शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

तेल्हारा शहरात ३ रुपयांत मिळवा लाखो रुपयांची जागा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

शहराला अतिक्रमणाचा विळखा: नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त! प्रशांत विखे तेल्हारा: शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरात कोंडी निर्माण होत ...

शहराला अतिक्रमणाचा विळखा: नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त!

प्रशांत विखे

तेल्हारा: शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरात कोंडी निर्माण होत असून, रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे; मात्र याचाच फायदा घेत अतिक्रमणधारकांनी रस्त्यांवर टपऱ्या उभारण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे नगर परिषदेला प्रत्येकी ३ रुपये खोका उत्पन्न मिळणार असल्याने न.प.ची अतिक्रमणाला मूकसंमती आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात एकंदरीत ३ रुपयांत लाखो रुपयांची जागा मिळवा असाच प्रकार सुरू असून, अतिक्रमणामुळे शहर विद्रुप होत चालले आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.

शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून, गेल्या अनेक वर्षांपासून न. प.कडून दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. शहरात मालकी हक्काच्या दुकानांपेक्षा अतिक्रमणधारकांच्या दुकानांची संख्या जास्त आहे. शहरातील मोक्याच्या जागांवर अतिक्रमणधारक टपरी टाकत आहेत. शहरातील रस्त्यालगत मोकळ्या जागांवर अतिक्रमण केले असून, रस्त्याने चालणे कठीण होऊन बसले आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी किंवा नगरसेवक केवळ बघायची भूमिका घेत असल्याने शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे. अतिक्रमणधारकांकडून नगर परिषद रोज प्रत्येकी ३ रुपयांची पावती फाडून उत्पन्न घेत असल्याने नगर परिषदने या अतिक्रमणधारकांना वीज पुरवठा देण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याने एकप्रकारे संमती दिली असल्याचे दिसून येते. यापूर्वी नगर परिषदचे पदाधिकाऱ्यांसोबत अनेकदा चर्चा केली; मात्र यावर तोडगा निघाला नाही. शहरात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे. (फोटो)

----------------------------------------

सध्या प्राथमिकता कोरोनाला दिली जात आहे. कोरोनाचा उद्रेक थांबल्यानंतर अतिक्रमणधारकांवर कारवाई केल्या जाईल.

-गोपीचंद पवार, मुख्याधिकारी, न.प. तेल्हारा.

-------------------------------------------------------

सुरुवातीला कच्चे, नंतर पक्के अतिक्रमण

सुरुवातीला अतिक्रमण करताना ते हटविले जाण्याची शक्यता राहत असल्याने काही दिवस अतिक्रमणधारक साध्या झोपड्या उभातात. एखादी वर्ष प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पक्के बांधकाम केले जाते. याच माध्यमातून शहरात अतिक्रमण वाढत चालले आहे. पक्के बांधकाम झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सहजासहजी अतिक्रमण काढत नसल्याचा पक्का विश्वास येथील अतिक्रमणधारकांना अनुभवातून आला आहे. काही दिवसानंतर नगर पंचायत अतिक्रमणधारकांनाच वीज, पाणी यासारख्या सोयी-सुविधा पुरविते. त्यामुळे अतिक्रमण कायम होत चालले आहे.