शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

विद्यार्थ्यांच्या अहवालातून ग्रामपंचायतींचे पितळ उघडे

By admin | Updated: October 25, 2014 00:58 IST

३१ टक्केच झाडे जिवंत, वृक्षलागवडीची कामे झालीच नाहीत.

विवेक चांदूरकर /अकोलाजिल्ह्यात गावागावांमध्ये मग्रारोहयो अंतर्गत वृक्षलागवडीची कामे करण्यात आली. कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च झाल्यावरही झाड काही दिसेनात. त्यामुळे शासनाने या कामांची तपासणी शाळकरी विद्यार्थ्यांमार्फत करण्याचे ठरविले. या विद्यार्थ्यांनी आपल्या निष्पक्ष अहवालात जिल्ह्यातील ५३ कामांना निरंकचा शेरा दिल्याने ग्रामपंचायतींचे पितळ उघडे पडले आहे. मग्रारोहयो अंतर्गत जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ९३८ झाडांपैकी केवळ ५९ हजार ४७४ झाडेच जगली आहेत. ही टक्केवारी केवळ ३१.६४ आहे. परिणामी प्रशासनाच्या भुवया उंचावल्या असून, मग्रारोहयोच्या कामात किती भ्रष्टाचार होतो, हे उघडकीस आले आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण हमी योजना अंतर्गत ग्रामपंचायतींमार्फत जिल्ह्यात वृक्षलावगडीची कामे करण्यात आली. मात्र, मग्रारोहयोच्या कामात भ्रष्टाचार होतो. या प्रकरणांची तपासणी करणार्‍या अधिकार्‍यांनाही ह्यमॅनेजह्ण करण्यात येते. तपासणीनंतरही सत्य बाहेर येत नाही. त्यामुळे शासनाने या कामांची तपासणी करण्याची जबाबदारी राष्ट्रीय हरित सेनेच्या विद्यार्थ्यांवर सोपविली. त्याकरिता जिल्हास्तरावर एका समितीचे गठण करण्यात आले. या समितीने रोहयोच्या कामाचे मोजमाप व त्याचा अहवाल तयार करण्याकरिता प्रत्येक गावात दोन विद्यार्थी व एका शिक्षक असे पथक पाठविले. गावात किती कामे झाली व किती झाडे लावण्यात आली, याची माहिती तसेच एक तक्ताही विद्यार्थ्यांकडे देण्यात आला. या तक्त्यानुसार लावण्यात आलेली झाडे व प्रत्यक्ष असलेली झाडे यांची माहिती विद्यार्थ्यांनी गोळा केली. त्याच्याकडून खूप चांगले, निश्‍चित चांगले, समाधानकारक, असमाधानकारक, निरंक असे वर्गीकरण झाले. जिल्ह्यातील २0७ गावांमध्ये ७८ कामांचा असमाधानकारक, तर ५३ कामांना विद्यार्थ्यांनी निरंकचा शेरा दिला आहे. जिल्ह्यात १ लाख ८७ हजार ९३८ झाडांपैकी केवळ ५९ हजार ४७४ झाडेच जगली आहेत.