शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
3
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
4
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
5
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
6
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
7
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
8
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
9
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
10
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
11
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
12
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
13
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
14
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
15
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
16
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
17
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान
18
राहुल द्रविडनंतर तोच! चेतेश्वर पुजाराच्या टॉप-५ रेकॉर्ड ब्रेक इनिंग
19
Mahindra च्या नवीन SUV ला ग्राहकांचा प्रचंड प्रतिसाद; फक्त अडीच मिनिटांत बुक झाला स्टॉक
20
अरे देवा! मृताच्या कुटुंबाला ६ लाखांची मदत जाहीर; ६ महिला म्हणतात, "मीच यांची खरी बायको..."

ग्रामपंचायत निवडणुकीत अविराेधवर भर, महाआघाडी नाहीच !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:18 IST

अकाेला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ लाख ८६ हजार ...

अकाेला : जिल्ह्यातील २२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये ४ लाख ८६ हजार २९१ मतदार ग्रामपंचायतींची सत्ता ठरविणार आहेत. त्यामुळे ग्रामपंचायतींच्या निवडणुकांमध्ये मतदारांच्या भूमिकेकडे लक्ष लागले. असले तरी राज्यातील महाविकास आघाडी एकत्रित लढण्याची शक्यत नाहीच उलट राजकीय नेत्यांनी ग्रामपंचायत निवडणूक अविराेध करण्यासाठीच प्रयत्न सुरू केले आहेत.

ग्रामपंचायतींच्या क्षेत्रात निवडणूक लढविणाऱ्या इच्छुक उमेदवारांनी निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तसेच पॅनल गठीत करून ग्रामपंचायतींमध्ये सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेले सदस्यांचे संख्याबळ मिळविण्यासाठी गावागावांत गाव पुढाऱ्यांकडून मोर्चेबांधणी सुरू करण्यात आली आहे. मात्र यामध्ये राजकीय पक्षापेक्षा व्यक्तीचे वैयक्तिक संबंधांना जास्त महत्त्व असते राजकीय नेत्यांना आपले पाठीराखे सांभाळायचे असल्याने महाआघाडी केली तर उमेदवारी देण्याबाबत मर्यादा येणे स्वाभाविकच आहे. अशा स्थितीत स्वंतत्र लढणे किंवा अविराेध निवडणूक पार पाडण्याकडेच राजकीय नेत्यांचा कल आहे. वंचित बहुजन आघाडी, भाजप, शिवसेना, काॅंग्रेस, राष्ट्रवादी काॅंग्रेस अशा विविध पक्षांतील कार्यकर्ते व नेते यांचे एकत्रित पॅनल हेच यावेळीही ग्रामपंंचायतीचे चित्र असेल.

स्थानिक संस्थांमध्ये ‘वंचित’चा दबदबा

स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये वंचित बहुजन आघाडीचा दबदबा आहे पंचायत समितीसह जिल्ह्यातील माेठ्या ग्रामपंचायतींवर वंचितचा झेडा आहे त्यामुळे या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीचे माेठे आव्हान इतर पक्षांसमाेर उभे ठाकणार आहे. त्या दुष्टीने इतर पक्षांना तयारी करावी लागणार आहे.

तिन्ही पक्ष एकत्र नाहीच

महाविकास आघाडीने विधान परिषद निवडणुकीत मिळवलेल्या यशानंतर काॅंग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र लढतील अशी चर्चा हाेती प्रत्यक्षात मात्र हे तिन्ही वेगवेगळेच लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांना संधी देण्याबाबत स्वतंत्र लढण्याचा पर्याय आहे.

लढल्यास काय परिणाम?

महाविकास आघाडीमधील घटक पक्षांचे ग्रामीण भागात चांगलेच वर्चस्व आहे. हे पक्ष एकत्र लढले, तर मतविभाजन टाळता येईल व ग्रामपंचयातवर ताबा मिळवणे शक्य हाेईल, मात्र उपलब्ध जागा आणी इच्छुकांची संख्या लक्षात घेता एकत्र लढले जाणार नाही त्यामुळे साहजिकच नेत्यांची अडचण हाेणार आहे.

ग्रा.पं. निवडणुकीत अविराेधाला बक्षीस

ग्रामपंचायत निवडणुक अविराेध केल्यास आमदारांनी ग्रामपंचायतीस विशेष निधी देण्याची घाेषणा केल्या आहेत. आमदार नितीन देशमुख यांनी ग्रामपंचायतच्या सदस्य संख्येच्या तुलनेत निधीची तरतूद केली जाईल असे जाहीर केल्याने ‘अविराेधाला बक्षीस’ असा नवा पायंडा या निवडणुकीत पडत आहे.