शहरं
Join us  
Trending Stories
1
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
2
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
3
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
4
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
5
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
6
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
7
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
8
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
9
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
10
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
11
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
12
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
13
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
14
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
15
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
16
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
17
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
18
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
19
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
20
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं

खुशखबर; तीन दिवसाआड पाणीपुरवठा?

By admin | Updated: August 28, 2015 01:13 IST

महापालिकेचा प्रयोग; जलकुंभनिहाय होणार पाणीपुरवठा.

अकोला: जलवाहिन्यांना लागणार्‍या गळत्या आणि त्यामधून धो-धो पाण्याची होणारी नासाडी तसेच जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा न करता थेट मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रकारामुळे पाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. महापालिकेची तांत्रिक बाजू भक्कम नसल्यामुळे अकोलेकरांना सहा दिवसआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. या सर्व प्रकाराला चाप लावण्यासाठी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, शहर अभियंता अजय गुजर यांनी प्रायोगिक तत्त्वावर जलकुंभनिहाय संबंधित भागाला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, याची सुरुवात शुक्रवारी केशवनगरस्थित जलकुंभावरून होणार आहे. आजरोजी महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणात २८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अर्थातच, पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची मोठी जबाबदारी मनपाच्या जलप्रदाय विभागावर येऊन ठेपली आहे. मनपाद्वारे अकोलेकरांना सहा दिवसआड पाणीपुरवठा केला जात असून, तांत्रिक बाजू भक्कम केल्यास भविष्यात किमान चार किंवा तीन दिवसआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे. आजपर्यंत जलप्रदाय विभागातील कार्यकारी अभियंता पद रिक्त होते. सक्षम अधिकारी नसल्याने मानधन तत्त्वावर कार्यरत कर्मचार्‍यांनी पाणीपुरवठय़ाचे कामकाज चालवले. यादरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांची मनपाच्या जलप्रदाय विभागात बदली झाली. पाणीपुरवठय़ाची विस्कटलेली घडी रुळावर आणण्यासाठी कार्यकारी अभियंता हुंगे आणि शहर अभियंता गुजर यांनी पाणीपुरवठय़ाचा आराखडा तयार केला. यापूर्वी महान येथून पाण्याचा उपसा केल्यानंतर तो जलकुंभापर्यंत न पोहचविता थेट मुख्य जलवाहिनीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात होता. यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होण्यासोबतच शेवटच्या वस्त्यांपर्यंत पाणी मिळत नसल्याची स्थिती होती. शिवाय लोकसंख्येच्या तुलनेत नेमके किती लीटर पाणी नागरिकांना दिल्या जात आहे, याचा हिशेबही जुळत नव्हता. याअनुषंगाने प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर जलकुंभनिहाय पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात केशवनगरस्थित जलकुंभावरून होणार आहे. एका जलकुंभावरून सकाळी तसेच सायंकाळी संबंधित भागाला टप्प्याटप्प्याने पाणीपुवठा केला जाईल. जलकुंभाद्वारे होणार्‍या पाणीपुरवठय़ाला दाब राहणार असल्याने शेवटच्या घटकापर्यंंत पाणी पोहोचण्यास मदत होण्याचा मनपाला विश्‍वास आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अकोलेकरांना चार किंवा तीन दिवसआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.