शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

एका प्रभागासाठी किमान १00 सफाई कर्मचारी द्या!

By admin | Updated: March 25, 2017 01:42 IST

अकोला महापालिकेच्या सर्वपक्षीय नगरसेवकांची सभागृहात एकमुखी मागणी

अकोला, दि. २४- महापालिकेच्या हद्दवाढीमुळे प्रभागांच्या क्षेत्रफळात कमालीची वाढ झाली आहे. सफाई कर्मचार्‍यांच्या कामकाजाचा पूर्वानुभव लक्षात घेता, एका प्रभागासाठी किमान १00 सफाई कर्मचार्‍यांची गरज असल्याचे सांगत प्रशासनाने तयार केलेल्या ६0 कर्मचार्‍यांच्या प्रस्तावाला सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. यासंदर्भात प्रशासनासोबत चर्चा करून समन्वयातून तोडगा काढण्याचे आश्‍वासन देत प्रशासनाच्या प्रस्तावाला महापौर विजय अग्रवाल यांनी कार्योत्तर मंजुरी दिली. सत्ता स्थापनेनंतर महापालिकेच्या सभागृहात शुक्रवारी विशेष सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. शहरालगतच्या गावांचा महापालिकेच्या सोयी-सुविधांवर ताण पडत असल्यामुळे तसेच शहराची हद्दवाढ गरजेची असल्याने मनपा क्षेत्राची हद्दवाढ करण्यात आली. राज्य शासनाने ३0 ऑगस्ट २0१६ रोजी हद्दवाढीची अधिसूचना जारी करीत शहरालगतच्या १३ प्रमुख ग्रामपंचायतींसह २४ गावांचा मनपात समावेश केला. हद्दवाढ झाल्यामुळे प्रभाग पुनर्रचनेदरम्यान प्रभागांचे भौगोलिक क्षेत्रफळदेखील वाढले. नवीन प्रभागातील साफसफाईची समस्या व अपुरे मनुष्यबळ पाहता मनपा प्रशासनाने खासगी पुरवठादाराच्या माध्यमातून ३५0 किंवा आवश्यकतेप्रमाणे सफाई कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेतला. एका प्रभागात ६0 सफाई कर्मचार्‍यांची नेमणूक करण्याचा प्रस्ताव विशेष सभेत मांडण्यात आला असता, सर्वपक्षीय नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. यापूर्वी दोन वॉर्ड मिळून एक प्रभाग होता. खासगी तत्त्वावर एका प्रभागात ३0 कर्मचारी होते. काही कामचुकार कर्मचार्‍यांमुळे साफसफाईची समस्या कायम राहत असल्याची परिस्थिती होती.प्रभागांचे क्षेत्रफळ पाहता एका प्रभागासाठी किमान १00 ते १२५ सफाई कर्मचार्‍यांची गरज असल्याचा मुद्दा भाजपचे गटनेता राहुल देशमुख, सुमन गावंडे, बाळ टाले, विनोद मापारी, सारिका जयस्वाल, अनिल गरड, सुनील क्षीरसागर, शिवसेनेच्या नगरसेविका मंजूषा शेळके, मंगेश काळे, गजानन चव्हाण, काँग्रेसचे गटनेता साजीद खान, राकाँच्या उषा विरक, भारिपच्या गटनेत्या अँड. धनश्री देव यांनी लावून धरला. सर्वपक्षीय नगरसेवकांचा सूर पाहता यासंदर्भात प्रशासनासोबत चर्चा करून कर्मचार्‍यांच्या संख्येवर शिक्कामोर्तब करणार असल्याचे सांगत महापौर विजय अग्रवाल यांनी विषयाला कार्योत्तर मंजुरी दिली. तत्पूर्वी महापौर विजय अग्रवाल, उपमहापौर वैशाली शेळके यांचे पुष्पगुच्छ देऊन आयुक्त अजय लहाने, गटनेता साजीद खान व जीशान हुसेन यांनी स्वागत केले.आठ तास काम करावेच लागेल!सफाई कर्मचार्‍यांच्या संख्येत कितीही वाढ केली, तरी त्यांच्या कामाचा अवधी लक्षात घेता, साफसफाईची समस्या कायम राहत असल्याचा मुद्दा नगरसेवकांनी उपस्थित केला. कामचुकार सफाई कर्मचारी केवळ दोन ते तीन तास काम करतात. त्यानंतर पळ काढतात. त्यामुळे यापुढे सफाई कर्मचार्‍यांना आठ तास काम करावेच लागेल, असा सज्जड दम महापालिका आयुक्त अजय लहाने यांनी दिला. त्याला महापौर विजय अग्रवाल यांनी दुजोरा दिला.