शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी, बेरोजगारांना रोजगार देणारे सरकार हवे! -  बसमध्ये प्रवाशांशी चर्चा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2019 15:32 IST

अकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची चर्चा दहीगाव मार्गे जाणाºया अकोला ते सांगळुद या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मंगळवारी प्रवाशांमध्ये होती.

- सचिन राऊतअकोला: एकहाती सत्ता मिळविणाऱ्या भाजपाचे केंद्रात मजबूत सरकार स्थापन झाले. त्यांनी पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केला; मात्र सत्ताधाऱ्यांनी शेतकरी व बेरोजगारांसाठी एकही चांगला निर्णय घेतला नसल्याने आज शेतकरी मेटाकुटीस आहे, तर बेरोजगार वणवण भटकत असल्याची चर्चा दहीगाव मार्गे जाणाºया अकोला ते सांगळुद या राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बसमध्ये मंगळवारी प्रवाशांमध्ये होती. मजबूत सरकार हवे; पण सर्वांना न्याय देणारे असावे असा या चर्चेचा सुर होत. अकोला ते मूर्तिजापूर या प्रवासादरम्यान विठ्ठलराव तायडे म्हणाले की अकोला लोकसभा मतदारसंघात विकास सुरू आहे; मात्र रस्ते अनेक गावात पाण्याची सुविधा अद्यापही नसल्याचे सांगितले, तर अंकुश गावंडे यांनी मोदी सरकारने पाच वर्षांच्या कार्यकाळात घेतलेल्या निर्णयांमुळे केवळ देशातील जनतेला त्रासच झाला आहे. शेतकरी व गोरगरिबांसाठीच्या योजनेच्या त्यांच्यासह राज्य सरकारने केवळ भूलभुलय्या केला आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी अद्यापही पूर्णपणे मिळाली नसून, अभ्यास करणारे हे सरकार आता राज्यात नको असल्याची प्रतिक्रिया दिली. याच बसमध्ये काही विद्यार्थीही उपस्थित होते. त्यामधील प्रियंका खंडारे या विद्यार्थिनीने देशातील रोजगाराचा विषय प्रचंड गंभीर असून, सरकारने याकडे सपशेल दुर्लक्ष केल्याचा आरोप केला. सतीष खिरडकर यांनी मोदी सरकारने एकही नोकरी दिली नसून, राज्य सरकारनेही केवळ जाहिरात काढल्या; मात्र त्याचा प्रत्यक्ष लाभ अद्याप एकाही बेरोजगारास झालेला नाही. त्यामुळे हे सरकार फसवे असल्याचे मत व्यक्त केले. त्यामुळे आता वाद-विवाद आणि खोट्या घोषणा देणाºया सरकारपेक्षा वास्तविकतेमध्ये काम करणारे सरकार हवे असल्याचे मत यावेळी प्रवाशांनी व्यक्त केले.काँग्रेस,भाजपा एकाच नाण्याच्या दोन बाजूकाँग्रेस आणि भाजपा हे दोन्ही राजकीय पक्ष एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याचे मतही प्रवाशांनी व्यक्त केले; मात्र त्यातही काही नेते काम करणारे असल्याने त्यांच्यासाठी या निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेऊन मतदान करीत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. प्रत्येक सफरचंदाला कुठेना कुठे डाग असतो म्हणून आपण पूर्ण सफरचंद फेकून देत नाही, तर डाग असलेला भाग काढून इतर सफरचंद खाण्यासाठी वापरतो. राजकारणही याच प्रकारे असल्याचे प्रवाशांचे म्हणणे होते.

 

टॅग्स :Akolaअकोलाakola-pcअकोलाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक