शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीचा सोशल मीडियावर प्रचार जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

हातात मोबाइल,खर्च करायला डेटा आणि चौकात चर्चेचा अड्डा, असे सध्या ग्रामीण भागातील चित्र आहे. कोरोनामुळे तशीच बेरोजगारी आहे, त्यात ...

हातात मोबाइल,खर्च करायला डेटा आणि चौकात चर्चेचा अड्डा, असे सध्या ग्रामीण भागातील चित्र आहे. कोरोनामुळे तशीच बेरोजगारी आहे, त्यात निवांतपणा यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात राजकारणातील फुकटचे डोस देणाऱ्या तज्ज्ञांची जत्रा जिथे-तिथे भरू लागली आहे. गावातील तरुण मंडळी बस्तान मांडून यंदाच्या ग्रामपंचायतीवर काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आविसचे बसल्या जागीच झेंडे फडकवत आहेत. यंदा आमचा झेंडा, एवढाच त्यांचा अजेंडा असल्याचे दिसून येत असून वास्तविक पाहता या निवडणुकीमध्ये राजकारणातील आघाडीवर सर्वकाही अवलंबून असून, मोठ्या राजकीय पक्षापेक्षा स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक अवलंबून असते. त्याशिवाय गटबाजीचे राजकारण, जातीनिहाय बलाबल यावरही या निवडणुकांचे निकाल अवलंबून असतात. या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षाचा बैठकासुद्धा अंतिम टप्प्यात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यापासून तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील प्रत्येक वर्गामध्ये राजकीय धुराळा उडाला आहे. सहा महिने उशिराने निवडणूक होत असल्याने नागरिकांना वेळ मिळाला होता. कोरोनाच्या निमित्ताने गावात गस्त घालीत असताना तोच विषय गावात ऐकायला मिळत होता. आता अनपेक्षितपणे निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली, त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दमछाकही झाली. प्रचारासाठी दिवस कमी मिळाल्यामुळे सारेच भांबावले आहेत. तयारीला पुरेसा वेळ नाही, योग्य उमेदवार ठरवण्यासाठी संधी मिळाली नाही, त्यातच जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेळ नाही हे सारे गोंधळात टाकणारे चित्र गावात दिसून येत होते. आरक्षित घटकातील उमेदवार मिळविण्यासाठीसुद्धा तारेवरची कसरत करावी लागली. त्यातच निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सरपंचपदासाठी आरक्षण निवडणूक निकालानंतर ठरणार असल्याचे घोषित केल्याने निवडून आलेल्या सदस्यांतून सरपंच व उपसरपंच कसे काय ठरवावे, हाही एक चिंतेचा विषय झाला आहे. तोपर्यंत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये फूट तर पडणार नाही ना, याचीही काळजी असून, गावातील कोण कोण एकत्र येणार, याचे गणित अनेकजण जुळवत आहे. जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपंचायत, विधानसभा, लोकसभा या निवडणुकांत पक्षाचे चिन्ह त्या पक्षाचा झेंडा असतो. त्यावेळी काहीतरी ठाम भूमिका घ्‍यावी लागत असून, आपण कुठल्या पक्षात सामील आहोत याचे भान ठेवावे लागते. ग्रामपंचायतला तसे काहीच नाही, ग्रामपंचायत निवडणूक पक्षाचे झेंडे बाजूला ठेवूनच होणे अपेक्षित असते.

......................................

स्थानिक मुद्दे अधिक चर्चेत

गावविकासासाठी स्थानिक आघाड्याच निवडणूक लढवत असतात. त्यात भावकीचा वाद असतो. हे सारे जमले की मग पॅनल जमत असते. तिथे कोणी कितीही झेंडा फडकू देत, प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षापेक्षा स्थानिक मुद्दे अधिक चर्चेत येत असून, तशीच स्थिती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निर्माण झाली आहे.

...........................

सरपंचपदासाठी बंड हाेण्याची शक्यता

मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तसे पक्षसंघटनेला किंवा गाव पॅनलला मोठ्या प्रमाणात मतदान होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक संपल्यावर सरपंचपदासाठी आरक्षणानुसार निवड करण्यासाठी उमेदवारांमध्ये बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही डोकेदुखी कशी थांबवावी, हा मोठा प्रश्न सध्या राजकीय नेत्यांपुढे निर्माण झाला आहे.