शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

अंदुरा येथील विद्या मंदिरात नियमबाह्य संचालक मंडळाची निवड करण्याचा घाट!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:24 IST

ग्रामपंचायतच्या मासिक सभेत अनेक ठराव घेतले आहेत. याबाबत विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष फुलचंद जयदेव पाटील यांनी लेखी तक्रार शिक्षणाधिकारी ...

ग्रामपंचायतच्या मासिक सभेत अनेक ठराव घेतले आहेत. याबाबत विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष फुलचंद जयदेव पाटील यांनी लेखी तक्रार शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याकडे केली आहे. याबाबतीत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांना पत्र देऊन विद्या मंदिर शाळेत कार्यरत असणारी समिती ही नियमानुसार असून या समितीला पाच वर्षे हटविण्याचा अधिकार ग्रामपंचायतला नाही व ग्रामपंचायतने घेतलेले ठराव नियमबाह्य आहेत.

सरपंच, सदस्यांविरूद्ध कारवाई करण्याचे सीईओंचे संकेत!

ठराव घेणारे सरपंच, उपसरपंच व सदस्यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे ३९(१) चा भंग केला असून, त्यांच्यावर नियमानुसार कारवाई करण्यात यावी. अशा आशयाचे पत्र गटशिक्षणाधिकारी बाळापूर यांना मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहे. तसेच अंदुरा ग्रामपंचायत सरपंच व पदाधिकारी यांनी अधिनियम १९५९ कलम ३९( १) चा भंग केला काय? याची तपासणी करून अहवाल सादर करण्याबाबत सुचविले आहे.

ग्रामपंचायतच्या सदस्यांची संस्थाचालकपदी निवड बेकायदेशीर

विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष फुलचंद पाटील यांनी शाळेच्या बेरार ॲक्ट १९३९ कलम ४ नुसार ११ सदस्यांची कार्यकारिणी गठित करणेबाबत ग्रामपंचायतने बेकायदेशीरपणे ठराव घेऊन संजय वानखडे, अक्षय वानखडे, वंदना गवारगुरु, अर्चना भगत, सीताबाई उगले या ग्रामपंचायत सदस्यांची सभासद म्हणून बेकायदेशीरपणे निवड केली. तसेच गावातील शाम वराळे व महादेव ढंगारे यांची निवड देखील बेकायदेशीर असल्याचा आरोप संस्थेचे अध्यक्ष फुलचंद पाटील यांनी केला असून महादेव तुळशीराम ढंगारे यांनी विद्या मंदिर शाळेची जमीन विक्री करुन गैरव्यवहार केला असून त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. गटशिक्षणाधिकारी यांनी अधिनियम १९५९ कलम ३९ ( १) ग्रामपंचायतने आपल्या अधिकारांचा गैरवापर केला काय याबाबत १७ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता पुढील सुनावणीकरिता हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत