शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
4
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
5
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
6
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
7
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
8
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
9
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
10
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
11
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
12
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
13
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
14
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
15
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
16
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
17
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
18
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
19
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
20
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी

टंचाई निवारणासाठी सज्ज व्हा!

By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST

पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश

अकोला : मान्सून लांबल्याने जिल्ह्यातील पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवारी दिले. पाऊस लांबल्याच्या स्थितीत पर्यायी पेरणीसाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा सुरू होऊन, महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच धरणांमधील जलसाठादेखील कमी होत असल्याने, पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर आणखी काही दिवस पाऊस न आल्यास निर्माण होणार्‍या टंचाई परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. येत्या १0 जुलैपर्यंत पाऊस न आल्यास तालुका स्तरावर बैठका घेऊन, तहसीलदार आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांनी पाणीटंचाई निवारणासाठी तहसीलदार आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांनी पुढील तीन महिन्यांचा उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. तसेच चाराटंचाईसंदर्भात माहिती घेऊन त्यासंदर्भात उपाययोजनांची कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच वैरण विकास आणि भरड धान्य विकास कार्यक्रमांतर्गत चारा निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश तालुका कृषी अधिकार्‍यांना या बैठकीत देण्यात आले. पावसाअभावी जिल्ह्यात खोळंबलेल्या खरीप पेरण्या, धरणांमधील उपलब्ध जलसाठा, उपलब्ध चारा या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला. पावसाचा पत्ता नसल्याने आता मूग, उडीद ही खरीप पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे २0 जुलैपर्यंत पाऊस आल्यास सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी इत्यादी खरीप पिके घेता येतील, अशी माहिती कृषी विभागामार्फत या बैठकीत देण्यात आली. त्यानुषंगाने पाऊस आल्यास पर्यायी पीक पेरणीबाबत शेतकर्‍यांना माहिती देऊन, जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिले. या आढावा बैठकीला मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पशुसंवर्धन अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.