शहरं
Join us  
Trending Stories
1
"इराणने आता शांततेच्या मार्गावर यावे, अन्यथा...", अणुकेंद्रांवरील हल्ल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा सक्त इशारा  
2
"अमेरिकेच्या हल्ल्यानंतरही आमचे अणुऊर्जा प्रकल्प सुरक्षित"; इराणने दिली माहिती, ट्रम्प यांचा दावा फेटाळला
3
VIDEO: इराणवर हल्ले सुरुच; अमेरिकेने दिलेली लढाऊ विमाने इस्रायलने केली नष्ट
4
नोकऱ्या आल्या धोक्यात! सरकार शिक्षकांना म्हणते, ‘देता आधार, का करू अंधार’
5
पुढच्या आठवड्यात बाजारात १२ कंपन्यांचे IPO, १५,८०० कोटींची उलाढाल! तुमच्यासाठी 'ही' सुवर्णसंधी!
6
अमेरिकेचा प्रत्येक नागरिक आणि सैनिक आमच्या निशाण्यावर, अणुकेंद्रावर हल्ल्यानंतर इराणचा थेट इशारा  
7
US Airstrikes Iran: तीन अणुऊर्जा केंद्रावर बॉम्बचा वर्षाव, अमेरिकेने इराणवर हवाई हल्ला कसा केला?
8
मी अजूनही ठाकरेंसोबत; तेजस्वी घोसाळकरांचे स्पष्टीकरण, राजकीय वळण न देण्याचे केले आवाहन 
9
"आधी ताकद दाखवली जाते, मग..."; अमेरिकेच्या हल्ल्यांवर इस्रायलने व्यक्त केला आनंद, नेतान्याहू म्हणाले, "धन्यवाद ट्रम्प"
10
मुंबई, चेन्नईत सीबीआयचे छापे; ८०० कोटींच्या भ्रष्टाचार, जेएनपीएच्या माजी मुख्य व्यवस्थापकासह चौघांवर गुन्हा
11
आजचे राशीभविष्य - २२ जून २०२५, मान-प्रतिष्ठा ह्यात वाढ झाल्याने आपण आनंदित व्हाल
12
America Iran: अमेरिकेचा इराणमध्ये घुसून हल्ला! अनेक अणुऊर्जा केंद्रावर टाकले बॉम्ब; ट्रम्प म्हणाले, "आता..."
13
विशेष लेख: शिंदे-ठाकरे दोघांना भांडू द्या, तुम्ही निवडून कसे येणार हे बघा!
14
विमान कर्मचारी वेळापत्रकात आढळल्या गंभीर त्रुटी, एअर इंडियाच्या तीन अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश
15
'मला नोबेल मिळणार नाही'; डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत
16
हिंदी भाषा पुस्तकांच्या छपाईचे आदेशच नाहीत, कच्च्या आराखड्यास अंतिम मान्यताच नाही
17
लेख: पूल कोसळला, रेल्वेतून पडून मृत्यू... जे जबाबदार, तेच बेजबाबदार म्हणून या आपत्ती
18
विशेष लेख: कुंभमेळ्याचं नवं स्टेटस! येणार ‘रील’वाली गर्दी
19
कर्जमाफीचा निर्णय योग्य वेळी घेणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
20
अटल सेतूवर खड्डे! कंत्राटदाराला २० लाखांचा दंड; पाऊस, तेल गळतीमुळे प्रकार 

वन्यप्राण्यांमुळे भुईमूग व कांदा पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST

भुईमुगाच्या पिकांमध्ये रानडुकरे धुडगूस घालत असून, पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे पिकांची ...

भुईमुगाच्या पिकांमध्ये रानडुकरे धुडगूस घालत असून, पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे पिकांची राखणदारी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातच रात्रंदिवस मुक्काम करण्याची वेळ आली आहे. परिसरात नीलगाय, हरणांचे कळप, रानडुकरे मोठ्या प्रमाणात असून, शेतातील पिकांमध्ये शिरून नुकसान करीत आहेत. याबाबत वन व वन्यजीव विभागाकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु वनविभागाने दखल घेतली नाही. रानडुकरे अचानक हल्ला करीत असल्याने, शेतातील पिकांच्या रखवाली करण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्रंदिवस मुक्काम करून शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागत आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पिकांची राखणदारी करताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाडेगाव

परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राणी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे पिकांची रक्षण करण्याठी रात्रीला शेतात मुक्काम करावा लागत आहे.

-अनंता रामराव काळे, शेतकरी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा.

-प्रवीण सुरेश लोखंडे, शेतकरी वाडेगाव

परिसरात वन्यप्राण्यांनी धुडगूस घातला असून, पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे रात्रीला शेतात मुक्कामाला जावे लागत आहे. वन्य प्राण्यांनी पिकांची नासधूस केल्यानंतरही वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येत नाही.

-पुरुषोत्तम दुतोंडे,

शेतकरी बेलुरा