शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी तरुणीला मारहाण करून पळालेल्या परप्रांतीय तरुणाला मनसैनिकांनी पकडले, चोप देऊन पोलिसांच्या हवाली केले 
2
Mumbai Local: मुंबईहून कसाऱ्याला जाणाऱ्या लोकलवर दरड कोसळली, २ प्रवासी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती 
3
बिहारमधील मतदार यादीतून हटवली जाणार ५१ लाख मतदारांची नावं, या व्यक्तींचा समावेश, निवडणूक आयोगाने दिली माहिती
4
रहस्यमय रस्ता, दिवसातून केवळ दोन तासच दिसतो, मग गायब होतो, कारण काय?
5
"मी त्याला एवढंच बोलले की..."; कल्याण मारहाण प्रकरणातील पीडितेने सांगितला घटनाक्रम
6
दिल्ली विमानतळावर लँडिंगदरम्यान Air India च्या विमानाला आग; सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित
7
"किसिंग सीन शूट करताना त्या अभिनेत्याने..."; अभिनेत्री विद्या बालनने सांगितला भयानक किस्सा
8
IND vs ENG : हरमनप्रीत कौरची कडक सेंच्युरी! निर्णायक वनडेत टीम इंडियानं केली विक्रमांची 'बरसात'
9
"अशाने महाराष्ट्राचं नुकसान होईल…’’, भाषावादादरम्यान तामिळनाडूमधील आठवण सांगत राज्यपालांचं मोठं विधान 
10
गिलनं 'टाइमपास' करणाऱ्या इंग्लंडच्या सलामी जोडीच्या 'त्या' कृतीचा केला 'पंचनामा'; म्हणाला...
11
१००% प्रॉफिट...! दुप्पट झाला कंपनीचा नफा; बुधवारी फोकसमध्ये राहणार हा शेअर 
12
IND vs ENG : हरमनप्रीत कौरचा मोठा पराक्रम; मिताली राजनंतर अशी कामगिरी करणारी ठरली दुसरी भारतीय
13
डान्स क्लासला नको म्हटल्याने मुलीने तोंडाला लावली विषारी बाटली; तीन महिन्यांची मृत्यूशी झुंज अपयशी
14
VIDEO: लाथ मारली, केस ओढून खाली आपटलं... मराठी तरूणीला परप्रांतीयाकडून बेदम मारहाण
15
एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियामध्ये दीड लाख पगाराची नोकरी!
16
IND vs ENG : ठरलं! लेट एन्ट्री मारणारा थेट प्लेइंग इलेव्हनध्ये दिसणार; करुण नायरही बाकावर नाही बसणार
17
"डोनाल्ड ट्रम्प यांची हत्या करणारच’’, फतवा काढून इराणमधील मौलवींनी गोळा केले ३५० कोटी, शेजारील देशानेही दिली साथ
18
Chhangur Baba : "छांगुर बाबा बाहेर येतील, सर्वांना धडा शिकवतील"; धर्मांतर सिंडिकेटच्या गुंडांकडून धमक्या
19
बिहारच्या विधानसभेत तुफान राडा, आरजेडीचे आमदार आणि मार्शलमध्ये धक्काबुक्की
20
रजिस्ट्रेशन कधीपासून, घर कधी मिळणार? म्हाडाच्या लॉटरीसाठी अर्ज करणाऱ्यांनी 'या' तारखा ठेवा लक्षात!

शेतकरी, बेरोजगारांना रोजगार देणारे सरकार हवे! -  बसमध्ये प्रवाशांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 15:32 IST

अकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची चर्चा दहीगाव मार्गे जाणाºया अकोला ते सांगळुद या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मंगळवारी प्रवाशांमध्ये होती.

- सचिन राऊतअकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची चर्चा दहीगाव मार्गे जाणाºया अकोला ते सांगळुद या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मंगळवारी प्रवाशांमध्ये होती. मजबूत सरकार हवे; पण सर्वांना न्याय देणारे असावे असा या चर्चेचा सुर होत. अकोला ते मूर्तिजापूर या प्रवासादरम्यान विठ्ठलराव तायडे म्हणाले की अकोला लोकसभा मतदारसंघात विकास सुरू आहे; मात्र रस्ते अनेक गावात पाण्याची सुविधा अद्यापही नसल्याचे सांगितले, तर अंकुश गावंडे यांनी मोदी सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे केवळ देशातील जनतेला त्रासच झाला आहे. शेतकरी व गोरगरिबांसाठीच्या योजनेच्या त्यांच्यासह राज्य सरकारने केवळ भूलभुलय्या केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही पूर्णपणे मिळाली नसून, अभ्यास करणारे हे सरकार आता राज्यात नको असल्याची प्रतिक्रिया दिली. याच बसमध्ये काही विद्यार्थीही उपस्थित होते. त्यामधील प्रियंका खंडारे या विद्यार्थिनीने देशातील रोजगाराचा विषय प्रचंड गंभीर असून, सरकारने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सतीष खिरडकर यांनी मोदी सरकारने एकही नोकरी दिली नसून, राज्य सरकारनेही केवळ जाहिरात काढल्या; मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ अद्याप एकाही बेरोजगारास झालेला नाही. त्यामुळे हे सरकार फसवे असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आता वाद-विवाद आणि खोट्या घोषणा देणाºया सरकारपेक्षा वास्तविकतेमध्ये काम करणारे सरकार हवे असल्याचे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले.काँग्रेस,भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजूकाँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राजकीय पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मतही प्रवाशांनी व्यक्त केले; मात्र त्यातही काही नेते काम करणारे असल्याने त्यांच्यासाठी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. प्रत्येक सफरचंदाला कुठेना कुठे डाग असतो म्हणून आपण पूर्ण सफरचंद फेकून देत नाही, तर डाग असलेला भाग काढून इतर सफरचंद खाण्यासाठी वापरतो. राजकारणही याच प्रकारे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक