शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

एमपीएससीची परीक्षा रद्द करून सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:33 IST

अकोला : दिनांक १४ मार्च रोजी होणारी ‘एमपीएससी’ची नियोजित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, हे सरकार ...

अकोला : दिनांक १४ मार्च रोजी होणारी ‘एमपीएससी’ची नियोजित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत नियोजित परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेऊन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी भाजयुमो अकोलातर्फे राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे.

राज्यात सर्व राजकीय पक्षांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. मात्र, या सरकारला त्रास फक्त परीक्षांमुळेच होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आतापर्यंत पाचवेळा एमपीएससीची परीक्षा राज्य सरकारने रद्द केली असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार या महाभकास आघाडी सरकारने ठेवली आहे, असा आराेप करून मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे शासकीय पदभरतीमध्ये निवड होऊनसुद्धा मराठा समाजातील हजारो विद्यार्थी पदभरतीपासून वंचित राहिले आहेत. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन यामध्ये तरतूद करण्यात यावी, अशीही मागणी भाजयुमोने केली आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भाजयुमोतर्फे निषेध करत परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महानगर अध्यक्ष उमेश गुजर, जिल्हा सरचिटणीस योगेश ढोरे, किरण अवताडे-पाटील, प्रवीण डिक्कर, महानगर सरचिटणीस नीलेश काकड, अभिजीत बांगर, उज्ज्वल बामणेट, जिल्हा युवती आघाडी अध्यक्षा ॲड. रुपाली राऊत, अक्षय जोशी, केशव हेडा, भूषण इंदोरिया, रितेश जामनेरे, टोनी जयराज, वैभव मेहेरे, अभिषेक भगत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आरटीई प्रवेशात तांत्रिक अडचणी

अकाेला : आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन सात दिवस झाले आहेत. परंतु, तांत्रिक अडचणी अजूनही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे पालकांना त्रास होत आहे. तांत्रिक अडचणींमध्ये ओटीपीची समस्या आहे. दुसरीकडे प्रशासन आरटीईच्या प्रक्रियेबाबत गंभीर नाही, असा आराेप सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी केला आहे.