शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

गावांच्या कारभाराची धुरा युवकांच्या हाती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2017 02:34 IST

अकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या म तदानाची सातही तालुक्यांमध्ये सोमवार,  ९ ऑक्टोबर रोजी म तमोजणी झाली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी  निवडणूक रिंगणातील ३ हजार ६५१ उमेदवारांच्या भाग्याचा  फैसला करताना जनतेने प्रस्थापितांना हादरे दिले असून,  युवकांच्या हाती गावाची धुरा सोपविल्याचे चित्र समोर आले  आहे. 

ठळक मुद्देअकोला जिल्हा : २७२ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : जिल्हय़ातील २७२ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या म तदानाची सातही तालुक्यांमध्ये सोमवार,  ९ ऑक्टोबर रोजी म तमोजणी झाली. सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी  निवडणूक रिंगणातील ३ हजार ६५१ उमेदवारांच्या भाग्याचा  फैसला करताना जनतेने प्रस्थापितांना हादरे दिले असून,  युवकांच्या हाती गावाची धुरा सोपविल्याचे चित्र समोर आले  आहे. जिल्हय़ातील सातही तालुक्यांतील २७२ ग्रामपंचायतींची  सार्वत्रिक निवडणूक घेण्यात  आली. उमेदवारी मागे घेण्याच्या  मुदतीपर्यंत जिल्हय़ात २७२ ग्रामपंचायतींपैकी दहा ग्रामपंचाय तींची निवडणूक अविरोध करण्यात आली. त्यामध्ये १७ सरपंच  आणि ग्रामपंचायत सदस्य पदांसाठी ७७७ उमेदवारांची अविरोध  निवड करण्यात आली होती. आज लागलेल्या निकालांमध्ये थेट  सरपंच म्हणून निवडून आलेल्यांमध्ये युवकांची संख्या सर्वाधिक  आहे. ही निवडणूक पक्षीय चिन्हावर नसली, तरी निकालानंतर  आता प्रत्येक पक्षाने आम्हीच बाजी मारली, असे दावे सुरू केले  आहेत. ग्रामीण जनतेने दिलेला कौल लक्षात घेतला, तर भाज पाला पसंती असल्याचे स्पष्ट होत असून, आतापर्यंत गावकारभार  करणार्‍या अनेकांना ग्रामस्थांनी धक्का देत नवख्या व युवकांच्या  हाती ग्रामपंचायतची धुरा सोपविली असल्याचे स्पष्ट झाले. अकोल्यातील पाच विधानसभा मतदारसंघामध्ये केवळ बाळापूर  हाच एकमेव विधानसभा मतदारसंघ भारिप-बमसंच्या ताब्यात  आहे.  त्यामुळे दिल्लीपासून सुरू झालेले भाजपाचे वारे गल्ली तही कायम असल्याचे दिसत आहे. तर दुसरीकडे ग्रामपंचायत  निवडणूकीत सेना, काँग्रेस, भारिप-बमसंनेही सर्वाधीक ग्राम पंचायत जिंकल्याचा दावा केला आहे. 

ईश्‍वरचिठ्ठीचे दानमूर्तिजापूर तालुक्यातील रामटेक येथील विद्या संदीप ठाकरे व  धोत्रा शिंदे येथील जायदाबी अहमद बेग हे दोघे ईश्‍वरचिठ्ठीने  सदस्य म्हणून विजयी ठरले. तर विरवाळा येथील नंदू मोटे हे  दोन मतांनी सरपंच म्हणून विजयी झाले. तेल्हारा तालुक्यातील  कोठा येथील मीराबाई मुंगुटराव अहेरकर, माळेगाव बाजार ये थील विजय हरिदास घोगळे व दापुरा येथील प्रीती प्रफुल्ल आढे  यांची ईश्‍वरचिठ्ठीने सरपंचपदी निवड झाली. 

थेट सरपंच निवडणूक घेवून भाजपा सरकारने ग्रामीण भागात  नवे पर्व सुरु केले आहे. त्याला जनतेने उत्तम प्रतिसाद दिला.  जिल्ह्यातील अध्र्याहून अधिक ग्रामपंचायतीमध्ये भाजपाचा झेंडा  फडकला आहे. हे यश केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचे आहे. - डॉ. रणजित पाटील, पालकमंत्री 

थेट सरपंच निवडण्यात आल्याने कर्तबगार, धडाडीच्या कार्यक र्त्यांना संधी मिळण्याचा मार्ग मोकळा झाला. यापूर्वी सरपंच  निवडण्याची सर्व प्रक्रिया ‘मॅनेज’असल्याने कर्तृत्ववान तरुणांना  वाव मिळत नव्हता. जिल्ह्यात भाजपाला घवघवीत यश मिळाले  असून, त्याचे श्रेय जनतेला जाते. - खासदार संजय धोत्रे

सरपंच पदासाठी जनतेने तरुणांना संधी दिली. जाती-पातीच्या  राजकारणाचे दिवस जमा होण्याच्या मार्गावर असून, हे चांगले  संकेत आहेत. भाजपाला मिळालेला कौल पाहता जनता  आमच्या सोबत आहे, यात दुमत नाही. जिल्ह्यातून सर्वाधिक  उमेदवार पूर्व विधानसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. -आमदार रणधीर सावरकर

जिल्ह्यातील १0४ ग्रामपंचायतींवर शिवसेनेच्या उमेदवारांनी  विजय मिळवला आहे. भाजपाने त्यांच्या उमेदवारांची यादी  नावासहित घोषित करावी, आम्ही तयार आहोत. भाजपा व भारि प-बहुजन महासंघाचे राजकारण पाहता जनतेने शिवसेनेला  कौल दिला आहे. -नितीन देशमुख, जिल्हाप्रमुख शिवसेना

 जिल्ह्यातील ११0 ग्रामपंचायती भारिप-बमसंच्या ताब्यात  आल्या आहेत. काही सरपंचांनीही भारिप-बमसंसोबत  असल्याचे सांगितल्याने ही संख्या वाढणार आहे. जिल्ह्यातील  ५0 टक्के ग्रा.पं. पक्षाकडे आल्या आहेत. सरपंचासाठी पक्षाचे  प्रयत्न महत्त्वाचे ठरले आहेत. - काशीराम साबळे, कार्याध्यक्ष, भारिप-बमसं.

ग्रामीण भागात जनतेमध्ये भाजपाबद्दल प्रचंड चिड व संतापाचे  वातावरण आहे. त्यामुळेच जनतेने काँग्रेसच्या १५१ उमेदवारांना  विजयी केले असून काँग्रेसच्या ‘अच्छे दिना’ची ही सुरुवात  आहे.-हिदायत पटेल, जिल्हाध्यक्ष काँग्रेस