शहरं
Join us  
Trending Stories
1
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
2
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
3
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
4
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
5
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
6
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
7
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण
8
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
9
लंकेत टीम इंडियाचा डंका! आधी स्नेह राणाचा जलवा! मग सृती, हरलीनसह प्रतिकानं लुटली मैफिल
10
BRICS ची महत्वपूर्ण बैठक; परराष्ट्र मंत्री अन् राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांची अनुपस्थिती, कारण काय...
11
राणा सांगा वाद! सपा खासदार रामजीलाल सुमन यांच्या ताफ्यावर हल्ला; अनेक वाहनांचे नुकसान...
12
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
13
खळबळजनक! भाजी बनवण्यासाठी मोठा बटाटा घेतला म्हणून पत्नीची कुऱ्हाडीने हत्या
14
एथर कंपनीसाठी बॅड न्यूज? ग्रे मार्केटमध्ये चांगले संकेत नाही, आयपीओ उघडण्यापूर्वीच जीएमपी क्रॅश
15
जरा थांबा! चमचमीत खाण्याच्या नादात 'या' गोष्टी गुपचूप वाढवताहेत तुमचं वजन, आरोग्यासही घातक
16
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
17
रेखा झुनझुनवाला ते खन्ना यांच्यासह ५ मोठ्या गुंतवणूकदारांची शेअर्स खरेदी, तुमच्या पोर्टफोलिओमध्येही आहे का?
18
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
19
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
20
लेडी सिंघम! डॉक्टरने पाहिलं UPSC चं स्वप्न; दिवसा रुग्णांवर उपचार अन् रात्री अभ्यास, झाली IPS

ग्रामपंचायत निवडणूक : उमेदवारांची एकच गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2020 04:20 IST

लोकमत न्यूज नेटवर्क अकाेला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात ३० डिसेंबर रोजी ...

लोकमत न्यूज नेटवर्क

अकाेला : जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी अर्थात ३० डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांचा पाऊस पडला. रात्री १० वाजेच्या अंदाजानुसार जवळपास ३,८१० उमेदवारी अर्ज दाखल झाले.

जिल्ह्यातील २२४ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कालावधी संपुष्टात आल्याने १५ जानेवारी रोजी मतदान होत आहे. २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याला सुरुवात झाली असून, शेवटच्या दिवशी ३० डिसेंबर रोजी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार व समर्थकांची एकच गर्दी झाली होती. उमेदवारी अर्जापासून कुणीही वंचित राहू नये म्हणून शेवटच्या दिवशी ऑफलाइन पद्धतीने अर्ज दाखल करण्याला परवानगी देण्यात आली होती. त्यानुसार अनेक उमेदवारांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर केले. ग्रामपंचायत निवडणूक आणि काेराेनाच्या प्रादुर्भावाची चिंता अशी दुहेरी कसरत करत प्रशासनाला ही निवडणूक पार पाडावी लागत आहे तसेच उमेदवारांनाही मतदारांशी संपर्क करताना काळजी घ्यावी लागेल आहे अर्ज भरताना काेराेना नियमांचे कुठेही पालन झालेले दिसले नाही त्यामुळे काेराेनाच्या प्रसाराची चिंता आहेच.

१५ जानेवारी रोजी फैसला

२२५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी १५ जानेवारी रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यामध्ये चार लाख ८६ हजार २९१ मतदार ग्रामपंचायतींची सत्ता ठरविणार आहेत. जिल्ह्यात ७७३ प्रभाग असून, २०५५ जागांसाठी उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ३१ डिसेंबर रोजी उमेदवारी अर्जांची छाननी होणार असून, ४ जानेवारी २०२१ रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यामुळे निवडणुकांमध्ये रंगत वाढली आहे.