शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावतीच्या धारणी तालुक्यात भूकंपाचा सौम्य धक्का; ३.८ रिक्टर स्केलची नोंद
2
"शब्दच नाही, अस्वस्थ झालोय..." ; चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर विराट कोहली भावूक
3
"माझी जगायची इच्छा संपली..."; आयटी अभियंता तरुणीने २१व्या मजल्यावरून मारली उडी
4
कराड-लातूर एसटी बस उलटली, १७ प्रवाशी जखमी; ५३ जण सुखरुप, लातूर-मुरुड मार्गावरील घटना
5
"तामिळ माझं जीवन, माझं अस्तित्व..."; मी माफी मागणार नाही, 'त्या' विधानावर कमल हासन ठाम
6
"३५ हजार क्षमता, ३ लाख लोक आले...": चेंगराचेंगरीच्या घटनेवर कर्नाटकचे मुख्यमंत्री काय बोलले?
7
स्टेडियमबाहेर चेंगराचेंगरीत लोकांचा जीव गेला, आतमध्ये १० मिनिटांत RCB खेळाडूंचा सत्कार उरकला
8
IPL चॅम्पियन्सना बघण्याच्या नादात रक्त सांडलं! RCB च्या विजयी मिरवणुकीदरम्यान नेमकं काय घडलं? VIDEO
9
चायनामन प्रेमात पडला अन् गुपचूप साखरपुडा उरकला; कुलदीप यादवची होणारी पत्नी LIC कर्मचारी...  
10
Video: अख्ख बंगळुरू 'हाऊसफुल', मेट्रो स्टेशनवर प्रचंड गर्दी; पाय ठेवायलाही जागा नाही
11
Bengaluru stampede: बंगळुरू चेंगराचेंगरीत आरसीबीच्या चाहत्यांचा मृत्यू, पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक
12
Bengaluru Stampede: आरसीबीच्या विजयी मिरवणुकीदरम्यान बंगळुरूत चेंगराचेंगरी; ११ जण ठार, ३३ जखमी!
13
₹350 पार जाणार अंबानींचा हा शेअर! कंपनीनं नव्या उद्योगात केलीय 'एंट्री'
14
Mumbai Fire: शॉर्ट सर्किटमुळे झेप्टोच्या गोदामात भीषण आग, सर्व सामान जळून खाक! 
15
एकतर्फी प्रेमात वेडसर झाला युवक; युवतीच्या हत्येनंतर प्रायव्हेट पार्टसह शरीरावर ४५ चाकूचे वार
16
कुटुंबासह अयोध्येत पोहोचले इलॉन मस्क यांचे वडील, प्रभू श्रीराम यांच्या नावानं दुमदुमलं विमानतळ
17
याला म्हणतात परतावा...! शत्रूंचे ड्रोन पाडणारी 'सिस्टिम' तयार करते ही कंपनी, एका महिन्यात ६१% नं वाढला शेअर; ५ वर्षांत दिला ५१५३% परतावा
18
आणखी एक पुरावा; 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये ठार झालेल्या २१ दहशतवाद्यांच्या कबरीचे फोटो समोर
19
"हे देशद्रोहापेक्षा कमी नाही..."; राहुल गांधींवर का संतापले भाजपा अध्यक्ष जे.पी. नड्डा?
20
वयाच्या ५७ व्या वर्षी अरबाज खान होणार बाबा! पत्नी शूरा प्रेग्नंट, बेबी बंपने वेधलं लक्ष

शेतक-यांना संपविण्याचे सरकारचे षडयंत्र!

By admin | Updated: February 5, 2016 02:22 IST

मोताळ्यात युवक काँग्रेसचा एल्गार मोर्चा; युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अमरिंदरसिंग ब्रार यांचा आरोप.

बुलडाणा : केंद्र व राज्यातील भाजपा सरकार हे शेतकरीविरोधी आहे. उद्योगपती आणि व्यापार्‍यांच्या सोयीचे निर्णय घेताना, या सरकारकडे पैसा असतो; मात्र शेतकर्‍यांना कर्जमाफी, कापसाचे अनुदान, दुष्काळी मदत देताना पैसा नसतो. या सरकारचे उद्दिष्ट शेतकर्‍याला संपविण्याचे असून, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मानसिकतेतून हे षडयंत्र रचले जात आहे, असा आरोप अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष आ. अमरिंदरसिंग राजा ब्रार यांनी केला. मोताळा येथे युवक काँग्रेसच्या वतीने आयोजित एल्गार मोर्चात अमरिंदरसिंग बोलत होते. मंचावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, आ. राहुल बोंद्रे, आ. हर्षवर्धन सपकाळ, आ. अमित झनक, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्‍वजित कदम, युवक काँग्रेसचे प्रभारी हिंमतसिंह, अ.भा. युवक काँग्रेसचे सचिव हरेकृष्णा, महिला काँग्रेसच्या सरचिटणीस जयश्री शेळके, ज्येष्ठ नेते मुख्त्यारसिंह राजपूत, बुलडाणा लोकसभा युवक काँग्रेस अध्यक्ष मनोज कायंदे आदी उपस्थित होते. अमरिंदरसिंग राजा ब्रार यांनी मोदी सरकारच्या घोषणांची खिल्ली उडवत शेतकर्‍यांच्या प्रश्नांना हात घातला. केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार हे शेतकरीविरोधी आहे. त्यांनी कांदा, भात अशा पिकांवर निर्यातमूल्य वाढविले, भूमी अधिग्रहणसारखा कायदा आणण्याचा प्रयत्न केला; मात्र काँग्रेसने हा प्रकार हाणून पाडण्यासाठी आता रस्त्यावर उतरून संघर्षाची तयारी ठेवली आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सक्रिय झाला असून, सरकारच्या ध्येय-धोरणांवर त्याचा प्रभाव दिसतो. त्यामुळेच संघाच्या इशार्‍यावर केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांनी हैदराबादमधील रोहित वेमुला या दलित विद्यार्थ्याला विद्यापीठाच्या बाहेर काढले. त्यामुळेच रोहितने आत्महत्या केली. रोहितच्या बलिदानाला युवक काँग्रेस वाया जाऊ देणार नाही. सामान्यांची वेदना या सरकारला समजत नाही. केवळ जनतेला मूर्ख बनविण्याचे काम हे सरकार करीत असून, येत्या काळात राज्यातील ३५ जिल्ह्यांमध्ये अशा स्वरूपाचे एल्गार मोर्चे काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.