शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

लग्न करायचे; पण काेराेना नियमातच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2020 04:13 IST

अकाेला : कोरोना संकटामुळे गेल्या लग्नसराईमध्ये अनेकांचा हिरमाेड झाला मात्र आता काेराेना नियमांचे पालन करून लग्नाच्या बंधनात अडकण्यास सज्ज ...

अकाेला : कोरोना संकटामुळे गेल्या लग्नसराईमध्ये अनेकांचा हिरमाेड झाला मात्र आता काेराेना नियमांचे पालन करून लग्नाच्या बंधनात अडकण्यास सज्ज झाले आहेत. काेराेनामुळे अनेकांच्या कुटुंबांची आर्थिक आघाडीवर स्थिती बिकट झाली आहे. त्यात कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे जुळलेले विवाह सोहळे पटकन, मोजक्या लोकांच्या उपस्थितीत, मर्यादित स्वरूपात आटोपते घेतले जात असल्याचे चित्र आहे आप्तस्वकीयांच्या उपस्थितीत लग्न करण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते. काेराेनामुळे मात्र या इच्छेवर विरजण पडले आहे. यावर्षी कोरोना संसर्गामुळे श्रीमंत, गरीब, सामान्य व सर्वच कुटुंबांसाठी विवाह सोहळा मर्यादित स्वरूपातील अर्थात ५० जणांच्या उपस्थितीचेच उरले आहेत. त्यामुळे विवाहाचे आमंत्रण, पाहुण्यांसाठी राबणे, त्यांचे रुसवे-फुगवे दूर करणे आदी काही ठिकाणी मनोरंजक, तर काही कुटुंबांमध्ये त्रासदायक ठरणारा हा उपक्रम यंदा तरी बाद झाला आहे. विशेष म्हणजे, काही व्यवसायांवरही कोरोनामुळे आतापर्यंत प्रश्नचिन्ह उभे ठाकले आहेत. बिछायत केंद्र, कॅटरर्स संचालक, वाजंत्री मंडळी यांना परवानगी असली तरी त्यांच्यासकट ५० वऱ्हाडी कसे मोजायचे, हा प्रश्न उभा ठाकतो. त्यामुळे या अन्य छोट्या-मोठ्या व्यावसायिकांच्या उदरभरणावर यंदा कोरोनाने घाला घातला आहे.

तुळशी विवाहानंतर धामधूम वाढली

२६ नोव्हेंबरपासून तुळशी विवाहास प्रारंभ झाला. हा विवाह आटोपताच विवाहकार्य पार पाडण्याकडे विवाहेच्छुकांच्या कुटुंबीयांनी भर दिला आहे. मुलामुलींची पाहणी आटोपताच झटपट विवाह लावण्याचे बेत आखले जात आहेत. कोरोनामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य पार पाडले जात आहेत. विशेष म्हणजे, या विवाहांना खर्च जेमतेमच येत आहे.

सर्वाधिक मुहूर्त एप्रिल-मेमध्ये

२०२१ या नवीन वर्षात सर्वाधिक विवाह मुहूर्त एप्रिल व मे महिन्यात आहेत. एप्रिल महिन्यातील विवाहासाठी मुहूर्ताच्या तारखा २२, २४, २६. २७. २८. २९. ३० अशा अशा सात तारखा आहेत. मे महिन्यात १६ मुहूर्त आहेत. यात १. २, ७, ८, ९, १३, १४, २१, २२, २३, २४, २६, २८, २९ व ३० अशा तारखा आहेत. जिल्ह्यातील शेतीची पार्श्वभूमी असलेल्या कुटुंबांमध्ये याच सुमारास लग्नसराईची धूम राहणार आहे. काही कुटुंबांमध्ये तुळशी विवाहाआधीच मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत बार उडविण्यात आला.

निर्जंतुकीकरणावर भर

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंगल कार्यालयांमध्ये आयोजित सोहळ्यांमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग, परिसराचे निर्जंतुकीकरण, सॅनिटायझरचा वापर यावर भर दिला जात आहे. कोरोनामुळे हे छोटेखानी विवाह समारंभ आनंदायी ठरल्याच्या प्रतिक्रिया मिळत असल्याचे कार्यालयांच्या संचालकांनी सांगितले.