शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: माजी मंत्री तानाजी सावंत यांचा बंगला पाण्याखाली; दोन-दोन टोयोटा फॉर्च्युनर पुरात बुडाल्या...
2
सुनेत्रा अजित पवार यांचे NCP कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाल्या, “अतिवृष्टी हातात नाही, पण...”
3
अभूतपूर्व परिस्थितीत तातडीच्या मदतीसह कायमस्वरुपी मदतीची गरज; अन्यथा शेती मोठ्या समस्येत - शरद पवार
4
PM मेलोनींच्या इटलीमध्ये हजारो आंदोलक रस्त्यावर, बस-रेल्वे गाड्यांची तोडफोड; 60 पोलीस जखमी
5
पेनी स्टॉक बनला मल्टीबॅगर, एका वर्षात केलं मालामाल; १ लाखांचे झाले ६८ लाखांपेक्षा अधिक
6
Accident Video: दोन बाईकचा थरकाप उडवणारा अपघात; हवेत उडाले, नंतर फूट दूर जाऊन पडले
7
फक्त डेटा डिलिट करणं पुरेसं नाही! जुना फोन विकण्यापूर्वी 'या' ५ सीक्रेट गोष्टी करायलाच हव्यात
8
"पाकिस्तानचे तुकडे तुकडे होतील, बॉम्बहल्ला ही तर सुरुवात..."; इस्लामाबादच्या शत्रूचा इशारा
9
Navratri 2025: वडापावची क्रेव्हिंग होतेय? झटपट करा 'हा' उपासाचा कुरकुरीत बटाटेवडा
10
काय सांगता? स्लिम होण्याचा ट्रेंड जीवघेणा; बारीक लोकांमध्ये अकाली मृत्यूचा धोका तिप्पट
11
नाना पाटेकर सरसावले, 'ऑपरेशन सिंदूर'नंतर Pakच्या गोळीबारात बाधित झालेल्या कुटुंबांना ४२ लाखांची मदत
12
जीएसटीने आणखी अवघड केले...! पार्ले-जी बिस्कीट पुडा ५ रुपयांचा आता ४.४५ ला, १ रुपयाचे चॉकलेट ८८ पैशांना...
13
Gold Silver Price Today: आजही सोन्या-चांदीचे भाव नव्या विक्रमी पातळीवर; सोन्याच्या दरात प्रति तोळा ₹१,३४३ तर चांदी ₹१,१८१ ने महागली
14
Mumbai Local: एसी लोकलच्या टपावर चढला तरूण; क्षणात होत्याचं नव्हत झालं; दिवा स्थानकावरील घटना!
15
...म्हणून डोंबिवलीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याला भाजपाच्या कार्यकर्त्यांनी नेसवली साडी, व्हिडीओ व्हायरल
16
नवरात्री २०२५: वातीभोवती काजळी धरली? १ सोपा उपाय; वात नीट राहील अन् दिवा अजिबात विझणार नाही
17
"निरपराध लोकांची काय चूक होती? आम्ही निषेध करणार"; हवाई हल्ल्यात ३० जणांचा मृत्यू, पाकिस्तानमधील जनता संतापली
18
GST कपातीनंतर सरकारची आणखी एक गुड न्यूज! २५ लाख महिलांना मिळणार मोफत गॅस कनेक्शन
19
ओला दुष्काळ जाहीर करणार का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, 'त्याकरिता जेवढ्या पद्धतीची..."
20
"...ही चांगली गोष्ट नाही!"; राहुल गांधी यांच्या 'मत चोरी' संदर्भातील आरोपांवरून शरद पवार यांचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाले?

एमपीएससीची परीक्षा रद्द करून सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 13, 2021 04:33 IST

अकोला : दिनांक १४ मार्च रोजी होणारी ‘एमपीएससी’ची नियोजित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, हे सरकार ...

अकोला : दिनांक १४ मार्च रोजी होणारी ‘एमपीएससी’ची नियोजित परीक्षा रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून, हे सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत आहे. याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा देत नियोजित परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेऊन विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम निर्माण करू नये, अशा मागणीचे निवेदन गुरुवारी भाजयुमो अकोलातर्फे राज्याचे मुख्यमंत्री व केंद्रीय शिक्षण विभागाकडे पाठविण्यात आले आहे.

राज्यात सर्व राजकीय पक्षांचे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात होऊ शकतात. मात्र, या सरकारला त्रास फक्त परीक्षांमुळेच होत असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. आतापर्यंत पाचवेळा एमपीएससीची परीक्षा राज्य सरकारने रद्द केली असून, विद्यार्थ्यांच्या भविष्यावर टांगती तलवार या महाभकास आघाडी सरकारने ठेवली आहे, असा आराेप करून मराठा आरक्षणावर स्थगिती आल्यामुळे शासकीय पदभरतीमध्ये निवड होऊनसुद्धा मराठा समाजातील हजारो विद्यार्थी पदभरतीपासून वंचित राहिले आहेत. यासंदर्भात कायदेशीर सल्ला घेऊन यामध्ये तरतूद करण्यात यावी, अशीही मागणी भाजयुमोने केली आहे. परीक्षा रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात भाजयुमोतर्फे निषेध करत परीक्षा नियोजित वेळेतच घेण्यात यावी अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनातून मुख्यमंत्र्यांना देण्यात आला आहे. यावेळी भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख, महानगर अध्यक्ष उमेश गुजर, जिल्हा सरचिटणीस योगेश ढोरे, किरण अवताडे-पाटील, प्रवीण डिक्कर, महानगर सरचिटणीस नीलेश काकड, अभिजीत बांगर, उज्ज्वल बामणेट, जिल्हा युवती आघाडी अध्यक्षा ॲड. रुपाली राऊत, अक्षय जोशी, केशव हेडा, भूषण इंदोरिया, रितेश जामनेरे, टोनी जयराज, वैभव मेहेरे, अभिषेक भगत, आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

आरटीई प्रवेशात तांत्रिक अडचणी

अकाेला : आरटीईची प्रवेश प्रक्रिया सुरू होऊन सात दिवस झाले आहेत. परंतु, तांत्रिक अडचणी अजूनही सुटलेल्या नाहीत. त्यामुळे पालकांना त्रास होत आहे. तांत्रिक अडचणींमध्ये ओटीपीची समस्या आहे. दुसरीकडे प्रशासन आरटीईच्या प्रक्रियेबाबत गंभीर नाही, असा आराेप सामाजिक कार्यकर्ते पराग गवई यांनी केला आहे.