शहरं
Join us  
Trending Stories
1
समीर वानखेडे यांना झटका! आर्यन खानच्या शोवरील मानहानी खटल्यात सुनावणी, कोर्ट काय म्हणाले..
2
टाटाने Nexon EV विकल्या पण स्पेअर पार्टच मिळत नाहीत...; चार्जिंग गन जोडतात तेच अ‍ॅक्च्युएटर फॉल्टी
3
मारुती सुझुकीने रचला इतिहास; फोर्ड, जीएम, फोक्सवॅगनला पछाडत ठरली जगातील ८वी सर्वात मौल्यवान ऑटो कंपनी
4
गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड! पाहा ११ कोटी रुपयांच्या १० किलो सोन्याच्या 'दुबई ड्रेस'चे खास फोटो
5
लक्ष्मी मित्तल यांनी दिल्लीत केली या वर्षीची सर्वात मोठी प्रॉपर्टी डील, कितीला खरेदी केला बंगला?
6
आंधळं प्रेम! प्रियकरला भेटण्यासाठी ११०० किमीचा प्रवास करून मध्य प्रदेशला पोहोचली १८ वर्षांची मुलगी; पण पुढे काहीतरी भलतंच घडलं
7
जीएसटी २२ सप्टेंबरला घटला, अन् टर्म इन्शुरन्सचे हप्ते कंपन्यांनी चार दिवसांनी कमी केले; कारण काय...
8
पर्सनल लोन हवे आहे? 'ही' सरकारी बँक देत आहे सर्वात स्वस्त कर्ज, पहा टॉप बँकांचे दर आणि EMI
9
पाकिस्तानच्या पंतप्रधानांचा पुन्हा आंतरराष्ट्रीय अपमान! ट्रम्प यांनी व्हाईट हाऊसमध्ये बोलावून ताटकळत ठेवले
10
नवरात्री २०२५: नवरात्रीत 'या' शुभ मुहूर्तावर डोळे मिटून करा घर-गाडीची खरेदी; वस्तू लाभणारच!
11
हाय बीपी, थायरॉईड, फॅटी लिव्हर: एका बँक कर्मचाऱ्याची वेदनादायक कहाणी, सांगितलं का सोडावी लागली नोकरी?
12
ट्रम्प यांचा 'टॅरिफ बॉम्ब'! सन फार्मा-ल्यूपिनसह 'या' कंपन्यांचे शेअर्स आपटले; ३ लाख कोटींचे नुकसान
13
CM आदित्यनाथांचे कौतुक, PM मोदींनी गुंतवणुकदारांना सांगितले उत्तर प्रदेशात गुंतवणुकीचे फायदे; UPITS मध्ये काय बोलले?
14
"शंभर टक्के ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे", शिंदेंच्या आमदाराचीच सरकारकडे मागणी
15
'शबनम कांड' सारखंच प्रकरण! 'सावधान इंडिया' पाहिलं अन् फिल्मी स्टाईलनं मित्राला संपवलं; त्या तिघांमध्ये नेमकं काय झालं? 
16
"हिंदूंच्या मतांवर आमचं महायुती सरकार; आम्हाला कुणी गोल टोपी, दाढीवाल्याने मतदान केले नाही"
17
"बेबी, I Love You, जवळ ये ना..." विद्यार्थिनींना असे मेसेज पाठवणारा चैतन्यानंद मुंबईत लपलाय?
18
'मिशन शक्ती ५.०'चा धडाका! अवघ्या ३ दिवसांत १२ हरवलेल्या लोकांना शोधून काढले; योगी सरकारची पोलिसांना शाबासकी
19
प्रदूषणाने धोक्याची घंटा वाजवली! कार्बन उत्सर्जनात चीन नंबर १, भारत कितव्या क्रमांकावर? आकडेवारी पाहून बसेल धक्का
20
पीएम किसान योजनेत मोठा बदल! आता 'या' शेतकऱ्यांनाही मिळणार लाभ, २१ वा हप्ता कधी?

चालू वर्षातील थकबाकीदारांनाही कर्जमाफीचा लाभ द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 02:16 IST

विनायक मेटे : शिवसंग्राम करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यावर पावणेचार लाख कोटींचे कर्ज असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी कौतुकास्पद असल्याचे सांगतानाच, शासनाने ३० जून १०१७ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्रामच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी शुक्रवारी येथे दिली.शिवसंग्रामची आढावा बैठक घेण्यासाठी येथे आलेल्या विनायकराव मेटे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बातमीदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या दुबार पेरणीच्या संकटासह अलीकडे देण्यात आलेल्या कर्जमाफीवर भाष्य केले. राज्यातील बहुतांश भागात पेरण्या आटोपल्या असल्या, तरी पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे चित्र विदारक आहे. विदर्भातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर पेरण्या उलटण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने महसूल खात्यामार्फत सर्वेक्षण करून, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व पेरणीच्या मजुरीसह खर्चाचा हिशेब तयार करावा. वेळ पडल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची तयारी शासनाने ठेवावी. तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला द्यावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. सरकारने वर्ष २००९ पासून ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. आधी २०१२ पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविणाऱ्या शासनाने हा अवधी २००९ पर्यंत वाढविला. हा निर्णय कौतुकास्पदच आहे. त्याचवेळी शासनाने ३१ जून २०१७ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच तो सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पाकिस्तानचे नाहीतसरसकट सर्वांनाच कर्जमाफीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्या शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची ओरड होत आहे. या विषयावर बोलताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हे पाकिस्तानातील आहेत का, असा प्रतिप्रश्न मेटे यांनी केला. शेतकऱ्यांबाबतचे धोरण ठरविताना प्रादेशिक भेदभाव होता कामा नये, असे ते म्हणाले.शिवसेना, शिवसंग्रामच्या भूमिकेत फरकशेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेत आणि शिवसंग्रामच्या भूमिकेत फरक असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले. आमची भूमिका भांडायची नव्हे, तर शेतकऱ्यांच्या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडायच्या व त्यांचे समाधान करून घ्यायचे, अशी असल्याचे मेटे यांनी सांगितले.