शहरं
Join us  
Trending Stories
1
महाडमध्ये शिंदेसेना अन् राष्ट्रवादीत तुफान राडा; वाहनांची तोडफोड, तटकरे-गोगावले संघर्ष पेटला
2
'संचार साथी' ॲपचे ५ महत्त्वाचे फीचर्स : चोरी झालेले फोन ब्लॉक करा आणि फ्रॉडला आळा घालण्यापर्यंत...
3
तुमचं गृहकर्ज, वाहन कर्ज स्वस्त होणार? आरबीआय डिसेंबरमध्ये रेपो दरात २५ बेसिस पॉईंटची कपात करणार?
4
डीके शिवकुमारांना मुख्यमंत्रिपदाची संधी कधी मिळणार? CM सिद्धारमैया थेट बोलले...
5
एअर इंडियाची मोठी चूक, 'एअरवर्दीनेस सर्टिफिकेट' एक्सपायर असतानाही ८ वेळा उड्डाण; डीजीसीएकडून दणका
6
'एक कप और'ची सवय पडेल महागात; हिवाळ्यात जास्त चहा-कॉफी प्यायल्याने वाढू शकते गुडघेदुखी
7
सरकारी डिफेन्स कंपनीला २,४६१ कोटींची मोठी ऑर्डर! 'मेक इन इंडिया'मुळे नफ्यात ७६% ची रेकॉर्डब्रेक वाढ!
8
Nanded Murder Case: आंचलच्या वडिलांनी आणि भावांनी सक्षमचा विश्वास जिंकण्यासाठी कट रचला, हत्येपूर्वी सोबत नाचले; व्हिडीओ होतोय व्हायरल
9
Pankaja Munde: "मला आणि धनंजय मुंडेंना सतत बहीण-भाऊ' म्हणणं थांबवा!" पंकजा मुंडे असं का म्हणाल्या?
10
8th Pay Commission: जानेवारीपासून बँक खात्यात येणार का वाढलेली सॅलरी? ८ व्या वेतन आयोगाशी निगडीत कनफ्युजन करा दूर
11
स्मार्टफोनमध्ये संचार साथी ठेवणे बंधनकारक! विरोधकांचा पाळत ठेवत असल्याचा आरोप, मंत्री ज्योतिरादित्य शिंदें म्हणाले...
12
नोकिया बनवायची 'टॉयलेट पेपर', तर कोलगेट मेणबत्त्या; सॅमसंगचं काय? 'या' कंपन्यांचा मूळ व्यवसाय माहिती नसेल
13
काळा पैशाविरोधातील लढाई ठरली अपयशी, केंद्र सरकारने लोकसभेत काय दिली आकडेवारी?
14
Abhishek Sharma: पुन्हा 'द अभिषेक शर्मा शो!' बडोद्याविरुद्ध फक्त 'इतक्या' चेंडूत ठोकलं अर्धशतक
15
'डिमेंशिया'चा धोका टाळायचा? मग व्यायाम सुरू करा, मेंदूसाठीही व्यायाम ठरतोय महत्त्वाचा
16
'किमान पुढच्या वेळी तरी...'; निकालाची तारीख पुढे ढकलल्याने CM फडणवीसांनी व्यक्त केली तीव्र नाराजी
17
प्रसूतीची तारीख, पण 'तिचं' मतदानाला प्राधान्य! लोकशाहीसाठी चाळीसगावच्या लेकीचं खास पाऊल
18
असंवेदनशील! आजी ICU मध्ये, कर्मचारी ढसाढसा रडला; मीटिंग मिस होताच कंपनीने पगार कापला
19
तिच्या अंगावर पांढरे डाग आहेत, म्हणत पतीने मागितला घटस्फोट; पत्नी कोर्टातच म्हणाली टॅटू दाखव! पुढे जे झालं..
20
Municipal Election Result 2025 Date: राज्यातील सर्व नगरपरिषदांची मतमोजणी एकत्रच होणार; आता २१ डिसेंबरला निकाल लागणार
Daily Top 2Weekly Top 5

सरकारी शेतरस्त्याला ठरविले वहिवाटीचा रस्ता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2021 04:19 IST

नायब तहसीलदार, तहसीलदारांकडे शासनाने शेतरस्त्यांबाबतचे अधिकार दिले आहेत. वहिवाटीचा रस्ता म्हणजे ज्या रस्त्याने एखादा शेतकरी गेल्या २५-३० वर्षांपासून बिनदिक्कतपणे ...

नायब तहसीलदार, तहसीलदारांकडे शासनाने शेतरस्त्यांबाबतचे अधिकार दिले आहेत. वहिवाटीचा रस्ता म्हणजे ज्या रस्त्याने एखादा शेतकरी गेल्या २५-३० वर्षांपासून बिनदिक्कतपणे वहिवाट करीत असेल, तो त्याचा वहिवाटीचा रस्ता, जो सरकारी शेतरस्ता असतो. तो सरकारी शेतरस्ता याला वहिवाटीचे बंधन नसते. सरकारी शेतरस्ता हा वहिवाटीमध्ये असो अथवा नसो तो सरकारी रस्ता असतो. त्यावर कोणीही अतिक्रमण, अडथळा निर्माण करू शकत नाही. असे अडथळे अथवा अतिक्रमण केल्यास त्यावर कार्यवाही करण्याचे सर्व अधिकार तहसीलदारांना शासनाने दिले आहेत. परंतु गायगाव भाग-२ मध्ये गट क्र. १७३ ते गट क्र. १७० पर्यंत ३.१४ मीटर रुंदीचा सरकारी शेतरस्ता आहे. या रस्त्यावर अतिक्रमण करून सदर सरकारी शेतरस्ता बंद करण्यात आला आहे. कुठल्याही सरकारी मालमत्तेवर, सरकारी रस्त्यावर असे अतिक्रमण होत असेल तर सर्वप्रथम याची नोंद तलाठ्याकडे असलेल्या अतिक्रमण पुस्तिकेमध्ये करणे आवश्यक असते. तलाठी त्या अतिक्रमणाविषयीचा अहवाल मंडळ अधिकाऱ्यांना देतो व मंडळ अधिकारी हे नायब तहसीलदारांना अतिक्रमणाविषयी माहिती देतात व नायब तहसीलदार त्या सरकारी मालमत्तेवर अथवा सरकारी रस्त्यावर असलेल्या अतिक्रमणावर कार्यवाही करतात. मात्र या प्रकरणामध्ये अद्याप कुठलीही कार्यवाही झाली नाही. या प्रकरणी विविध तक्रारी, पोलीस कारवाई झाल्या आहेत. या प्रकरणामध्ये तहसील कार्यालय - जिल्हाधिकारी कार्यालय - उच्च न्यायालय - तहसील कार्यालय - उच्च न्यायालय - तहसील कार्यालय असे हे प्रकरण चालले.

उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतरही कारवाई नाही!

या सरकारी शेतरस्त्याविषयी उच्च न्यायालयाचे निर्णय असतानासुद्धा कुठलीही ठोस कार्यवाही अद्यापपर्यंत झाली नाही. उलट या सरकारी शेतरस्त्याला नायब तहसीलदारांनी अतिक्रमणाचे निरीक्षण करूनही सरकारी शेतरस्ता तर सोडाच उलट हा वहिवाटीचा रस्ता आढळून येत नसल्याचे आपल्या आदेशात स्पष्ट करीत दावा खारीज केला.

नायब तहसीलदारांनी सरकारी शेतरस्त्याविषयी उलट नियम लावत, या रस्त्यावरून वहिवाट सिद्ध होत नसल्याचे कारण पुढे करीत, हा सरकारी शेतरस्ता संबंधित शेतकऱ्यांकरिता बंद केला आहे.

नायब तहसीलदारांच्या निलंबनाची शेतकऱ्यांकडून मागणी

सरकारी नियमांची पायमल्ली केल्याप्रकरणी नायब तहसीलदार योगेश कौटकर यांच्यावर महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम २०१५ नुसार तत्काळ निलंबनाची मागणी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी व पालकमंत्र्यांनी कारवाई करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. या प्रकरणी संबंधित शेतकऱ्यांना १५ दिवसांत न्याय न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयावर उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.