शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमदार माजलेत असं बाहेर म्हटलं जातंय, राजकारणाच्या पलीकडे जाणार की नाही?"; CM फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
2
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
3
'करेंगे दंगे चारों ओर', महाराष्ट्र विधानसभेतील हाणामारीवर कुणाल कामराने टीका केली; व्हिडीओ व्हायरल
4
विदेशी सट्टेबाजांचा वायदे बाजारावर डाव, छोट्या गुंतवणूकदारांनो सजगतेनं करा बचाव!
5
विधिमंडळ परिसरात धक्काबुक्की प्रकरणी विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला, दोषींवर होणार अशी कारवाई 
6
शाहरुख खानच्या मेकअप रुमबाहेर काढला फोटो, मराठी अभिनेत्रीने व्यक्त केला आनंद
7
"मोदींच्या नेतृत्वाखाली २०२९ निवडणूक लढवावी लागणे ही भाजपची मजबुरी"; भाजप खासदाराचे विधान
8
रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशीन मार्केटमध्ये रिलायन्सची एन्ट्री, १०० वर्ष जुनी अमेरिकन कंपनी केली खरेदी
9
सोन्याची झळाळी कमी होणार, चांदीची चमक मात्र वाढणार; १३ टक्क्यांच्या तेजीचा अंदाज, किती जाऊ शकतो भाव?
10
मोहम्मद शमीची एक्स पत्नी हसीन जहां आणि मुलीवर हत्येच्या प्रयत्नाचा आरोप, गुन्हा दाखल; भांडणाचा व्हिडिओ व्हायरल
11
Narendra Modi : "बिहारला लुटलं, बदला घेतला..."; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा काँग्रेस-राजदवर जोरदार हल्लाबोल
12
IND vs ENG : लॉर्ड्सच्या मैदानातील पराभवानंतर या दिग्गजांनी काढली जड्डूची चूक; आता गंभीर म्हणाला...
13
जगातला एकमेव अनोखा देश, 'या' देशाला राजधानीच नाही! तुम्हाला माहितीये का?
14
गुहेत सापडलेल्या रशियन महिलेबाबत मोठी माहिती आली समोर; इस्त्रायलच्या पार्टनरने केली वेगळीच मागणी
15
महाराष्ट्रातील गणेशोत्सव राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचवणार, आशिष शेलार यांची घोषणा
16
मित्र-नातेवाईकांसाठी 'जामीनदार' बनताय? 'ही' काळजी घेतली नाही तर बँक दारातही उभं करणार नाही
17
मोठी बातमी! सांगलीतील 'इस्लामपूर' शहराचे नाव बदलणार; भुजबळांची विधानसभेत घोषणा
18
स्टायलिश लूकसह जबरदस्त फीचर्स! टीव्हीएसची स्पोर्ट्स बाईक अपाचे आरटीआर ३१० भारतात लॉन्च
19
सीईओंना कोट्यवधी रुपयाचं पॅकेज तर इंटर्नला ५०० रुपयांचं ॲमेझॉन व्हाउचर! तरुणाच्या पोस्टने खळबळ

वान धरणातून अकाेलेकरांना हक्काचे पाणी द्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 8, 2020 04:16 IST

वान धरणातून बाळापूर मतदारसंघातील ६९ गावांमधील नागरिकांसाठी दिल्या जाणारा ४ दलघमी पाणी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ६९ गावांमध्ये ...

वान धरणातून बाळापूर मतदारसंघातील ६९ गावांमधील नागरिकांसाठी दिल्या जाणारा ४ दलघमी पाणी आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. ६९ गावांमध्ये बहुतांश भागाचा खारपाणपट्ट्यात समावेश हाेत असल्याने ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत असल्याची परिस्थिती आहे. दुसरीकडे तेल्हारा तालुक्यात काही राजकीय पक्ष, सामाजिक संघटनांनी वान धरणातील पाण्याचा एक थेंबही देणार नसल्याची भूमिका घेतली आहे. अशा वातावरणात आता शिवसेनेने तत्कालीन भाजप,सेना युतीच्या कालावधीत ‘अमृत’अभियान अंतर्गत अकाेलेकरांसाठी मंजूर करण्यात आलेल्या २४ दलघमी पाणी आरक्षणाचा प्रलंबित तिढा निकाली काढण्याची मागणी केली आहे. सेनेचे शहर प्रमुख (अकाेला पश्चिम)तथा गटनेता राजेश मिश्रा यांनी वान धरणातून आरक्षित केलेल्या २४ दलघमी पाण्याचा पुरवठा करण्याची मागणी केली आहे. मिश्रा यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांच्यासह भाजप व सेनेच्या लाेकप्रतिनिधींना पत्राद्वारे साकडे घातले आहे. राजेश मिश्रा यांच्या पत्रामुळे विविध राजकीय पक्षातील अनेकांची काेंडी हाेणार असून शहराच्या पाणीपुरवठ्यासंदर्भात काेण पुढाकार घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पाणी आरक्षणाचा मुद्दा तापणार

नाेव्हेंबर २०२१ मध्ये नगरपरिषद, नगर पालिकांच्या निवडणुका पार पडतील. त्यापूर्वी अकाेला,बुलडाणा व वाशिम मधील स्थानिक स्वराज्य संस्थेची(विधान परिषद) निवडणूक हाेईल. या दाेन्ही निवडणुकीत व त्यानंतर २०२२ मधील मनपाच्या सार्वत्रिक निवडणुकीत शहरासाठी आरक्षित केलेल्या पाण्याचा मुद्दा चांगलाच तापणार असल्याचे संकेत आहेत.