शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन; राम मनोहर लोहिया रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास
2
डोनाल्ड ट्रंप टॅरिफविरोधात भारतीय सैन्याची एन्ट्री; ५४ वर्षांपूर्वीची कारस्थाने बाहेर काढली...
3
'विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला', 'ऑपरेशन सिंदूर'बाबतच्या चर्चेवरून PM मोदींचा टोला
4
"कोण खरा भारतीय, कोण नाही हे कोर्ट ठरवू शकत नाही’’, प्रियंका गांधींनी केला राहुल गांधींचा बचाव
5
राज ठाकरेंशी युतीला कौल? इंडिया-मविआवर पाणी सोडण्याची तयारी? दिल्लीत उद्धव ठाकरेंची परीक्षा
6
Anil Ambani at ED Office : अनिल अंबानी ED च्या कार्यालयात दाखल; १७ हजार कोटींच्या कर्जाच्या फसवणुकीप्रकरणी झाले हजर
7
मी तिचा पहिला रूग्ण, ती माझी शेवटची डॉक्टर, १३ दिवसांचा ड्रामा नको...; इंजिनिअरनं संपवलं जीवन
8
बँकेचा CEO बदलताच शेअरला 'रॉकेट' स्पीड! एका झटक्यात गुंतवणूकदारांना झाला इतका फायदा
9
'या' महिला खासदाराचे क्रश आहेत पंकज त्रिपाठी, कॉफी डेटची दिलेली ऑफर, म्हणाल्या- "मी त्यांना पत्रही लिहिलं होतं पण..."
10
Mahabharat: महाभारतात ४५ लाख योद्ध्यांसाठी १८ दिवस कोण करत होतं स्वयंपाक?
11
ऑपरेशन सिंदूरचा जोरदार दणका! पाकिस्तानचं रहीम यार खान एअरबेस अजूनही बंद; पुन्हा जारी करण्यात आला NOTAM
12
IND vs ENG: 'या' विकेटने सामना फिरला...; सुनील गावसकरांनी सांगितला सामन्याचा 'टर्निंग पॉईंट'
13
खळबळजनक! एकतर्फी प्रेमात वेडा झाला तरुण, १५ वर्षांच्या मुलीवर दिवसाढवळ्या झाडल्या गोळ्या
14
"लाल किल्ल्यावर भगवा फडकवा पण तिरंगा मानलाच पाहिजे"; संभाजी भिडेंच्या विधानाची चर्चा
15
'दीवार'मधला चिमुकला आहे 'या' मराठी अभिनेत्रीचा मोठा भाऊ, कुटुंबासोबत परदेशात झाला स्थायिक
16
FD की सोने? गुंतवणुकीचा राजा कोण? बहुतेकांना यातील फायदे तोटे माहिती नाही, कशी करायची योग्य निवड?
17
बाबा वेंगाची ऑगस्टसाठी डबल फायर भविष्यवाणी; भले भले अंदाज लावून थकले...
18
आनंदाची बातमी! WhatsApp वापरत नसलेल्यांशी करता येणार चॅट, नव्या फीचरची कमाल
19
'सैराट' फेम अभिनेता लवकरच होणार बाबा?, बेबी शॉवरचे फोटो आले समोर
20
TCS ऑफिसबाहेर फुटपाथवरच झोपला कर्मचारी, थकीत सॅलरीवरून वाद; टाटा कंपनीनं मौन सोडलं

चालू वर्षातील थकबाकीदारांनाही कर्जमाफीचा लाभ द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 02:16 IST

विनायक मेटे : शिवसंग्राम करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यावर पावणेचार लाख कोटींचे कर्ज असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी कौतुकास्पद असल्याचे सांगतानाच, शासनाने ३० जून १०१७ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्रामच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी शुक्रवारी येथे दिली.शिवसंग्रामची आढावा बैठक घेण्यासाठी येथे आलेल्या विनायकराव मेटे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बातमीदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या दुबार पेरणीच्या संकटासह अलीकडे देण्यात आलेल्या कर्जमाफीवर भाष्य केले. राज्यातील बहुतांश भागात पेरण्या आटोपल्या असल्या, तरी पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे चित्र विदारक आहे. विदर्भातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर पेरण्या उलटण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने महसूल खात्यामार्फत सर्वेक्षण करून, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व पेरणीच्या मजुरीसह खर्चाचा हिशेब तयार करावा. वेळ पडल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची तयारी शासनाने ठेवावी. तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला द्यावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. सरकारने वर्ष २००९ पासून ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. आधी २०१२ पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविणाऱ्या शासनाने हा अवधी २००९ पर्यंत वाढविला. हा निर्णय कौतुकास्पदच आहे. त्याचवेळी शासनाने ३१ जून २०१७ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच तो सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पाकिस्तानचे नाहीतसरसकट सर्वांनाच कर्जमाफीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्या शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची ओरड होत आहे. या विषयावर बोलताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हे पाकिस्तानातील आहेत का, असा प्रतिप्रश्न मेटे यांनी केला. शेतकऱ्यांबाबतचे धोरण ठरविताना प्रादेशिक भेदभाव होता कामा नये, असे ते म्हणाले.शिवसेना, शिवसंग्रामच्या भूमिकेत फरकशेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेत आणि शिवसंग्रामच्या भूमिकेत फरक असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले. आमची भूमिका भांडायची नव्हे, तर शेतकऱ्यांच्या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडायच्या व त्यांचे समाधान करून घ्यायचे, अशी असल्याचे मेटे यांनी सांगितले.