शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शासनाने आरक्षणाबाबतची भूमिका स्पष्ट करावी

By admin | Updated: October 25, 2016 02:10 IST

प्रकाश आंबेडकर यांनी केला त्यांच्या भूमिकेचा पुनरुच्चार.

वाशिम, दि. २४- मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभरात मोर्चे काढण्यास सुरुवात केल्यानंतर शासनाने त्याचवेळी चर्चा घडवून आणली असती तर यावर उपाय निघाला असता. मागण्यांसाठी मोर्चे काढण्यावर बंधन घालता येत नाही. शासनाने आरक्षणाबाबतची आपली भूमिका स्पष्ट करावी, याचा पुनरुच्चार भारिप-बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी सोमवारी येथे पत्रकार परिषदेत केला. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येथे आयोजित मेळाव्याला संबोधित करण्यासाठी आले असता त्यांनी सायंकाळी पत्रकारांशी संवाद साधला. आंबेडकर म्हणाले की, सकल मराठा समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढल्यानंतर राज्यातील अँट्रासिटी कायदा रद्द करण्याची मागणी पुढे रेटली. त्यामुळे दलितांनीसुद्धा मोर्चा काढण्यास सुरुवात केली. परिणामी पूर्वी समाजा-समाजामध्ये जो बंधुभाव होता; त्याला आता तडा तर जाणार नाही ना? अशी चिंता वाटत आहे. समान नागरी कायदा हा हिंदूंसाठी असून मुस्लिमांना याची गरज नाही. अनेक समाज व जाती हिंदू धर्मात मोडत असल्यामुळे हिंदूंना सुद्धा समान नागरी कायदा लागू होईल का? असा प्रश्न आपणास पडला असल्याचेही आबेडकर म्हणाले. प्रत्येक धर्माला त्याचा प्रसार व प्रचार करण्याचा अधिकार घटनेने दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.