शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीत अविराेधवर भर, महाआघाडी नाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:18 IST

अकाेला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ लाख ८६ हजार ...

अकाेला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ लाख ८६ हजार २९१ मतदार ग्रामपंचायतींची सत्ता ठरविणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले. असले तरी राज्यातील महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यत नाहीच उलट राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक अविराेध करण्यासाठीच प्रयत्न सुरू केले आहेत.

ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तसेच पॅनल गठीत करून ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले सदस्यांचे संख्याबळ मिळविण्यासाठी गावागावांत गाव पुढाऱ्यांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मात्र यामध्ये राजकीय पक्षापेक्षा व्यक्तीचे वैयक्तिक संबंधांना जास्त महत्त्व असते राजकीय नेत्यांना आपले पाठीराखे सांभाळायचे असल्याने महाआघाडी केली तर उमेदवारी देण्याबाबत मर्यादा येणे स्वाभाविकच आहे. अशा स्थितीत स्वंतत्र लढणे किंवा अविराेध निवडणूक पार पाडण्याकडेच राजकीय नेत्यांचा कल आहे. वंचित बहुजन आघाडी, भाजप, शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस अशा विविध पक्षांतील कार्यकर्ते व नेते यांचे एकत्रित पॅनल हेच यावेळीही ग्रामपंंचायतीचे चित्र असेल.

स्थानिक संस्थांमध्ये ‘वंचित’चा दबदबा

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा दबदबा आहे पंचायत समितीसह जिल्ह्यातील माेठ्या ग्रामपंचायतींवर वंचितचा झेडा आहे त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे माेठे आव्हान इतर पक्षांसमाेर उभे ठाकणार आहे. त्या दुष्टीने इतर पक्षांना तयारी करावी लागणार आहे.

तिन्ही पक्ष एकत्र नाहीच

महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र लढतील अशी चर्चा हाेती प्रत्यक्षात मात्र हे तिन्ही वेगवेगळेच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत स्वतंत्र लढण्याचा पर्याय आहे.

लढल्यास काय परिणाम?

महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे ग्रामीण भागात चांगलेच वर्चस्व आहे. हे पक्ष एकत्र लढले, तर मतविभाजन टाळता येईल व ग्रामपंचयातवर ताबा मिळवणे शक्य हाेईल, मात्र उपलब्ध जागा आणी इच्छुकांची संख्या लक्षात घेता एकत्र लढले जाणार नाही त्यामुळे साहजिकच नेत्यांची अडचण हाेणार आहे.

ग्रा.पं. निवडणुकीत अविराेधाला बक्षीस

ग्रामपंचायत निवडणुक अविराेध केल्यास आमदारांनी ग्रामपंचायतीस विशेष निधी देण्याची घाेषणा केल्या आहेत. आमदार नितीन देशमुख यांनी ग्रामपंचायतच्या सदस्य संख्येच्या तुलनेत निधीची तरतूद केली जाईल असे जाहीर केल्याने ‘अविराेधाला बक्षीस’ असा नवा पायंडा या निवडणुकीत पडत आहे.