शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

खरिपात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 17:45 IST

: यावर्षीच्या खरीप हंगामात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार असून, शेतकºयांनीदेखील त्यादृष्टीने तयारी केली आहे

अकोला: यावर्षीच्या खरीप हंगामात भुईमुगाचे क्षेत्र वाढणार असून, शेतकºयांनीदेखील त्यादृष्टीने तयारी केली आहे. भुईमुगाला यावर्षी आधारभूत किंमतदेखील वाढवून मिळाली आहे. यानुषंगाने डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भुईमुगावर नवे संशोधन केले आहे. भरघोस उत्पादन देणारे हे वाण लवकरच शेतकºयांना मिळणार आहे. खरीप हंगामात राज्यात अडीच ते तीन लाख हेक्­टर भुईमुगाचे क्षेत्र आहे. त्या तुलनेत विदर्भात खरिपाचे कमी तर उन्हाळी भुईमुगाचे क्षेत्र सर्वाधिक आहे; परंतु यावर्षी विदर्भातदेखील खरीप भुईमूग पेरणीकडे शेतकºयांचा कल आहे. १९७० च्या दशकात विदर्भात हे प्रमुख नगदी पीक म्हणून शेतकरी घेत होते; परंतु सोयाबीन, मका आदी पिके आल्याने तसेच भुईमुगाला दरही कमी असल्याने शेतकºयांनी या पिकाकडे दुर्लक्ष केले होते; परंतु आता पुन्हा भुईमूग पिकाकडे शेतकरी वळताना दिसत आहेत. हजारो शेतकºयांनी सोयाबीन कमी करून भुईमूग पेरणीचे नियोजन केले आहे. भुईमुगाला सध्या ५ हजार २७५ रुपये प्रति क्विंटल दर आहेत. यावर्षीच्या एमएसपीनुसार यात १८५ रुपयांची वाढ झाली आहे. शेतकºयांसाठी ही सकारात्मक बाब आहे. यावर्षी शेतकºयांनी सोयाबीनसोबत भुईमूग पेरणीचे नियोजन केले आहे. ज्यांनी दहा एकर सोयाबीन पेरणीचे नियोजन केले होते, त्यामध्ये आता २ ते ३ एकर भुईमूग लागवड केली जाणार असल्याचा विश्वास कृषी शास्त्रज्ञांना आहे. शेतकरी या दृष्टीने कृषी विद्यापीठाकडे विचारणा करीत आहेत. या पृष्ठभूमीवर डॉ. पंजाबराव कृषी विद्यापीठाने आतापर्यंत ६ ते ७ भुईमुगाच्या जाती संशोधित केल्या आहेत. टीएजी -२४, एकेए- १५९, पीडीकेव्ही-३३५, एके-२६५, ३०३ या या भुईमुगाच्या जातींचा समावेश आहे. टीएजी-२४ या बियाण्याचे उत्पादन हेक्टरी १४ ते १५ क्विंटल आहे. या उत्पादनात वाढ व्हावी, यासाठी कृषी विद्यापीठाच्या तेलबिया विभागाने एका नवीन जातीवर संशोधन केले असून, लवकरच ही जात शेतकºयांना पेरणीसाठी उपलब्ध होणार आहे. या जातीपासून १६ टक्के अधिक उत्पादन मिळणार आहे. विशेष म्हणजे, भुईमुगापासून मिळणारा चारा हा जनावरांसाठी अत्यंत उत्तम आहे. यामुळेच यावर्षी शेतकरी लागवडीचे नियोजन करीत आहेत. कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञही भुईमूग बियाणे पेरणीसाठी शेतकºयांना मार्गदर्शन करीत आहेत.

खरीप हंगामात विदर्भापेक्षा उर्वरित राज्यात २ लाख ५० हजार हेक्टरवर भुईमुगाचे पीक घेतले जाते. विदर्भात उन्हाळी भुईमूग मोठ्या प्रमाणात घेतला जातो; परंतु आता खरीप हंगामातही विदर्भात क्षेत्र वाढणार आहे. शेतकºयांना यासंदर्भात मोठ्या प्रमाणात विचारणा केली जात आहे. त्यांना याबाबत मार्गदर्शनही करण्यात येत आहे.

- डॉ. मनीष लाडोळे, भुईमूग शास्त्रज्ञ, तेलबिया विभाग, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाagricultureशेतीDr. Punjabrao Deshmukh Krushi Vidhyapithडॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ