शहरं
Join us  
Trending Stories
1
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
2
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
3
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
4
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
5
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
6
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
7
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
8
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
9
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
10
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
11
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
12
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
13
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
14
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
15
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
16
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
17
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
18
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
19
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
20
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
Daily Top 2Weekly Top 5

ग्रामपंचायत निवडणुकीचा सोशल मीडियावर प्रचार जोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:46 IST

हातात मोबाइल,खर्च करायला डेटा आणि चौकात चर्चेचा अड्डा, असे सध्या ग्रामीण भागातील चित्र आहे. कोरोनामुळे तशीच बेरोजगारी आहे, त्यात ...

हातात मोबाइल,खर्च करायला डेटा आणि चौकात चर्चेचा अड्डा, असे सध्या ग्रामीण भागातील चित्र आहे. कोरोनामुळे तशीच बेरोजगारी आहे, त्यात निवांतपणा यामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात राजकारणातील फुकटचे डोस देणाऱ्या तज्ज्ञांची जत्रा जिथे-तिथे भरू लागली आहे. गावातील तरुण मंडळी बस्तान मांडून यंदाच्या ग्रामपंचायतीवर काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, शिवसेना आविसचे बसल्या जागीच झेंडे फडकवत आहेत. यंदा आमचा झेंडा, एवढाच त्यांचा अजेंडा असल्याचे दिसून येत असून वास्तविक पाहता या निवडणुकीमध्ये राजकारणातील आघाडीवर सर्वकाही अवलंबून असून, मोठ्या राजकीय पक्षापेक्षा स्थानिक प्रश्नांवर ही निवडणूक अवलंबून असते. त्याशिवाय गटबाजीचे राजकारण, जातीनिहाय बलाबल यावरही या निवडणुकांचे निकाल अवलंबून असतात. या पार्श्‍वभूमीवर राजकीय पक्षाचा बैठकासुद्धा अंतिम टप्प्यात आहेत. ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा झाल्यापासून तालुक्यातील ग्रामपंचायतीमधील प्रत्येक वर्गामध्ये राजकीय धुराळा उडाला आहे. सहा महिने उशिराने निवडणूक होत असल्याने नागरिकांना वेळ मिळाला होता. कोरोनाच्या निमित्ताने गावात गस्त घालीत असताना तोच विषय गावात ऐकायला मिळत होता. आता अनपेक्षितपणे निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर केल्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली, त्याचबरोबर उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दमछाकही झाली. प्रचारासाठी दिवस कमी मिळाल्यामुळे सारेच भांबावले आहेत. तयारीला पुरेसा वेळ नाही, योग्य उमेदवार ठरवण्यासाठी संधी मिळाली नाही, त्यातच जातीचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी वेळ नाही हे सारे गोंधळात टाकणारे चित्र गावात दिसून येत होते. आरक्षित घटकातील उमेदवार मिळविण्यासाठीसुद्धा तारेवरची कसरत करावी लागली. त्यातच निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनेनुसार सरपंचपदासाठी आरक्षण निवडणूक निकालानंतर ठरणार असल्याचे घोषित केल्याने निवडून आलेल्या सदस्यांतून सरपंच व उपसरपंच कसे काय ठरवावे, हाही एक चिंतेचा विषय झाला आहे. तोपर्यंत निवडून आलेल्या सदस्यांमध्ये फूट तर पडणार नाही ना, याचीही काळजी असून, गावातील कोण कोण एकत्र येणार, याचे गणित अनेकजण जुळवत आहे. जिल्हा परिषद,पंचायत समिती, नगरपंचायत, विधानसभा, लोकसभा या निवडणुकांत पक्षाचे चिन्ह त्या पक्षाचा झेंडा असतो. त्यावेळी काहीतरी ठाम भूमिका घ्‍यावी लागत असून, आपण कुठल्या पक्षात सामील आहोत याचे भान ठेवावे लागते. ग्रामपंचायतला तसे काहीच नाही, ग्रामपंचायत निवडणूक पक्षाचे झेंडे बाजूला ठेवूनच होणे अपेक्षित असते.

......................................

स्थानिक मुद्दे अधिक चर्चेत

गावविकासासाठी स्थानिक आघाड्याच निवडणूक लढवत असतात. त्यात भावकीचा वाद असतो. हे सारे जमले की मग पॅनल जमत असते. तिथे कोणी कितीही झेंडा फडकू देत, प्रत्यक्ष निवडणुकीत पक्षापेक्षा स्थानिक मुद्दे अधिक चर्चेत येत असून, तशीच स्थिती तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीत निर्माण झाली आहे.

...........................

सरपंचपदासाठी बंड हाेण्याची शक्यता

मतदानाची तारीख जवळ येऊ लागली तसे पक्षसंघटनेला किंवा गाव पॅनलला मोठ्या प्रमाणात मतदान होणार याचीही चर्चा सुरू झाली आहे. निवडणूक संपल्यावर सरपंचपदासाठी आरक्षणानुसार निवड करण्यासाठी उमेदवारांमध्ये बंड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. ही डोकेदुखी कशी थांबवावी, हा मोठा प्रश्न सध्या राजकीय नेत्यांपुढे निर्माण झाला आहे.