शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
PAK vs SL Live Streaming : 'करो वा मरो' लढत; पाकचा रेकॉर्ड भारी! पण तरी त्यांना असेल लंकेची धास्ती; कारण...
3
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
4
आता तुम्हीच ओपनिंगला जा! IND vs PAK मॅचनंतर इम्रान खान यांचा PCB अध्यक्ष नक्वी यांना 'यॉर्कर'
5
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
6
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
7
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
8
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
9
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
10
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
11
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
12
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
13
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
14
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
15
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
16
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
17
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
18
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
19
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
20
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले

शेतकर्‍यांच्या हरित स्वप्नावर अखेर फेरले पाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2017 01:25 IST

पावसाळा संपत आला, तरी दमदार सार्वत्रिक पाऊस  झालाच नसल्याने विदर्भातील खरीप पिके प्रभावित झाली असून,  सोयाबीन पिकावर एकाच वेळी तीन ते चार जातीच्या कि डींनी हल्ला  केल्याने १७ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर  परिणाम झाला आहे. राज्यातील पिकांची स्थितीही अशीच आहे. या  नैसर्गिक संकटामुळे शेती अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची  शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.

ठळक मुद्देविदर्भातील १७ लाख हेक्टरवरील सोयाबीन हातचे गेलेखरीप पिकांची स्थिती चिंताजनक

राजरत्न सिरसाट । लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : पावसाळा संपत आला, तरी दमदार सार्वत्रिक पाऊस  झालाच नसल्याने विदर्भातील खरीप पिके प्रभावित झाली असून,  सोयाबीन पिकावर एकाच वेळी तीन ते चार जातीच्या कि डींनी हल्ला  केल्याने १७ लाख हेक्टरवरील सोयाबीन पिकाच्या उत्पादनावर  परिणाम झाला आहे. राज्यातील पिकांची स्थितीही अशीच आहे. या  नैसर्गिक संकटामुळे शेती अर्थव्यवस्थेवर दूरगामी परिणाम होण्याची  शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली आहे.विदर्भात यावर्षी सुरुवातीपासूनच पावसाने पाठ फिरवली. जुलैमध्ये  थोडाफार पाऊस आल्याने शेतकर्‍यांनी पेरणीला सुरुवात केली, पण  पेरणीला तीन ते चार आठवडे उशीर झाला होता. त्यामुळे पिकांची स् िथती नाजूकच होती. पुन्हा पावसाचा दीर्घ खंड पडल्याने मुगाच्या  िपकावर प्रतिकूल परिणाम झालाच.सोयाबीनच्या पिकाला फुलोरा  आला होता; तथापि पाऊस आला नाही. ढगाळ वातावरण आणि  वाढलेले तापमान किडींना पोषक ठरले. सोयाबीन पिकांवर तर  चक्रीभुंगा, हेलीकोवर्पा आणि तंबाखूची पाने खाणार्‍या अळी,  किडींनी एकाचवेळी आक्रमण केल्याने हे पीक भुईसापट झाले आहे.  शेकडो शेतकर्‍यांनी या पिकावर नांगर फिरवला आहे. विदर्भात यावर्षी  १७ लाख हेक्टरवर सोयाबीन पीक आहे. यातील सर्वाधिक १३ लाख  ५१ हजार हेक्टर सोयाबीनची पेरणी पश्‍चिम विदर्भातील अकोला,  बुलडाणा, वाशिम, यवतमाळ व अमरावती जिल्हय़ात झालेली आहे.  या पाच जिल्हय़ांतच सर्वाधिक कमी पाऊस झाला आहे. पाऊसच  नसल्याने अर्धरब्बी पेरणी आता होणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.  एवढय़ात चागंला, दमदार पाऊस आल्यास रब्बी पेरणीला मात्र उ पयोगी पडू शकतो. त्यासाठी सर्वत्र पावसाची प्रतीक्षा आहे.  आता शे तकर्‍यांची सर्व भिस्त ही कापूस पिकावर आहे. ही पिके सध्या बर्‍या पैकी आहेत. पण, येत्या आठ ते दहा दिवसांत पावसाची नितांत गरज  आहे. पाऊस आल्यास बीटी कापसावर प्रतिकूल परिणाम होण्याची  शक्यता आहे. संरक्षित ओलितासाठी शेततळे, विहीरींमध्ये पाणीच  नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. 

सोयाबीन उत्पादनाने मोडला होता उच्चांकमागच्या वर्षी २0१६-१७ मध्ये सोयाबीन उत्पादनाने उच्चांक गाठला  होता. विदर्भात २५0.७२ लाख टन एवढे उत्पादन झाले, तर उत्पन्न  प्रतिहेक्टरी १४.४५ क्विंटल एवढे होते, त्या तुलनेत यावर्षी उत्पादन  सध्यातरी शून्य आहे.

पाऊस नसल्याने खरीप पिकांची स्थिती चिंताजनक असून, सोयाबीन  पिकांवर एकाचवेळी तीन प्रकारच्या किडींनी चाल केली आहे.  सर्वेक्षण सुरू  आहे; पण सोयाबीन पिकांचे उत्पादन प्रचंड घटण्याची  शक्यता आहे. - डॉ. मोहन खाकरे, ज्येष्ठ कृषी शास्त्रज्ञ, डॉ.पंदेकृवि, अकोला.-