आजवर असा नेता पाहिला नाही..." - मुकेश अंबानी
2
लोकांच्या हातात जादाचे २ लाख कोटी उरणार; जीएसटी कपातीवर अर्थमंत्र्यांचा अंदाज
3
२५,००० रुपयांच्या पगारात आलिशान कार अन् फ्लॅट शक्य आहे! तज्ज्ञांनी सांगितलं गुंतवणुकीचं सूत्र
4
याला म्हणतात नशीब! आदिवासी महिलेला सापडले ३ मौल्यवान हिरे; रातोरात झाली लखपती
5
GST कपाती नंतर मध्यमवर्गींना आणखी एक भेट मिळणार? ऑक्टोबरमध्ये RBI घेणार मोठा निर्णय
6
'या' कंपनीनं अचानक बंद केला आपला व्यवसाय, आता शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१३१ वर आला भाव
7
एटापल्लीच्या जंगलात पोलीस आणि नक्षलवाद्यांत जोरदार चकमक, दोन महिला माओवाद्यांना मारण्यात यश
8
पितृपक्ष २०२५ गुरुपुष्यामृत योग: लक्ष्मी-स्वामींची कायम कृपा, ५ गोष्टी करा, लाभ-पुण्य मिळवा!
9
टेस्लाने जे मॉडेल भारतात लाँच केले, त्याच्या काचा फोडून बाहेर पडतायत अमेरिकेतील लोक...
10
देशभरात तपासणी अन् औषधे मोफत; पीएम मोदींच्या हस्ते ‘स्वस्थ नारी योजने’चा शुभारंभ
11
पितृपक्ष २०२५: पितृपक्षात मृत्यू येणे चांगले, पण अंत्यविधिला गेल्यावर स्मशानात काढू नका 'हे' शब्द
12
गोव्याच्या मनोहर पर्रीकरांचे नाव येताच रोखठोक अजितदादा निरुत्तर का झाले असावे? चर्चांना उधाण
13
पितृपक्ष २०२५: केवळ ५ मिनिटे गुरुपुष्यामृत योग, या दिवशी नेमके काय करावे? पाहा, सविस्तर
14
"महाराष्ट्र पेटवण्याचा डाव..."; मीनाताई ठाकरे पुतळ्याची पाहणी, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केल्या २ शंका
15
Smriti Mandhana Equals World Record : ऑस्ट्रेलियाविरुद्ध वनडे क्वीन स्मृती मानधनाची विक्रमी सेंच्युरी
16
Solar Eclipse 2025: सावधान! सूर्यग्रहण भारतात नाही दिसणार, पण 'या' ६ राशींवर प्रभाव टाकणार!
17
आयफोन १७ प्रो मॅक्सच्या 'या' कलरची क्रेझ; विक्री सुरू होण्याआधीच आउट ऑफ स्टॉक!
18
कॅन्सरच्या उपचारामुळे केस गळती, अभिनेत्रीने सांगितला भीतीदायक अनुभव, म्हणाली- "अंघोळ केल्यानंतर १०-१५ मिनिटे..."
19
'मोदीजी, संपूर्ण रात्र झोपले नाही, त्यांचा कंठ दाटून आला होता'; शिवराज सिंह चौहानांनी सांगितला १९९२-९२ मधील किस्सा
20
"प्रत्येक दुकानावर बोर्ड असायला हवा, 'गर्व से कहो...!'"; वाढदिवसानिमित्त पंतप्रधान मोदींचं मोठं आवाहन

खरिपात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 17:45 IST

: यावर्षीच्या खरीप हंगामात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार असून, शेतकºयांनीदेखील त्यादृष्टीने तयारी केली आहे

अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार असून, शेतकºयांनीदेखील त्यादृष्टीने तयारी केली आहे. भुईमुगाला यावर्षी आधारभूत किंमतदेखील वाढवून मिळाली आहे. यानुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भुईमुगावर नवे संशोधन केले आहे. भरघोस उत्पादन देणारे हे वाण लवकरच शेतकºयांना मिळणार आहे. खरीप हंगामात राज्यात अडीच ते तीन लाख हेक्­टर भुईमुगाचे क्षेत्र आहे. त्या तुलनेत विदर्भात खरिपाचे कमी तर उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र सर्वाधिक आहे; परंतु यावर्षी विदर्भातदेखील खरीप भुईमूग पेरणीकडे शेतकºयांचा कल आहे. १९७० च्या दशकात विदर्भात हे प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकरी घेत होते; परंतु सोयाबीन, मका आदी पिके आल्याने तसेच भुईमुगाला दरही कमी असल्याने शेतकºयांनी या पिकाकडे दुर्लक्ष केले होते; परंतु आता पुन्हा भुईमूग पिकाकडे शेतकरी वळताना दिसत आहेत. हजारो शेतकºयांनी सोयाबीन कमी करून भुईमूग पेरणीचे नियोजन केले आहे. भुईमुगाला सध्या ५ हजार २७५ रुपये प्रति क्विंटल दर आहेत. यावर्षीच्या एमएसपीनुसार यात १८५ रुपयांची वाढ झाली आहे. शेतकºयांसाठी ही सकारात्मक बाब आहे. यावर्षी शेतकºयांनी सोयाबीनसोबत भुईमूग पेरणीचे नियोजन केले आहे. ज्यांनी दहा एकर सोयाबीन पेरणीचे नियोजन केले होते, त्यामध्ये आता २ ते ३ एकर भुईमूग लागवड केली जाणार असल्याचा विश्वास कृषी शास्त्रज्ञांना आहे. शेतकरी या दृष्टीने कृषी विद्यापीठाकडे विचारणा करीत आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने आतापर्यंत ६ ते ७ भुईमुगाच्या जाती संशोधित केल्या आहेत. टीएजी -२४, एकेए- १५९, पीडीकेव्ही-३३५, एके-२६५, ३०३ या या भुईमुगाच्या जातींचा समावेश आहे. टीएजी-२४ या बियाण्याचे उत्पादन हेक्टरी १४ ते १५ क्विंटल आहे. या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी कृषी विद्यापीठाच्या तेलबिया विभागाने एका नवीन जातीवर संशोधन केले असून, लवकरच ही जात शेतकºयांना पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे. या जातीपासून १६ टक्के अधिक उत्पादन मिळणार आहे. विशेष म्हणजे, भुईमुगापासून मिळणारा चारा हा जनावरांसाठी अत्यंत उत्तम आहे. यामुळेच यावर्षी शेतकरी लागवडीचे नियोजन करीत आहेत. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञही भुईमूग बियाणे पेरणीसाठी शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत.

खरीप हंगामात विदर्भापेक्षा उर्वरित राज्यात २ लाख ५० हजार हेक्टरवर भुईमुगाचे पीक घेतले जाते. विदर्भात उन्हाळी भुईमूग मोठ्या प्रमाणात घेतला जातो; परंतु आता खरीप हंगामातही विदर्भात क्षेत्र वाढणार आहे. शेतकºयांना यासंदर्भात मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. त्यांना याबाबत मार्गदर्शनही करण्यात येत आहे.

- डॉ. मनीष लाडोळे, भुईमूग शास्त्रज्ञ, तेलबिया विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ