शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : दोघांनी ठरवून पाकची जिरवली! मैदानात नेमकं काय घडलं? मॅचनंतर अभिषेकनं सगळं सांगितलं
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
IND vs PAK : "खूप मजा आली..." अभिषेकच्या आईसह बहीण कोमलनं उडवली शाहीन आफ्रिदीची खिल्ली (VIDEO)
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
7
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
8
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
9
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
10
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
11
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
12
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
13
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
14
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
15
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
16
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
17
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
18
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
19
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
20
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...

१८ टक्के नकली नोटा रिझर्व्ह बँकेत जमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 2, 2017 00:01 IST

अकोला : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेकडे जमा झालेल्या एकूण नोटांपैकी १८ टक्के नकली आहेत, ती आकडेवारी सरकारने अद्यापही जाहीर केली नाही. रिझर्व्ह बँकेनेही नोटांचा तपशील उघड केला नाही. यापुढे कधीही ती माहिती पुढे येणार नाही. नकली नोटांची माहिती दडवून सरकार घालवलेली अब्रू वाचवत आहे, या विधानाने रिझर्व्ह बँक आणि सरकारची अब्रू जात असेल, तर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावाच, असे आव्हान भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिले. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. आंबेडकर यांनी विविध मुद्यांवर भाजप सरकारची नीतिमत्ततेवर प्रश्न निर्माण केले. 

ठळक मुद्देखोटं असेल तर अब्रुनुकसानीचा दावा दाखल करा अँड. प्रकाश आंबेडकरांचे  आव्हान

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : नोटाबंदीनंतर रिझर्व्ह बँकेकडे जमा झालेल्या एकूण नोटांपैकी १८ टक्के नकली आहेत, ती आकडेवारी सरकारने अद्यापही जाहीर केली नाही. रिझर्व्ह बँकेनेही नोटांचा तपशील उघड केला नाही. यापुढे कधीही ती माहिती पुढे येणार नाही. नकली नोटांची माहिती दडवून सरकार घालवलेली अब्रू वाचवत आहे, या विधानाने रिझर्व्ह बँक आणि सरकारची अब्रू जात असेल, तर खुशाल अब्रुनुकसानीचा दावा दाखल करावाच, असे आव्हान भारिप-बमसंचे राष्ट्रीय नेते अँड. प्रकाश आंबेडकर यांनी येथे दिले.धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त अकोला येथील क्रिकेट क्लब मैदानावर धम्म मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून अँड. आंबेडकर यांनी विविध मुद्यांवर भाजप सरकारची नीतिमत्ततेवर प्रश्न निर्माण केले. सरकारचा नोटाबंदीचा निर्णय पूर्णत: फसला आहे. दहशतवाद रोखणे, काळ्य़ा पैशाला प्रतिबंध घालणे, या कारणासाठी केलेल्या नोटाबंदीतून कोणताच उद्देश सफल झाला नाही. ९९ टक्के नोटा रिझर्व्ह बँकेत जमा झाल्या. त्या कोठून आल्या, याचे उत्तर रिझर्व्ह बँकेसह सरकारनेही दिले पाहिजे. अर्जातून मागवलेली माहिती देण्यास टाळाटाळ केली जात आहे, एकमेकांकडे बोट दाखवले जात आहे. त्यातून नोटाबंदीनंतरची माहिती जनतेपुढे येऊच द्यायची नाही, हा प्रयत्न सरकार, रिझर्व्ह बँकेकडून सुरू आहे. बँकेकडे आलेल्या नोटांपैकी १८ टक्के नकली आहेत. अनिवासी भारतीयांना ३१ मे पर्यंत मुदत दिल्याच्या काळात त्या जमा झालेल्या आहेत. ही माहिती पुढे येण्यासाठी सरकारने देशांतर्गत किती नोटा जमा झाल्या, अनिवासी भारतीयांनी किती नोटा जमा केल्या, त्यापैकी नकली नोटा किती, याचे विवरण द्यावे, त्यातून पुढे येणारी माहिती सरकारची इज्जत घालवणारी आहे. लोकांपुढे ही माहिती दिल्याने सरकार, बँकेची अब्रू जात असेल, तर दावा दाखल करावा, त्याची सुनावणी रोज होईल, अशी व्यवस्थाही करावी, असे आव्हानच अँड. आंबेडकर यांनी दिले. रोहींग्या संदर्भात काँग्रेस मधील मुस्लीम कार्यकर्ते सरकारला निवेदन देत आहेत मात्र देशातील घडणार्‍या घटनांबाबत ते मौन असतात यामुळे काँग्रेसी मुस्लीमाच्या विश्‍वासार्हतेवर प्रश्नचिन्ह आहे असा आरोप त्यांनी केला. 

पाच कोटी लोकांचा रोजगार हिरावला!शहरी भागातील बांधकाम क्षेत्रात काम करणार्‍या लोकांचा रोजगार नोटाबंदीने हिरावला. त्यांना शहरे सोडावी लागली. त्यातून रोजगार हमी योजनेतील कामांवर मजुरांची संख्या वाढल्याची आकडेवारी असल्याचेही अँड. आंबेडकर यांनी सांगितले.

सरकारची हुकूमशाहीकडे वाटचालसरकारच्या विरोधात बोलले, तर नोटीस देण्याचे प्रकार घडत आहेत. ही व्यवस्था हुकूमशाही निर्माण करणारी आहे. लोकशाही विरुद्ध विचार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशाराही अँड. आंबेडकर यांनी दिला. सोबतच सरकार हिंदूंचे नव्हे, तर मनुवाद्यांचे असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. 

सेना, पोलीसदल नालायक आहे का ?राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख भागवत, प्रधानमंत्री मोदी अत्याधुनिक शस्त्राचे पूजन का करतात, पोलीस, अर्धसैनिक बलांकडे नसलेली शस्त्रे आरएसएसकडे आली कोठून, ती बाळगण्याची परवानगी त्यांना कोणी दिली. या शस्त्रांतून कुणाला धाक दाखवायचा आहे. देशांतर्गत, सीमेवरच्या संरक्षण यंत्रणा नालायक असल्याचे आरएसएसला वाटते का, याचा खुलासाही आवश्यक असल्याचे अँड. आंबेडकर यावेळी म्हणाले.