शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाक युद्ध थांबविणारे ट्रम्प कोण? दाल में कुछ तो काला है : राहुल गांधी
2
आजचे राशीभविष्य २४ जुलै २०२५: धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल, विचारात एकदम बदल होतील
3
बनावट दूतावास उघडले, ४ खोटे देशही बनविले; गाझियाबादमध्ये कारवाई; ४४ लाख रुपये, शिक्के जप्त
4
पाच वर्षांनंतर भारताचा मोठा निर्णय; चिनी पर्यटकांना पुन्हा व्हिसा, चीनकडूनही स्वागत
5
‘ग्रीन इंडिया’मध्ये महाराष्ट्राला सहा वर्षांपासून निधीच नाही; देशभरात एकूण ७४५ कोटी रुपये निधी उपलब्ध
6
कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीनंतर दोन महिने अटक करता येणार नाही; कायद्याचा गैरवापर टाळण्यासाठी कोर्टाचा उपाय
7
पाकिस्तान दहशतवादात बुडालेला कट्टरपंथी देश; भारताने सुरक्षा परिषदेच्या बैठकीत सुनावले खडे बोल
8
६० टक्के महामंडळांचे वाटप ठरले, ‘मलईदार’ मंडळांबाबत रस्सीखेंच
9
खासगी विनाअनुदानित वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आता १०% ईडब्लूएस कोटा; ‘एमबीबीएस’च्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर
10
उपराष्ट्रपतिपदाची निवडणूक घेण्यासाठी पूर्वतयारी सुरू; निवडणूक आयोग लवकरच जाहीर करणार वेळापत्रक
11
चीन अन् पाकिस्तानमुळे शेतकरी संकटात;  कांद्याची आखातातील निर्यात ४०% घसरली
12
IND vs ENG 4th Test Day 1 Stumps : साईच्या 'फिफ्टी'सह मोठा तिढा सुटला, पण...
13
डिजिटल अरेस्ट करणाऱ्या गँगवर मोठी कारवाई, कंबोडियामध्ये १०५ भारतीयांसह ३०७५ अटकेत
14
पूजा खेडकर यांना धक्का! नॉन क्रिमीलेयर रद्द, ओबीसी प्रमाणपत्र मात्र कायम राहणार
15
'देशाच्या राजकारणातील आशादायी नेतृत्व...'; संजय राऊत यांची नितीन गडकरींसाठी खास पोस्ट
16
उड्डाण करत असतानाच विमानाच्या इंजिनाला आग, पायलटने दिला मेडे कॉल, अहमदाबादमध्ये मोठा अपघात टळला  
17
छेड काढणाऱ्या संभाजी ब्रिगेडच्या माजी प्रदेशाध्यक्षांना महिलेने चपलेने मारले 
18
कॉलेजमध्ये मराठीत बोलल्याने विद्यार्थ्याला हॉकी स्टिकने मारहाण, जिवे मारण्याची धमकी देऊन आरोपी फरार
19
बापरे! टीम इंडियाला मोठा धक्का; उलटा फटका मारताना पंतला दुखापत; लंगडत लंगडत सोडलं मैदान (VIDEO)
20
"महायुती सरकारने महाराष्ट्राचा बनवला तमाशा, विधानसभेत क्लब तर बाहेर WWF चा आखाडा’’, काँग्रेसची बोचरी टीका  

टंचाई निवारणासाठी सज्ज व्हा!

By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST

पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश

अकोला : मान्सून लांबल्याने जिल्ह्यातील पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवारी दिले. पाऊस लांबल्याच्या स्थितीत पर्यायी पेरणीसाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा सुरू होऊन, महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच धरणांमधील जलसाठादेखील कमी होत असल्याने, पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर आणखी काही दिवस पाऊस न आल्यास निर्माण होणार्‍या टंचाई परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. येत्या १0 जुलैपर्यंत पाऊस न आल्यास तालुका स्तरावर बैठका घेऊन, तहसीलदार आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांनी पाणीटंचाई निवारणासाठी तहसीलदार आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांनी पुढील तीन महिन्यांचा उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. तसेच चाराटंचाईसंदर्भात माहिती घेऊन त्यासंदर्भात उपाययोजनांची कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच वैरण विकास आणि भरड धान्य विकास कार्यक्रमांतर्गत चारा निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश तालुका कृषी अधिकार्‍यांना या बैठकीत देण्यात आले. पावसाअभावी जिल्ह्यात खोळंबलेल्या खरीप पेरण्या, धरणांमधील उपलब्ध जलसाठा, उपलब्ध चारा या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला. पावसाचा पत्ता नसल्याने आता मूग, उडीद ही खरीप पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे २0 जुलैपर्यंत पाऊस आल्यास सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी इत्यादी खरीप पिके घेता येतील, अशी माहिती कृषी विभागामार्फत या बैठकीत देण्यात आली. त्यानुषंगाने पाऊस आल्यास पर्यायी पीक पेरणीबाबत शेतकर्‍यांना माहिती देऊन, जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिले. या आढावा बैठकीला मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पशुसंवर्धन अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.