शहरं
Join us  
Trending Stories
1
कामावरून परतणाऱ्या चाकरमान्यांचे हाल; ओव्हर हेड वायर तुटल्याने पश्चिम रेल्वेची वाहतूक ठप्प
2
धनुष्यबाणासोबत स्वप्नांच्या दिशेने; जालन्याच्या तेजल साळवेचा आशिया कपमध्ये सुवर्णवेध!
3
"डोनाल्ड ट्रम्प यांनी फोन केला आणि मला अमेरिकेत येण्याचे आमंत्रण दिले, मी नम्रपणे नाकारले"; पंतप्रधान मोदींनी सांगितलं कारण
4
"मरू तर एकत्रच"; वहिनीचा दीरावर जडला जीव, सासरच्यांनी फटकारताच दोघांनी खाल्लं विष
5
"चिंताजनक परिस्थिती..!", लोकलमधल्या गर्दीवर कोर्टाची टिप्पणी, मृत्यू रोखण्यासाठी कोणता सल्ला दिला? 
6
सोलर कंपनीच्या शेअर्समध्ये तुफानी तेजी, करतोय मालामाल; FTSE ग्लोबल इंडेक्समध्ये होऊ शकते कंपनीची एन्ट्री!
7
Operation Sindhu : इराणमध्ये अडकलेले १००० विद्यार्थी मायदेशी परतणार! भारतासाठी खुला केला हवाई मार्ग
8
माता न तू वैरिणी! बॉयफ्रेंडसोबत पळून जाण्यासाठी जन्मदात्या आईनेच २ मुलांना विष देऊन मारलं
9
जैस्वालचा आणखी एक 'यशस्वी' डाव! इंग्लंडमध्ये पहिल्याच टेस्टमध्ये भात्यातून आली बेस्ट खेळी
10
घरातून निघाले पण...; नवविवाहित जोडपे ६ दिवसांपासून बेपत्ता; पोलिसांचा शोध सुरू
11
इराणच्या मदतीला चीन धावला; युद्ध साहित्य घेऊन ड्रॅगनची तीन विमाने तेहरानमध्ये दाखल...
12
संतापजनक...! ब्रा नसेल तर परीक्षेला बसता येणार नाही, स्पर्शकरून होतेय तपासणी; विद्यापीठाचं अजब फर्मान, VIDEO व्हायरल 
13
फक्त ९९ पैशात जमीन! आधी TCS ला २१ एकरचा भूखंड, आता सरकारचा 'या' कंपनीसोबत करार
14
Tejasswi Prakash : "मला काही फरक पडत नाही"; ४ वर्षांनी नात्याला तडा, तेजस्वी प्रकाश-करण कुंद्राचं झालं ब्रेकअप?
15
IPL मधील टॉपर 'टेस्ट'मध्ये फेल; पदार्पणाच्या सामन्यात पदरी पडला भोपळा!
16
Iran Sejjil Missile: इराणची सेजिल मिसाईल किती विध्वंस करू शकते, का होतेय इतकी चर्चा?
17
'गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय', राहुल गांधींचा हल्लाबोल
18
एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्ष्याची धडक, परतीचे उड्डाण रद्द
19
ENG vs IND : केएल राहुल-यशस्वी जैस्वालची कमाल! ११ वर्षांत कुणाला जमलं नाही ते जोडीनं करुन दाखवलं
20
"मी प्लेन क्रॅश करेन..."; फ्लाईट अटेंडंटशी वाद झाल्यावर महिलेने घातला गोंधळ, दिली धमकी

हरभरा घोटाळा: पुन्हा आंधळी कोशिंबीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2017 02:26 IST

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात शेतकºयांच्या नावावर झालेल्या लाखो रुपयांच्या अनुदानित हरभरा बियाणे घोटाळ्यात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयादरम्यान पुन्हा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू झाला आहे. राज्याच्या कृषी विभागाने कृषी केंद्र संचालकांवर कारवाईसाठी केवळ संदर्भपत्र आणि चौकशी अहवालाची प्रत देत कारवाई करण्याचे म्हटले, तर प्रकरणातील न्यायालयीन ...

ठळक मुद्देकायदेशीर पुराव्यासाठी अधीक्षक कार्यालयाला पत्र

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्ह्यात शेतकºयांच्या नावावर झालेल्या लाखो रुपयांच्या अनुदानित हरभरा बियाणे घोटाळ्यात जिल्हा परिषदेचा कृषी विभाग आणि अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयादरम्यान पुन्हा आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू झाला आहे. राज्याच्या कृषी विभागाने कृषी केंद्र संचालकांवर कारवाईसाठी केवळ संदर्भपत्र आणि चौकशी अहवालाची प्रत देत कारवाई करण्याचे म्हटले, तर प्रकरणातील न्यायालयीन कंगोरे लक्षात घेता त्यासाठी पुराव्यासह माहिती देण्याची मागणी जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने केल्याची माहिती आहे.राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत शासनाने शेतकºयांना अनुदानित दरावर हरभरा बियाणे उपलब्ध केले. ते बियाणे पात्र शेतकºयांना न मिळता काही कृषी सेवा केंद्र संचालकांनी बनावट नावाच्या शेतकºयांना वाटप केल्याचे दाखविले. प्रत्यक्षात ते बियाणे धान्य रूपात काळ्याबाजारात विकण्यात आले. त्यातून शासनाच्या लाखो रुपयांच्या अनुदानाला चुना लावण्यासोबतच काळ्याबाजारातील अधिक दराचा मलिदा कृषी केंद्र संचालकांनी लाटला.विभागीय कृषी सहसंचालकांच्या पथकाने केलेल्या चौकशीत २११ कृषी केंद्रांत हा घोटाळा कमी-अधिक प्रमाणात झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार कृषी केंद्रांवर पुढील कारवाई करण्याचे पत्र अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने ५ जुलै रोजीच जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी एच.जी. ममदे यांना पाठविले. त्या पत्रानुसार २० दिवसांनंतरही कुठलीच कारवाई का झाली नाही, याबाबत स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी संताप व्यक्त केला.याबाबत अधिक माहिती घेतली असता राज्याच्या कृषी विभागाने जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाला केवळ पत्र आणि चौकशी अहवाल दिला. त्यावरून कृषी केंद्र संचालकांच्या परवान्यावर कारवाई करणे घिसाडघाईचे ठरेल, असा पवित्रा कृषी विकास अधिकारी ममदे यांनी घेतला.त्यामुळे पुढील कारवाई करण्यासाठी चौकशीतील संपूर्ण कागदपत्रे देण्याची मागणी त्यांनी कृषी विभागाकडे केली आहे. त्यामुळे पुन्हा या प्रकरणात या दोन विभागाकडून आंधळ्या कोशिंबिरीचा खेळ सुरू होण्याचे चित्र आहे.