शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
3
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
4
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
5
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
6
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
7
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
8
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
9
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
10
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
11
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
12
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
13
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
14
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
15
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
16
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
17
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
18
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा

गोवंशासाठी शासनाने विशेष अनुदान द्यावे

By admin | Updated: January 14, 2015 01:13 IST

राधाकृष्ण महाराज यांची विनवणी

अकोला : गोवंशाचे रक्षण होणे ही काळाची गरज आहे. गाय ही केवळ एका धर्माशी जोडणे चुकीचे असून, गायीचे आरोग्याच्या दृष्टीने असलेले महत्त्व लक्षात घेतले पाहिजे. गोवंश रक्षणासाठी केवळ कागदावर कायदे करून उपयोगाचे नाही, तर शासनाने विशेष अनुदान दिले पाहिजे, अशी आर्त विनवणी राजस्थानच्या पथमेडा गोधाम येथून आलेले राधाकृष्ण महाराज यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना केली. श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञात विचारपुष्प गुंफण्यासाठी आलेले राधाकृष्ण महाराज यांनी गोरक्षणाच्या दृष्टीने आपली मते पत्रकरांजवळ व्यक्त केली. आम्ही काही लोक मिळून एक छोटेसे गोधाम चालवतो. इथे हजारो गायींसह गोवंशांचे संवर्धन, रक्षण आणि पालन केले जाते. हेच काम शासनदेखील करू शकते; परंतु त्यासाठी गोहत्या प्रतिबंधक कायदा केला म्हणजे झाले, अशाने होणार नाही. शासनाला त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. गोवंशासाठी विशेष अनुदान शासनाने द्यावे सोबतच गोहत्या करणार्‍यांविरोधात कडक कारवाईची तजवीज करावी. पोलिसांना विशेष निर्देश द्यावेत. स्वतंत्र गोपालन मंत्रालय स्थापन करावे, असे मत राधाकृष्ण महाराज यांनी व्यक्त केले.