शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रत्येक खासदाराला १५ कोटी देऊन भाजपाने मत खरेदी केले"; 'व्होट क्रॉसिंग'वर सर्वात मोठा दावा
2
खुद्द लष्करप्रमुखांनी विनवलं, तब्बल १५ तास महाचर्चा अन् सुशीला कार्कींचा PM पदासाठी होकार! Inside Story
3
जीएसटी काटके...! महिंद्रा, सोनालिका, जॉन डीअर ट्रॅक्टरची किंमत कितीने कमी होणार? 
4
ईडीचे १२ ठिकाणी छापे, यशवंत सावंतांच्या घरी सापडलं घबाड; ७२ लाखांची रोकड, ७ लग्झरी कार जप्त
5
रशिया- युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतीयांची फसवणूक, जबरदस्ती सैन्यात भरती केल्याची माहिती
6
तेजस्वी यादवांविरोधात लढण्याची केली होती तयारी, आता भररस्त्यात झाली हत्या, कोण होते राजकुमार राय? 
7
आईनं सोडलं, शिक्षणही सुटलं; तरीही उभं केलं ₹३३ लाख कोटींचं साम्राज्य; कसा आहे लॅरी एलिसन यांचा प्रवास?
8
मित्रासोबत मिळून बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडवर केला अत्याचार; गुन्हा लपवण्यासाठी केलं असं काही की ऐकून होईल संताप!
9
Nepal Crisis : नेपाळच्या लष्करप्रमुखांनी राष्ट्राला संबोधले, मागे हिंदू राजांचा फोटो, नेमके राजकारण काय?
10
Pitru Paksha 2025: पितृदोष दूर केला नाही तर किती पिढ्यांना त्रास होतो? गरुड पुराणात सापडते उत्तर!
11
मुंबईत घडलंय! मुलीच्या बॉयफ्रेंडसोबत आईचेच प्रेमसंबंध, १० लाखांचे दागिने विकून पळून जाण्याचा प्लॅन; पण...
12
रशियन नोकऱ्या स्वीकारू नका; जीवावर बेतू शकतं... परराष्ट्र मंत्रालयाचा भारतीयांना थेट इशारा
13
ना चीनला पळाले, ना दुबईत गेले; 'या' सीक्रेट जागेवर लपलेत नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली!
14
Thane Fraud: पोलिसालाही ‘तो’ शेअर्स महागात, कोट्यवधीचा ऑनलाइन डल्ला
15
IPS Archit Chandak : देशसेवेचं स्वप्न! तब्बल ३५ लाखांचं पॅकेज नाकारलं अन् पहिल्याच प्रयत्नात IPS, पत्नीही आहे IAS
16
iPhone 17 Series:'फोल्ड करून दाखवा', आयफोन १७ सिरीज लाँच होताच सॅमसंगने अ‍ॅपलची खिल्ली उडवली
17
"घाई काय आहे, अजिबात नाही"; भारत-पाक सामन्यावर सुप्रीम कोर्टाने दिला तीन वाक्यात निकाल
18
एफडी विसरा... पोस्ट ऑफिसच्या 'या' योजनेत ५.५५ लाख रुपयांचा फिक्स परतावा; दरमहा मिळेल व्याज
19
Navya Malik : आधी मैत्री, मग ग्राहक बनवायची; नेत्यांच्या मुलांना केलं वेडं, ड्रग्ज क्वीनने ८५० श्रीमंतांना लावलं व्यसन
20
फ्रान्समध्ये सरकारविरोधात लाखो लोक रस्त्यावर का उतरले? चार कारणे समजून घ्या

अडोशी येथे भीषण पाणीटंचाई

By admin | Updated: June 19, 2017 04:44 IST

पाणीपुरवठा विभागाच्या अभियंत्यासमोर ग्रामस्थांनी मांडली व्यथा.

लोकमत न्यूज नेटवर्कबाळापूर : तालुक्यातील अडोशी येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती होत आहे. पाणीटंचाईने त्रस्त ग्रामस्थांनी पाणीपुरवठा विभागाचे शाखा अभियंता व ग्रामपंचायत पदाधिकार्‍यासंमोर घागरी फोडून आपल्या व्यथा मांडल्या. जोगलखेड गट ग्रामपंचायत अंतर्गत येत असलेल्या व ३00 लोकांची वस्ती असलेल्या अडोशी येथे गेल्या काही दिवसांपासून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे. गावात पाणीपुरवठा करण्यासाठी कुठलीही योजना नाही. गावात पाण्याचे इतर स्रोतही नसल्याने ग्रामस्थांना बाराही महिने पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. चार ते पाच कि.मी. अंतरावरून ग्रामस्थ मिळेल त्या साधनाने पाणी आणत आहेत. गावात पाणीटंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून ग्रामस्थ करीत आहेत; मात्र त्याकडे अधिकारी आणि पदाधिकार्‍यांचे दुर्लक्ष होत आहे. गावात पाणीपुरवठा सुरू करण्यासाठी ४ ते ५ कि.मी. अंतरावरून पाइपलाइन टाकण्याची गरज आहे; मात्र निधी नसल्याने गावात पाइपलाइन टाकण्यात आलेली नाही. सध्या गावात भास्कर गावंडे यांच्या विहिरीवरून पाणीपुरवठा करण्यात येत आहे. पाण्याची पातळी खोल गेल्याने पाणीटंचाई जाणवणार आहे. पाणीटंचाईचे चटके सहन करणार्‍या ग्रामस्थांनी पाणीपुरवठा योजनेचे शाखा अभियंता मिलिंद जाधव, सरंपच गीता भरणे, उपसरपंच संगीता वाघ, सचिव काळे यांच्यासमोर महिलांनी घागरी फोडून आपला संताप व्यक्त केला, तसेच पाणीपुरवठय़ावर उपाययोजना करण्याची मागणी केली.