शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

चालू वर्षातील थकबाकीदारांनाही कर्जमाफीचा लाभ द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2017 02:16 IST

विनायक मेटे : शिवसंग्राम करणार मुख्यमंत्र्यांकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्कअकोला : राज्यावर पावणेचार लाख कोटींचे कर्ज असतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी कौतुकास्पद असल्याचे सांगतानाच, शासनाने ३० जून १०१७ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाही या कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच दुबार पेरणीचे संकट ओढवलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शिवसंग्रामच्यावतीने मुख्यमंत्र्यांकडे केली जाणार असल्याची माहिती शिवसंग्रामचे संस्थापक अध्यक्ष तथा शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायकराव मेटे यांनी शुक्रवारी येथे दिली.शिवसंग्रामची आढावा बैठक घेण्यासाठी येथे आलेल्या विनायकराव मेटे यांनी स्थानिक विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत बातमीदारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पावसाच्या दडीमुळे शेतकऱ्यांवर ओढवलेल्या दुबार पेरणीच्या संकटासह अलीकडे देण्यात आलेल्या कर्जमाफीवर भाष्य केले. राज्यातील बहुतांश भागात पेरण्या आटोपल्या असल्या, तरी पावसाने दडी मारल्यामुळे शेतीचे चित्र विदारक आहे. विदर्भातील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे. येत्या चार-पाच दिवसांत पाऊस आला नाही, तर पेरण्या उलटण्याची शक्यता आहे. या पृष्ठभूमीवर शासनाने महसूल खात्यामार्फत सर्वेक्षण करून, शेतकऱ्यांना बी-बियाणे, खते व पेरणीच्या मजुरीसह खर्चाचा हिशेब तयार करावा. वेळ पडल्यास शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची तयारी शासनाने ठेवावी. तसे आदेश मुख्यमंत्र्यांनी प्रशासनाला द्यावे, अशी मागणी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले. सरकारने वर्ष २००९ पासून ते ३० जून २०१६ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली आहे. आधी २०१२ पर्यंतच्या थकबाकीदारांना कर्जमाफीसाठी पात्र ठरविणाऱ्या शासनाने हा अवधी २००९ पर्यंत वाढविला. हा निर्णय कौतुकास्पदच आहे. त्याचवेळी शासनाने ३१ जून २०१७ पर्यंत थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा, तसेच तो सरसकट सर्व शेतकऱ्यांना द्यावा, अशी मागणीही मुख्यमंत्र्यांकडे करणार असल्याचे मेटे यांनी सांगितले.पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी पाकिस्तानचे नाहीतसरसकट सर्वांनाच कर्जमाफीमुळे पश्चिम महाराष्ट्रातील धनदांडग्या शेतकऱ्यांना लाभ होणार असल्याची ओरड होत आहे. या विषयावर बोलताना पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी हे पाकिस्तानातील आहेत का, असा प्रतिप्रश्न मेटे यांनी केला. शेतकऱ्यांबाबतचे धोरण ठरविताना प्रादेशिक भेदभाव होता कामा नये, असे ते म्हणाले.शिवसेना, शिवसंग्रामच्या भूमिकेत फरकशेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याबाबत शिवसेनेने घेतलेल्या भूमिकेत आणि शिवसंग्रामच्या भूमिकेत फरक असल्याचे मेटे यांनी स्पष्ट केले. आमची भूमिका भांडायची नव्हे, तर शेतकऱ्यांच्या सर्व समस्या मुख्यमंत्र्यांसमोर मांडायच्या व त्यांचे समाधान करून घ्यायचे, अशी असल्याचे मेटे यांनी सांगितले.