शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
7
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
8
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
9
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
10
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
11
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
12
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
13
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
14
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
15
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
16
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
17
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
18
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
19
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
20
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!

प्रत्येक झाडाला पाण्याचा ग्लास!

By admin | Updated: July 11, 2017 01:45 IST

दिग्रस परिसरात पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड

राहुल सोनोने । लोकमत न्यूज नेटवर्कदिग्रस बु : प्रत्येक झाडाला पाण्याचा ग्लास देऊन सुकलेली पिके वाचवण्यासाठी शेतकरी धडपड करीत असल्याचे चित्र दिग्रस बु.परिसरात आहे. दुबार पेरणी करूनही पावसाने दांडी मारल्याने शेतकऱ्यांवर तिबार पेरणीचे संकट आहे. पातूर तालुक्यातील दिग्रस बु. परिसरात सुरुवातीला चांगला पाऊस झाल्याने जवळपास सर्वच शेतकऱ्यांनी कपाशी, सोयाबीन, तूर, उडीद, ज्वारी आदी पिकांची पेरणी केली आहे. पेरणीनंतर पावसाने दांडी मारल्याने उगवलेले अंकुर कोमेजत आहे; तसेच काही शेतकऱ्यांच्या शेतात पिके वर आलेली आहेत. या पिकांना वाचवण्यासाठी शेतकऱ्यांनी आगळी वेगळी युक्ती काढली आहे. रोपांजवळ प्लास्टिकचे ग्लास ठेवून त्याला छिद्र करण्यात आले आहे. या ग्लासच्या माध्यमातून रोपांना पाणी देऊन पिके वाचवण्याची केविलवाणी धडपड शेतकरी करीत असल्याचे चित्र दिग्रस बु. परिसरात आहे. आधीच महागडे बियाणे घेऊन पेरणी केलेली आहे. ग्लासने पाणी देण्यासाठी दोन ते तीन हजार ग्लास लागतात; तसेच त्यामध्ये पाणी टाकण्यासाठी मजूर लावावे लागतात. ही न परवडणारी बाब असली, तरी पिकांना वाचवण्यासाठी शेतकरी करीत आहेत. दिग्रस बु., दिग्रस खुर्द परिसरात पावसासाठी चिमुकले धोंडी मागत आहेत. दुबार पेरणी करूनही पाऊस नसल्याने शेतकऱ्यांसमोर तिबार पेरणीचे संकट उभे आहे.आधीच कर्जाचा डोंगर असताना पावसाने दांडी मारल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.