शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
2
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
3
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
4
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
5
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
6
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
7
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
8
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
9
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
10
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
11
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
12
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
13
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
14
'या' मराठी अभिनेत्रीनं वर्षभर लपवून ठेवलं होतं स्वत:चं लग्न, कोणालाही लागला नाही पत्ता!
15
iPhone 17 सीरिजवर मोठी सवलत; आजपासून प्री-बुकिंग सुरू, जाणून घ्या डिटेल्स...
16
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
17
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
18
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
19
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
20
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?

टंचाई निवारणासाठी सज्ज व्हा!

By admin | Updated: July 6, 2014 00:45 IST

पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश

अकोला : मान्सून लांबल्याने जिल्ह्यातील पाणी आणि चाराटंचाई निवारणासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी पुढील तीन महिन्यांचा आराखडा तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अरुण शिंदे यांनी शनिवारी दिले. पाऊस लांबल्याच्या स्थितीत पर्यायी पेरणीसाठी जनजागृती करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. पावसाळा सुरू होऊन, महिनाभराचा कालावधी उलटून गेला; मात्र पावसाचा पत्ता नसल्याने जिल्ह्यातील खरीप पेरण्या खोळंबल्या आहेत. तसेच धरणांमधील जलसाठादेखील कमी होत असल्याने, पावसाअभावी जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. या पृष्ठभूमीवर आणखी काही दिवस पाऊस न आल्यास निर्माण होणार्‍या टंचाई परिस्थितीत करावयाच्या उपाययोजनांसदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयातील लोकशाही सभागृहात आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. येत्या १0 जुलैपर्यंत पाऊस न आल्यास तालुका स्तरावर बैठका घेऊन, तहसीलदार आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांनी पाणीटंचाई निवारणासाठी तहसीलदार आणि पंचायत समित्यांच्या गटविकास अधिकार्‍यांनी पुढील तीन महिन्यांचा उपाययोजनांचा आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकार्‍यांनी दिल्या. तसेच चाराटंचाईसंदर्भात माहिती घेऊन त्यासंदर्भात उपाययोजनांची कार्यवाही करण्याचेही त्यांनी सांगितले. यासोबतच वैरण विकास आणि भरड धान्य विकास कार्यक्रमांतर्गत चारा निर्मितीचे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे निर्देश तालुका कृषी अधिकार्‍यांना या बैठकीत देण्यात आले. पावसाअभावी जिल्ह्यात खोळंबलेल्या खरीप पेरण्या, धरणांमधील उपलब्ध जलसाठा, उपलब्ध चारा या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांनी आढावा घेतला. पावसाचा पत्ता नसल्याने आता मूग, उडीद ही खरीप पिके घेता येणार नाहीत. त्यामुळे २0 जुलैपर्यंत पाऊस आल्यास सोयाबीन, कपाशी, तूर व ज्वारी इत्यादी खरीप पिके घेता येतील, अशी माहिती कृषी विभागामार्फत या बैठकीत देण्यात आली. त्यानुषंगाने पाऊस आल्यास पर्यायी पीक पेरणीबाबत शेतकर्‍यांना माहिती देऊन, जनजागृती करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिले. या आढावा बैठकीला मनपा आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रमोद लहाळे, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता योगेश पाटील, अकोल्याचे उपविभागीय अधिकारी प्रा.संजय खडसे, जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता सुरेंद्र कोपूलवार यांच्यासह जिल्ह्यातील उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पशुसंवर्धन अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.