शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीची परीक्षा रद्द करून सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:33 IST

अकोला : दिनांक १४ मार्च रोजी होणारी ‘एमपीएससी’ची नियोजित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, हे सरकार ...

अकोला : दिनांक १४ मार्च रोजी होणारी ‘एमपीएससी’ची नियोजित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत नियोजित परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेऊन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी भाजयुमो अकोलातर्फे राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे.

राज्यात सर्व राजकीय पक्षांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. मात्र, या सरकारला त्रास फक्त परीक्षांमुळेच होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आतापर्यंत पाचवेळा एमपीएससीची परीक्षा राज्य सरकारने रद्द केली असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार या महाभकास आघाडी सरकारने ठेवली आहे, असा आराेप करून मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे शासकीय पदभरतीमध्ये निवड होऊनसुद्धा मराठा समाजातील हजारो विद्यार्थी पदभरतीपासून वंचित राहिले आहेत. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन यामध्ये तरतूद करण्यात यावी, अशीही मागणी भाजयुमोने केली आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भाजयुमोतर्फे निषेध करत परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महानगर अध्यक्ष उमेश गुजर, जिल्हा सरचिटणीस योगेश ढोरे, किरण अवताडे-पाटील, प्रवीण डिक्कर, महानगर सरचिटणीस नीलेश काकड, अभिजीत बांगर, उज्ज्वल बामणेट, जिल्हा युवती आघाडी अध्यक्षा ॲड. रुपाली राऊत, अक्षय जोशी, केशव हेडा, भूषण इंदोरिया, रितेश जामनेरे, टोनी जयराज, वैभव मेहेरे, अभिषेक भगत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आरटीई प्रवेशात तांत्रिक अडचणी

अकाेला : आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन सात दिवस झाले आहेत. परंतु, तांत्रिक अडचणी अजूनही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे पालकांना त्रास होत आहे. तांत्रिक अडचणींमध्ये ओटीपीची समस्या आहे. दुसरीकडे प्रशासन आरटीईच्या प्रक्रियेबाबत गंभीर नाही, असा आराेप सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी केला आहे.