शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या लेकींनी 'जग जिंकलं'! द. आफ्रिकेला हरवून टीम इंडिया अजिंक्य; स्वप्ननगरीत अधुरं स्वप्न साकार!
2
जोधपूरमध्ये भीषण अपघात, टेम्पो ट्रॅव्हलर उभ्या असलेल्या ट्रकला धडकला, १५ जणांचा मृत्यू
3
धक्कादायक! बंगालमध्ये सातवीत शिकणाऱ्या मुलीवर सामुहिक अत्याचार; तिघांना अटक
4
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
5
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
6
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
7
IND vs SA Womens World Cup 2025 Final : ...अन् अमनजोतच्या 'रॉकेट थ्रो'सह मिळाला मोठा दिलासा (VIDEO)
8
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
9
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
10
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
11
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
12
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
13
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
14
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
15
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
16
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
17
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
18
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
19
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
20
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...

शेतकरी, बेरोजगारांना रोजगार देणारे सरकार हवे! -  बसमध्ये प्रवाशांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 15:32 IST

अकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची चर्चा दहीगाव मार्गे जाणाºया अकोला ते सांगळुद या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मंगळवारी प्रवाशांमध्ये होती.

- सचिन राऊतअकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची चर्चा दहीगाव मार्गे जाणाºया अकोला ते सांगळुद या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मंगळवारी प्रवाशांमध्ये होती. मजबूत सरकार हवे; पण सर्वांना न्याय देणारे असावे असा या चर्चेचा सुर होत. अकोला ते मूर्तिजापूर या प्रवासादरम्यान विठ्ठलराव तायडे म्हणाले की अकोला लोकसभा मतदारसंघात विकास सुरू आहे; मात्र रस्ते अनेक गावात पाण्याची सुविधा अद्यापही नसल्याचे सांगितले, तर अंकुश गावंडे यांनी मोदी सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे केवळ देशातील जनतेला त्रासच झाला आहे. शेतकरी व गोरगरिबांसाठीच्या योजनेच्या त्यांच्यासह राज्य सरकारने केवळ भूलभुलय्या केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही पूर्णपणे मिळाली नसून, अभ्यास करणारे हे सरकार आता राज्यात नको असल्याची प्रतिक्रिया दिली. याच बसमध्ये काही विद्यार्थीही उपस्थित होते. त्यामधील प्रियंका खंडारे या विद्यार्थिनीने देशातील रोजगाराचा विषय प्रचंड गंभीर असून, सरकारने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सतीष खिरडकर यांनी मोदी सरकारने एकही नोकरी दिली नसून, राज्य सरकारनेही केवळ जाहिरात काढल्या; मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ अद्याप एकाही बेरोजगारास झालेला नाही. त्यामुळे हे सरकार फसवे असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आता वाद-विवाद आणि खोट्या घोषणा देणाºया सरकारपेक्षा वास्तविकतेमध्ये काम करणारे सरकार हवे असल्याचे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले.काँग्रेस,भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजूकाँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राजकीय पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मतही प्रवाशांनी व्यक्त केले; मात्र त्यातही काही नेते काम करणारे असल्याने त्यांच्यासाठी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. प्रत्येक सफरचंदाला कुठेना कुठे डाग असतो म्हणून आपण पूर्ण सफरचंद फेकून देत नाही, तर डाग असलेला भाग काढून इतर सफरचंद खाण्यासाठी वापरतो. राजकारणही याच प्रकारे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक