शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

खुशखबर; तीन दिवसाआड पाणीपुरवठा?

By admin | Updated: August 28, 2015 01:13 IST

महापालिकेचा प्रयोग; जलकुंभनिहाय होणार पाणीपुरवठा.

अकोला: जलवाहिन्यांना लागणार्‍या गळत्या आणि त्यामधून धो-धो पाण्याची होणारी नासाडी तसेच जलकुंभाद्वारे पाणीपुरवठा न करता थेट मुख्य जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा करण्याच्या प्रकारामुळे पाण्याचे वेळापत्रक विस्कळीत झाले आहे. महापालिकेची तांत्रिक बाजू भक्कम नसल्यामुळे अकोलेकरांना सहा दिवसआड पाणीपुरवठा करण्याची नामुष्की प्रशासनावर ओढवली. या सर्व प्रकाराला चाप लावण्यासाठी जलप्रदाय विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे, शहर अभियंता अजय गुजर यांनी प्रायोगिक तत्त्वावर जलकुंभनिहाय संबंधित भागाला पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला असून, याची सुरुवात शुक्रवारी केशवनगरस्थित जलकुंभावरून होणार आहे. आजरोजी महान (काटेपूर्णा प्रकल्प) धरणात २८ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. अर्थातच, पाण्याचे काटेकोर नियोजन करण्याची मोठी जबाबदारी मनपाच्या जलप्रदाय विभागावर येऊन ठेपली आहे. मनपाद्वारे अकोलेकरांना सहा दिवसआड पाणीपुरवठा केला जात असून, तांत्रिक बाजू भक्कम केल्यास भविष्यात किमान चार किंवा तीन दिवसआड पाणीपुरवठा करणे शक्य आहे. आजपर्यंत जलप्रदाय विभागातील कार्यकारी अभियंता पद रिक्त होते. सक्षम अधिकारी नसल्याने मानधन तत्त्वावर कार्यरत कर्मचार्‍यांनी पाणीपुरवठय़ाचे कामकाज चालवले. यादरम्यान, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे कार्यकारी अभियंता सुरेश हुंगे यांची मनपाच्या जलप्रदाय विभागात बदली झाली. पाणीपुरवठय़ाची विस्कटलेली घडी रुळावर आणण्यासाठी कार्यकारी अभियंता हुंगे आणि शहर अभियंता गुजर यांनी पाणीपुरवठय़ाचा आराखडा तयार केला. यापूर्वी महान येथून पाण्याचा उपसा केल्यानंतर तो जलकुंभापर्यंत न पोहचविता थेट मुख्य जलवाहिनीद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचविल्या जात होता. यामुळे पाण्याची प्रचंड नासाडी होण्यासोबतच शेवटच्या वस्त्यांपर्यंत पाणी मिळत नसल्याची स्थिती होती. शिवाय लोकसंख्येच्या तुलनेत नेमके किती लीटर पाणी नागरिकांना दिल्या जात आहे, याचा हिशेबही जुळत नव्हता. याअनुषंगाने प्रशासनाने प्रायोगिक तत्त्वावर जलकुंभनिहाय पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. याची सुरुवात केशवनगरस्थित जलकुंभावरून होणार आहे. एका जलकुंभावरून सकाळी तसेच सायंकाळी संबंधित भागाला टप्प्याटप्प्याने पाणीपुवठा केला जाईल. जलकुंभाद्वारे होणार्‍या पाणीपुरवठय़ाला दाब राहणार असल्याने शेवटच्या घटकापर्यंंत पाणी पोहोचण्यास मदत होण्याचा मनपाला विश्‍वास आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास अकोलेकरांना चार किंवा तीन दिवसआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे.