शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

संचारबंदीचा गैरफायदा : किराणा दुकानदारांकडून लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2020 11:16 IST

तूर डाळ तर चक्क १२५ रुपये किलोच्या दरापर्यंत विकल्या जात आहे.

अकोला : देशभरात कोरोनाचा कहर झाल्याने गत २२ मार्चपासून राज्यात संचारबंदी लागू झाली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा पडणार नाही, असे जरी शासनाकडून बोलले जात असले तरी सर्वसामान्य माणसाचे दोन्हीकडून मरण होत आहे. घरात डाळदाणा भरण्यासाठी नागरिक जेव्हा किराणा दुकानांवर पोहोचत आहे, तेव्हा त्यांना लुटीचा सामना करावा लागत आहे. तूर डाळ तर चक्क १२५ रुपये किलोच्या दरापर्यंत विकल्या जात आहे. कोराना संचारबंदीच्या नावाने होणारी लूट थांबवून जिल्हा पुरवठा विभागाने अन्न, धान्य आणि किराणाचे दर निश्चित करावेत, अशी मागणी जनतेकडून व्यक्त होत आहे.

असे झाले भाव...८०-८५ किलो रुपयांनी विकल्या जाणारी तूर डाळ चिल्लरमध्ये १२५ रुपये किलोच्या दराने विकल्या जात आहे. ३८ रुपये किलो विकल्या जाणारी साखर ४०-४२ रुपये किलो झाली आहे. ७८-८० रुपये किलोचे तेल आता शंभरी पार गेले आहे. मूग, उडीद, चणा, तांदूळ, गव्हाच्या भावातही मोठी वाढ झाली आहे.बड्या कंपनीची साठेबाजीएनसीडीईएक्ससह इतर काही मोठ्या कंपन्यांनी ही भाववाढ केल्याचे व्यापारी आणि दुकानदारांचे म्हणणे आहे. अकोला परिसरातील गोडाऊनमध्ये जवळपास ३० हजार मेट्रिक टन धान्यसाठा आहे. सोबतच इतर व्यापाऱ्यांनीदेखील मोठ्या प्रमाणात साठेबाजी केलेली आहे. या साठेबाजीतूनच संचारबंदीच्या काळात अडवणूक करून लूट केली जात आहे.

अशा काळात कुणी साठेबाजी करून नागरिकांना लुटण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांच्यावर जिल्हा प्रशासनाने कठोर कारवाई करावी. एकीकडे संपूर्ण देश एकमेकांच्या मदतीसाठी धावत आहे. दुसरीकडे जर कुणी या काळाचा गैरफायदा घेऊन लुटण्याचा प्रयत्न करीत असेल तर मानवतेच्या विरोधात ही बाब आहे. जिल्हाधिकारी यांच्याकडे आम्ही कारवाईची मागणी करू.- अशोक डालमिया, राष्ट्रीय सचिव, कॅट अकोला.

 

टॅग्स :AkolaअकोलाMarketबाजार