शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

वान धरणातून अकाेलेकरांना हक्काचे पाणी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST

वान धरणातून बाळापूर मतदारसंघातील ६९ गावांमधील नागरिकांसाठी दिल्या जाणारा ४ दलघमी पाणी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ६९ गावांमध्ये ...

वान धरणातून बाळापूर मतदारसंघातील ६९ गावांमधील नागरिकांसाठी दिल्या जाणारा ४ दलघमी पाणी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ६९ गावांमध्ये बहुतांश भागाचा खारपाणपट्ट्यात समावेश हाेत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे तेल्हारा तालुक्यात काही राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी वान धरणातील पाण्याचा एक थेंबही देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. अशा वातावरणात आता शिवसेनेने तत्कालीन भाजप,सेना युतीच्या कालावधीत ‘अमृत’अभियान अंतर्गत अकाेलेकरांसाठी मंजूर करण्यात आलेल्या २४ दलघमी पाणी आरक्षणाचा प्रलंबित तिढा निकाली काढण्याची मागणी केली आहे. सेनेचे शहर प्रमुख (अकाेला पश्चिम)तथा गटनेता राजेश मिश्रा यांनी वान धरणातून आरक्षित केलेल्या २४ दलघमी पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मिश्रा यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासह भाजप व सेनेच्या लाेकप्रतिनिधींना पत्राद्वारे साकडे घातले आहे. राजेश मिश्रा यांच्या पत्रामुळे विविध राजकीय पक्षातील अनेकांची काेंडी हाेणार असून शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात काेण पुढाकार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाणी आरक्षणाचा मुद्दा तापणार

नाेव्हेंबर २०२१ मध्ये नगरपरिषद, नगर पालिकांच्या निवडणुका पार पडतील. त्यापूर्वी अकाेला,बुलडाणा व वाशिम मधील स्थानिक स्वराज्य संस्थेची(विधान परिषद) निवडणूक हाेईल. या दाेन्ही निवडणुकीत व त्यानंतर २०२२ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरासाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचे संकेत आहेत.