शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

शेतकरी आत्महत्या, दुष्काळाच्या मुद्यावर सरकार संवेदनाहीन

By admin | Updated: August 27, 2015 00:55 IST

सरकार निव्वळ घोषणाबाज असल्याचा प्रकाश आंबेडकर यांचा पत्रकार परिषदेत आरोप.

अकोला: राज्यातील सध्याचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असल्याचे सांगत, शेतकरी आत्महत्या आणि दुष्काळाच्या मुद्यावर राज्य सरकार संवेदनाहीन आहे, असा आरोप भारिप-बहुजन महासंघाचे सर्वेसर्वा अँड. प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी येथे केला. अकोल्यातील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यातील सध्याचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असून, नवीन काहीच या सरकारकडून करण्यात आले नाही. अत्यल्प पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीत राज्यात शेतकरी आत्महत्यांच्या घटना वाढत आहेत; मात्र शेतकर्‍यांचे प्रश्न आणि दुष्काळी परिस्थितीच्या मुद्यावर राज्य सरकार दिशाहीन असल्याचा आरोप त्यांनी केला. राज्यातील दुष्काळी परिस्थिती व शेतकर्‍यांच्या प्रश्नांवर महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडीच्यावतीने आंदोलन छेडले जाणार आहे. त्यामध्ये २ सप्टेंबर रोजी सर्व डाव्या संघटना आणि कामगार संघटनांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. तसेच येत्या हंगामात पेरणीसाठी शेतकर्‍यांना मोफत बियाणे पुरविणे, खताला सबसिडी, पिण्याच्या पाण्याचे नियोजन, दुष्काळी भागात जनावरांसाठी छावण्या उभारणे, शेतीमालाची खरेदी कृषी उत्पन्न बाजार समितीमार्फत करण्यात यावी, इत्यादी मुद्यांवर महाराष्ट्र लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडी आंदोलन करणार असल्याचे अँड. आंबेडकर यांनी सांगितले. राज्यातील भाजपचे सरकार निव्वळ घोषणाबाज सरकार असल्याची टीका करीत, राज्यात सरकारला आर्थिक आणीबाणी आणायची आहे, तसाच जाणीवपूर्वक सरकारचा सध्या कारभार सुरू असून, आर्थिक आणीबाणी लावल्याशिवाय पर्याय नाही, असा पर्याय ठेवण्याची तयारी सरकारकडून सुरू आहे. त्यामुळे सरकारची लोकशाहीसोबत बांधीलकी आहे की नाही, याबाबत शंका आहे, असा आरोप अँड. आंबेडकर यांनी केला. या पत्रकार परिषदेला जिल्हा परिषद अध्यक्ष शरद गवई, भारिप-बमसंचे जिल्हा कार्याध्यक्ष काशीराम साबळे, कृषी सभापती रामदास मालवे, बालमुकुंद भिरड, जिल्हा सरचिटणीस अश्‍वजित शिरसाट, मनपा गटनेता गजानन गवई, जिल्हा परिषद सदस्य विजय लव्हाळे, बळीराम चिकटे, डॉ.प्रसन्नजित गवई, शेख साबीर उपस्थित होते.