शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
3
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
4
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
5
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
6
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
7
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
8
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
9
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
10
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
11
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
12
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
13
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
14
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
15
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
16
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
17
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
18
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
19
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
20
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड

शेतकर्‍यांना १२ कोटींचे अनुदान

By admin | Updated: May 28, 2014 21:53 IST

वादळी वार्‍यासह झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या १३ हजार ६६४ शेतकर्‍यांना नुकसानीचे अनुदान देण्यासाठी १२ कोटी ४९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत.

मूर्तिजापूर: यंदा फेबु्रवारी आणि मार्च महिन्यात वादळी वार्‍यासह झालेली गारपीट आणि अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या १३ हजार ६६४ शेतकर्‍यांना नुकसानीचे अनुदान देण्यासाठी १२ कोटी ४९ लाख रुपये प्राप्त झाले आहेत. गेल्या खरीप हंगामात पिकांवर सतत नाराज असलेला निसर्ग रब्बी हंगामात अधिकच आक्र मक झाला आणि वादळी वार्‍यासह गारपीट, तसेच अवकाळी पावसामुळे तालुक्यातील ३ हजार ६४० हेक्टरवरील शेतीक्षेत्र बाधित झाले. या नैसर्गिक आपत्तीमुळे गहू, हरभरा या पिकांसह फळबागांचेही मोठे नुकसान होऊन शेतकरी पूर्णपणे हवालदिल झाला; परंतु अल्पसा का होईना शासनाने मदतीचा हात समोर केला असून, नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना अनुदान देण्यासाठी तालुक्यात १२ कोटी ४९ लाख रुपयांचा निधी आला आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्त शेतकर्‍यांच्या खात्यात २१ मे रोजी त्यांच्या वाट्याचे अनुदान जमा केले आहे. ज्या शेतकर्‍यांच्या खाते क्रमांकात चुका असतील, त्या दुरुस्तीची प्रक्रिया सध्या सुरू आहे. ज्या शेतकर्‍यांचे खाते क्रमांक बरोबर आहेत त्यांच्या खात्यात अनुदान जमा होणार आहे. तालुक्यातील १० हजार ९९९ शेतकरी हे अकोला अर्बन बँकेचे खातेदार असून, त्यांच्या खात्यावर सरळ अनुदान जमा करण्यात आले आहे. लोकसभा आचारसंहितेमुळे अनुदान मिळण्यास विलंब झाला असला तरी, शेतकर्‍यांना नेमके खरीप हंगामाच्या मशागतीसाठी अनुदान मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. बँकांनी आढेवेढे न घेता हे अनुदान त्वरित वितरित करावे, अशी मागणीसुद्धा शेतकर्‍यांकडून करण्यात येत आहे.