शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
3
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
4
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
5
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
6
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
7
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
8
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
9
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
10
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
11
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
12
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
13
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
14
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
15
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
16
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
17
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
18
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
19
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
20
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल

महान पाटबंधारे विभागाचा कारभार ढेपाळला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2021 04:25 IST

प्रदीप गावंडे निहिदा : पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा विभाग आहे; मात्र महान पाटबंधारे विभागाचा कारभार ढेपाळल्याने शेतकरी वैतागले ...

प्रदीप गावंडे

निहिदा : पाटबंधारे विभाग शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा विभाग आहे; मात्र महान पाटबंधारे विभागाचा कारभार ढेपाळल्याने शेतकरी वैतागले आहेत. पाटबंधारे विभागातील अधिकारी, कर्मचारी नेहमीच गैरहजर राहत असल्याने कार्यालयात रिकाम्या खुर्च्या दिसून येतात. याकडे वरिष्ठांनी लक्ष देऊन शेतकऱ्यांच्या समस्या सोडविण्याची मागणी होत आहे.

महान पाटबंधारे विभागाअंतर्गत पिंजर, निहिदा परिसरातील पिंपळगाव चांभारे, पिंपळगाव हांडे, ईसापूर, सावरखेड, जनुना, मोझर खुर्द, घोटा, कानडी बाजार, घोंगा, मोरहळ असे दहा तलाव आहेत. या तलावातील पाण्याचा उपयोग शेतकरी सिंचनासाठी करतात. परिसरातील शेतीसाठी शेतकऱ्यांना कॅनोलच्या माध्यमातून पाणी पुरविण्याची जबाबदारी संबंधित शाखा अभियंत्यांची आहे; मात्र महान पाटबंधारे कार्यालयात अधिकारीच गैरहजर राहत असल्याने तसे होत नाही. याबाबत तक्रार देऊनही परिस्थिती जैसे थे असल्याने शेतकरी वैतागले आहेत. तलावाची दुरुस्ती करणे, तलावातील गाळ काढणे, त्या गाळाची विल्हेवाट लावणे, परिसर स्वच्छ ठेवणे, कॅनॉलची दुरुस्ती करणे, शेतकऱ्यांना सुरळीत पाणीपुरवठा करणे, शेतकऱ्यांच्या तक्रारीची दखल घेणे, अवैध कनेक्शन धारकाविरुद्ध कारवाई करणे, आदी जबाबदाऱ्या विभागाकडे आहे; मात्र कारभार ढेपाळल्याने शेतकरी त्रस्त झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. याबाबत कार्यकारी अभियंत्याशी संपर्क साधला असता, ते उपलब्ध होऊ शकले नाही.

-------------------------------------------------

महान पाटबंधारे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधून चौकशी करतो. त्वरित शेतकऱ्यांच्या समस्या दूर केल्या जातील.

- जयंत पाटील, जलसंपदा व पाटबंधारे मंत्री मुबई

--------------------------------------------

कानडी येथील तलावातून पात्र शेतकऱ्यांना नियमित पाणी मिळत नाही, अवैध कनेक्शन भरपूर असल्याने उपसा जास्त आहे. अधिकारी पाहणी करीत नसल्याने स्थिती बिकट आहे.

-डॉ. नरेश लोडम, शेतकरी, कानडी.

--------------------------------------------

सिंचनासाठी पाणी व्यवस्थित मिळत नाही, कॅनॉलची दुरुस्ती होत नाही. तसेच कार्यालयात अधिकारी गैरहजर असल्याने शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतो.

-विकास आनंदराव जाधव, शेतकरी, खेर्डा खुर्द.

------------------------------

महान पाटबंधारे विभागात अधिकारी, कर्मचारी नेहमी गैरहजर असतात. याबाबत विचारणा केली असता शेतकऱ्यांना अपमानास्पद वागणूक दिली जाते. वरिष्ठांनी लक्ष देऊन मुख्यालयी राहणारा अधिकारी द्यावा.

-किरण सतीश गावंडे, महिला शेतकरी तथा मा. प. स. सदस्या.