शहरं
Join us  
Trending Stories
1
Womens World Cup 2025 : W W W W..! श्रीलंकेच्या अटापट्टूनं शेवटच्या षटकात फिरवली मॅच! बांगलादेश स्पर्धेतून 'आउट'
2
उमेदवारी अर्ज दाखल करताच त्याच क्षणी २१ वर्ष जुन्या प्रकरणात RJD उमेदवाराला झाली अटक, कारण...
3
Asrani Death: 'अंग्रेजों के जमाने का जेलर' काळाच्या पडद्याआड; ज्येष्ठ अभिनेते असरानी यांचे निधन
4
अभिनेते असरानींची शेवटची पोस्ट, ७ दिवसांपूर्वी या अभिनेत्यासाठी इंस्टाग्रामवर लिहिले होते - "मिस यू..."
5
"आमदाराला कापा बोललो तर राग येतो, रोज शेतकरी मरतोय त्याचा राग का येत नाही?"; बच्चू कडू आक्रमक
6
चीनवर लावलेले १०० टक्के टॅरिफ अमेरिका कमी करणार?; ट्रम्प यांनी शी जिनपिंग यांच्यासमोर ठेवली अट
7
असरानी यांंचं महाराष्ट्राशी होतं विशेष नातं, वेळ मिळेल तेव्हा पुण्यात जाऊन करायचे 'ही' खास गोष्ट
8
'शोले'तील जेलरची भूमिका साकारण्यासाठी असरानींना हिटलरकडून कशी मिळालेली प्रेरणा? वाचा हा किस्सा
9
जवळच्या लोकांच्या उपस्थितीत असरानी यांच्यावर अंत्यसंस्कार, कुटुंबाने पूर्ण केली अभिनेत्याची 'ही' इच्छा
10
भारताचा 'छोटा पॅकेट' पुन्हा करणार 'बडा धमाका'! वैभव सूर्यवंशी आता 'या' स्पर्धेत खेळणार...
11
पुतिन-ट्रम्प यांच्या मोठी बैठक होणार; युक्रेनचे झेलेन्स्की म्हणतात- "मीही यायला तयार पण..."
12
ODI Cricket Record: चामारी अटापट्टूचा मोठा विक्रम; देशासाठी 'अशी' कामगिरी करणारी पहिलीच!
13
बिहारमध्ये महाआघाडीला आणखी एक धक्का, मित्रपक्षाची निवडणुकीतून माघार, आरजेडी- काँग्रेसवर केले गंभीर आरोप 
14
उपोषणकर्त्याला घरी का बोलवलं? संजय शिरसाट म्हणाले, "माझा आणि त्याचा प्रवासाचा वेळ सारखा होता"
15
"विरोधकांच्या ‘लवंग्या-सुरसुरी’चा धुरळा, महायुतीचा ‘ॲटम बॉम्ब’ फुटला की..."; एकनाथ शिंदेंचा इशारा
16
LPG घेऊन जाणाऱ्या जहाजावर भीषण स्फोट; 23 भारतीयांना वाचवले, 2 बेपत्ता
17
Kawasaki: कावासाकीनं लॉन्च केली खतरनाक बाइक; किंमत महिंद्रा थारपेक्षाही जास्त!
18
21 वर्षे जुन्या दरोडा प्रकरणात RJD उमेदवाराला अटक; अर्ज दाखल करताच पोलिसांनी घेतले ताब्यात
19
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामय्या यांच्या कार्यक्रमात १० जण पडले आजारी, समोर आलं असं कारण
20
पुतण्याच्या प्रेमात आंधळी झाली दोन मुलांची आई; पोलीस ठाण्यातच कापली हाताची नस!

तेल्हारा शहरात ३ रुपयांत मिळवा लाखो रुपयांची जागा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

शहराला अतिक्रमणाचा विळखा: नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त! प्रशांत विखे तेल्हारा: शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरात कोंडी निर्माण होत ...

शहराला अतिक्रमणाचा विळखा: नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त!

प्रशांत विखे

तेल्हारा: शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरात कोंडी निर्माण होत असून, रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे; मात्र याचाच फायदा घेत अतिक्रमणधारकांनी रस्त्यांवर टपऱ्या उभारण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे नगर परिषदेला प्रत्येकी ३ रुपये खोका उत्पन्न मिळणार असल्याने न.प.ची अतिक्रमणाला मूकसंमती आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात एकंदरीत ३ रुपयांत लाखो रुपयांची जागा मिळवा असाच प्रकार सुरू असून, अतिक्रमणामुळे शहर विद्रुप होत चालले आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.

शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून, गेल्या अनेक वर्षांपासून न. प.कडून दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. शहरात मालकी हक्काच्या दुकानांपेक्षा अतिक्रमणधारकांच्या दुकानांची संख्या जास्त आहे. शहरातील मोक्याच्या जागांवर अतिक्रमणधारक टपरी टाकत आहेत. शहरातील रस्त्यालगत मोकळ्या जागांवर अतिक्रमण केले असून, रस्त्याने चालणे कठीण होऊन बसले आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी किंवा नगरसेवक केवळ बघायची भूमिका घेत असल्याने शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे. अतिक्रमणधारकांकडून नगर परिषद रोज प्रत्येकी ३ रुपयांची पावती फाडून उत्पन्न घेत असल्याने नगर परिषदने या अतिक्रमणधारकांना वीज पुरवठा देण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याने एकप्रकारे संमती दिली असल्याचे दिसून येते. यापूर्वी नगर परिषदचे पदाधिकाऱ्यांसोबत अनेकदा चर्चा केली; मात्र यावर तोडगा निघाला नाही. शहरात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे. (फोटो)

----------------------------------------

सध्या प्राथमिकता कोरोनाला दिली जात आहे. कोरोनाचा उद्रेक थांबल्यानंतर अतिक्रमणधारकांवर कारवाई केल्या जाईल.

-गोपीचंद पवार, मुख्याधिकारी, न.प. तेल्हारा.

-------------------------------------------------------

सुरुवातीला कच्चे, नंतर पक्के अतिक्रमण

सुरुवातीला अतिक्रमण करताना ते हटविले जाण्याची शक्यता राहत असल्याने काही दिवस अतिक्रमणधारक साध्या झोपड्या उभातात. एखादी वर्ष प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पक्के बांधकाम केले जाते. याच माध्यमातून शहरात अतिक्रमण वाढत चालले आहे. पक्के बांधकाम झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सहजासहजी अतिक्रमण काढत नसल्याचा पक्का विश्वास येथील अतिक्रमणधारकांना अनुभवातून आला आहे. काही दिवसानंतर नगर पंचायत अतिक्रमणधारकांनाच वीज, पाणी यासारख्या सोयी-सुविधा पुरविते. त्यामुळे अतिक्रमण कायम होत चालले आहे.