शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

हरभरा घोटाळा: पुन्हा आंधळी कोशिंबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात शेतकºयांच्या नावावर झालेल्या लाखो रुपयांच्या अनुदानित हरभरा बियाणे घोटाळ्यात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयादरम्यान पुन्हा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू झाला आहे. राज्याच्या कृषी विभागाने कृषी केंद्र संचालकांवर कारवाईसाठी केवळ संदर्भपत्र आणि चौकशी अहवालाची प्रत देत कारवाई करण्याचे म्हटले, तर प्रकरणातील न्यायालयीन ...

ठळक मुद्देकायदेशीर पुराव्यासाठी अधीक्षक कार्यालयाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात शेतकºयांच्या नावावर झालेल्या लाखो रुपयांच्या अनुदानित हरभरा बियाणे घोटाळ्यात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयादरम्यान पुन्हा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू झाला आहे. राज्याच्या कृषी विभागाने कृषी केंद्र संचालकांवर कारवाईसाठी केवळ संदर्भपत्र आणि चौकशी अहवालाची प्रत देत कारवाई करण्याचे म्हटले, तर प्रकरणातील न्यायालयीन कंगोरे लक्षात घेता त्यासाठी पुराव्यासह माहिती देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केल्याची माहिती आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शासनाने शेतकºयांना अनुदानित दरावर हरभरा बियाणे उपलब्ध केले. ते बियाणे पात्र शेतकºयांना न मिळता काही कृषी सेवा केंद्र संचालकांनी बनावट नावाच्या शेतकºयांना वाटप केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात ते बियाणे धान्य रूपात काळ्याबाजारात विकण्यात आले. त्यातून शासनाच्या लाखो रुपयांच्या अनुदानाला चुना लावण्यासोबतच काळ्याबाजारातील अधिक दराचा मलिदा कृषी केंद्र संचालकांनी लाटला.विभागीय कृषी सहसंचालकांच्या पथकाने केलेल्या चौकशीत २११ कृषी केंद्रांत हा घोटाळा कमी-अधिक प्रमाणात झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कृषी केंद्रांवर पुढील कारवाई करण्याचे पत्र अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने ५ जुलै रोजीच जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एच.जी. ममदे यांना पाठविले. त्या पत्रानुसार २० दिवसांनंतरही कुठलीच कारवाई का झाली नाही, याबाबत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला.याबाबत अधिक माहिती घेतली असता राज्याच्या कृषी विभागाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला केवळ पत्र आणि चौकशी अहवाल दिला. त्यावरून कृषी केंद्र संचालकांच्या परवान्यावर कारवाई करणे घिसाडघाईचे ठरेल, असा पवित्रा कृषी विकास अधिकारी ममदे यांनी घेतला.त्यामुळे पुढील कारवाई करण्यासाठी चौकशीतील संपूर्ण कागदपत्रे देण्याची मागणी त्यांनी कृषी विभागाकडे केली आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणात या दोन विभागाकडून आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू होण्याचे चित्र आहे.