शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

वन्यप्राण्यांमुळे भुईमूग व कांदा पिके धोक्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:19 IST

भुईमुगाच्या पिकांमध्ये रानडुकरे धुडगूस घालत असून, पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे पिकांची ...

भुईमुगाच्या पिकांमध्ये रानडुकरे धुडगूस घालत असून, पिकांचे नुकसान करीत असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. त्यामुळे पिकांची राखणदारी करण्यासाठी शेतकऱ्यांना शेतातच रात्रंदिवस मुक्काम करण्याची वेळ आली आहे. परिसरात नीलगाय, हरणांचे कळप, रानडुकरे मोठ्या प्रमाणात असून, शेतातील पिकांमध्ये शिरून नुकसान करीत आहेत. याबाबत वन व वन्यजीव विभागाकडे अनेकदा तक्रार करण्यात आली. परंतु वनविभागाने दखल घेतली नाही. रानडुकरे अचानक हल्ला करीत असल्याने, शेतातील पिकांच्या रखवाली करण्यासाठी शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून रात्रंदिवस मुक्काम करून शेतातील पिकांचे संरक्षण करावे लागत आहेत. त्यामुळे रात्रीच्या सुमारास पिकांची राखणदारी करताना अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.

वाडेगाव

परिसरात वन्यप्राण्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. वन्यप्राणी शेतांमध्ये शिरून पिकांचे नुकसान करतात. त्यामुळे पिकांची रक्षण करण्याठी रात्रीला शेतात मुक्काम करावा लागत आहे.

-अनंता रामराव काळे, शेतकरी

वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात शेतकरी गंभीर जखमी झाल्याच्या घटना परिसरात घडल्या आहेत. त्यामुळे वन्यप्राण्यांचा वनविभागाने बंदोबस्त करावा.

-प्रवीण सुरेश लोखंडे, शेतकरी वाडेगाव

परिसरात वन्यप्राण्यांनी धुडगूस घातला असून, पिकांची नासधूस करीत आहेत. त्यामुळे रात्रीला शेतात मुक्कामाला जावे लागत आहे. वन्य प्राण्यांनी पिकांची नासधूस केल्यानंतरही वनविभागाकडून नुकसान भरपाई देण्यात येत नाही.

-पुरुषोत्तम दुतोंडे,

शेतकरी बेलुरा