शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

विदर्भातील भूजल पातळी दोन मीटरच्यावर घटली!

By admin | Updated: May 7, 2017 02:42 IST

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा निष्कर्ष.

राजरत्न सिरसाटअकोला : विदर्भातील पाऊस अनिश्‍चित स्वरू पाचा झाला आहे. सलग दहा वर्षांपासून सरासरी पावसाचे प्रमाण कमी झाल्याने या भागातील पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष निर्माण झाले आहे. मागच्यावर्षी पावसाने साथ दिली; पण पाणी अडविण्यासाठीचे उपचार न झाल्याने भूगर्भपातळी सरासरी दोन मीटरच्यावर घसरली असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. जेथे जलसंवर्धन उपचाराची कामे झाली तेथे मात्र भूगर्भपातळीत सुधारणा झाल्याचे निष्कर्ष डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने काढले आहे.या अल्प पावसाचा सर्वाधिक फटका पश्‍चिम विदर्भात शापित खारपाणपट्टय़ाला सोसावा लागत आहे. खारपाणपट्टय़ातील आम्ल,फ्लोराईडयुक्त खारे पाणी पिण्यासाठी योग्य नसून, या पाण्यात शेती करणे कठीण झाल्याने शेतकर्‍यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. यातच भूगर्भ पातळीतून अनेक प्रकारे अव्याहतपणे पाणी उपसले जात असल्याने भूगर्भातील पाण्याची पातळी आणखी खालावत चालली आहे.पश्‍चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्‍चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४0 ते ५0 किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८९४ गावे या खारपाणपट्टय़ात मोडतात. सुमारे तीन लाख हेक्टरचे हे क्षेत्र असून, इतर महसूल विभागांच्या तुलनेत अमरावती विभागातील सिंचन क्षेत्र १0 टक्क्य़ांच्या आत आहे. नेमके याच भागात सरासरी पाऊस पडण्याचे प्रमाण घसरले आहे. परिणामी, भूगर्भ पातळीत जलपुनर्भरण होत नसल्याने या भागातील विहिरी, हातपंपाचे पाणी आटत चालले आहे. पश्‍चिम विदर्भातील पूर्णा नदीच्या पूर्व व पश्‍चिम अशा दोन्ही भागांनी साधारणत: ४0 ते ५0 किलोमीटर रुंद व १५५ कि.मी. लांब खारपाणपट्टा आहे. अकोला, बुलडाणा आणि अमरावती जिल्ह्यातील १६ तालुक्यांतील ८९४ गावे या खारपाणपट्टय़ात मोडतात. सुमारे तीन लाख हेक्टरचे हे क्षेत्र असून, इतर महसूल विभागांच्या तुलनेत अमरावती विभागातील सिंचन क्षेत्र १0 टक्क्य़ांच्या आत आहे. नेमके याच भागात सरासरी पाऊस पडण्याचे प्रमाण घसरले आहे. परिणामी, भूगर्भ पातळीत जलपुनर्भरण होत नसल्याने या भागातील विहिरी, हातपंपाचे पाणी आटत चालले आहे. अकोला जिल्हय़ाचे वार्षिक सरासरी पर्जन्यमान हे ७00 मि.मी. आहे. मागील वर्षी जून ते सप्टेंबरपर्यंत ७१८.१ मि.मी.पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस पूर्ण पावसाळ्य़ात १४४ तास ३८ मिनिटात पडला, तर ऑक्टोबर महिन्यात पाच दिवसात तसेच ११ तास ४२ मिनिटात ८९.७ मि.मी.पडला. म्हणजेच ४३ दिवसात जून ते ऑक्टोबर या कालावधीत ८0७.३ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.- पुनर्भरण झाले, पाणी पातळी वाढली !दरम्यान, डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या पानलोट क्षेत्रावर केलेल्या अभ्यासावरून काढण्यात आलेल्या निष्कर्षानुसार ज्या भागात शेती बांधबंधिस्ती, नाला खोलीकरण, साखळी पद्धतीने सिमेंट नाला बांध, अशी कामे झाली त्या शिवारातील विहिरींना बर्‍यापैकी जलसाठा आहे, अशा भागात सरासरी ४.७८ टक्के पावसाचे पाणी सरळ भूगर्भात जाऊन मिळाल्याने येथील पाणी पातळी बर्‍यापैकी आहे; पण जेथे कामे झाली नाहीत तेथील पातळी हेक्टरी १४.५ मीटरपर्यंत खाली आली. -जेथे पुनर्भरणाची कामे झाली नाहीत, तेथील म्हणजेच अकोला जिल्हय़ातील नव्हे, तर विदर्भातील पाण्याची पातळी यावर्षी सरासरी दोन मीटरने घसरली असल्याचा एका अभ्यासाअंती निष्कर्ष काढण्यात आला आहे. याकरिता मूलस्थानी जलसंधारण प्रभावीपणे राबवावे लागणार आहे.- डॉ. सुभाष टाले,विभाग प्रमुख,मृदा व जलसंधारण अभियांत्रिकी , डॉ.पंदेकृवि,अकोला.