शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आत्महत्या, दुष्काळाच्या मुद्यावर सरकार संवेदनाहीन

By admin | Updated: August 27, 2015 00:55 IST

सरकार निव्वळ घोषणाबाज असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप.

अकोला: राज्यातील सध्याचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असल्याचे सांगत, शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाच्या मुद्यावर राज्य सरकार संवेदनाहीन आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला. अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील सध्याचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असून, नवीन काहीच या सरकारकडून करण्यात आले नाही. अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत; मात्र शेतकर्‍यांचे प्रश्न आणि दुष्काळी परिस्थितीच्या मुद्यावर राज्य सरकार दिशाहीन असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडीच्यावतीने आंदोलन छेडले जाणार आहे. त्यामध्ये २ सप्टेंबर रोजी सर्व डाव्या संघटना आणि कामगार संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. तसेच येत्या हंगामात पेरणीसाठी शेतकर्‍यांना मोफत बियाणे पुरविणे, खताला सबसिडी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, दुष्काळी भागात जनावरांसाठी छावण्या उभारणे, शेतीमालाची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत करण्यात यावी, इत्यादी मुद्यांवर महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडी आंदोलन करणार असल्याचे अँड. आंबेडकर यांनी सांगितले. राज्यातील भाजपचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असल्याची टीका करीत, राज्यात सरकारला आर्थिक आणीबाणी आणायची आहे, तसाच जाणीवपूर्वक सरकारचा सध्या कारभार सुरू असून, आर्थिक आणीबाणी लावल्याशिवाय पर्याय नाही, असा पर्याय ठेवण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे सरकारची लोकशाहीसोबत बांधीलकी आहे की नाही, याबाबत शंका आहे, असा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, कृषी सभापती रामदास मालवे, बालमुकुंद भिरड, जिल्हा सरचिटणीस अश्‍वजित शिरसाट, मनपा गटनेता गजानन गवई, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे, बळीराम चिकटे, डॉ.प्रसन्नजित गवई, शेख साबीर उपस्थित होते.