शहरं
Join us  
Trending Stories
1
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
2
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
3
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
4
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
5
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
6
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
7
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
8
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
9
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
10
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
11
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
12
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...
13
"राज ठाकरे साहेब, आपण..."; हकालपट्टीनंतर वैभव खेडेकरांनी सोडलं मौन, राणेंच्या भेटीबद्दल काय सांगितलं?
14
"गौतम एका ठिकाणी बसून ओरडत होता"; सिंहगड किल्ल्यावरून बेपत्ता झालेल्या तरुणाला पोलिसांनी कसं शोधलं?
15
"कुटुंबाला सांगू नका, लोकांकडून पैसे घेऊन अंत्यसंस्कार करा"; मनातील वेदना कागदावर लिहून तरुणाने संपवलं आयुष्य
16
Video: कार चालकाने अचानक दरवाजा उघडला; क्रिकेटर थेट धडकला, जागीच मृत्यू
17
याला म्हणतात परतावा...! 11403% ने वाढला हा स्टॉक, आता कंपनीला DRDO कडून मिळाली ₹3.36 कोटींची ऑर्डर, शेअरची किंमत 200 हून कमी!
18
मोबाइल हॅक झाला आहे का? हे संकेत ओळखा आणि लगेच पावलं उचला
19
अथर्व सुदामेवर टीकेचा भडीमार, असिम सरोदे मैदानात; म्हणाले, "राज ठाकरेंनी तुझं कौतुक केलंय, तू..."
20
"पप्पांनीच मम्मीला काठीने मारलं, पंख्याला लटकवलं..."; ३ वर्षांच्या लेकीने केली हत्येची पोलखोल

तेल्हारा शहरात ३ रुपयांत मिळवा लाखो रुपयांची जागा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:17 IST

शहराला अतिक्रमणाचा विळखा: नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त! प्रशांत विखे तेल्हारा: शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरात कोंडी निर्माण होत ...

शहराला अतिक्रमणाचा विळखा: नगरपालिकेचे दुर्लक्ष, नागरिक त्रस्त!

प्रशांत विखे

तेल्हारा: शहरातील मुख्य रस्त्यावर वाढलेल्या अतिक्रमणामुळे शहरात कोंडी निर्माण होत असून, रस्त्याने चालणेही कठीण झाले आहे. कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे; मात्र याचाच फायदा घेत अतिक्रमणधारकांनी रस्त्यांवर टपऱ्या उभारण्याचे काम सुरू केले आहे. यामुळे नगर परिषदेला प्रत्येकी ३ रुपये खोका उत्पन्न मिळणार असल्याने न.प.ची अतिक्रमणाला मूकसंमती आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शहरात एकंदरीत ३ रुपयांत लाखो रुपयांची जागा मिळवा असाच प्रकार सुरू असून, अतिक्रमणामुळे शहर विद्रुप होत चालले आहे. त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठांनी लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे.

शहराला अतिक्रमणाचा विळखा पडला असून, गेल्या अनेक वर्षांपासून न. प.कडून दखल घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. शहरात मालकी हक्काच्या दुकानांपेक्षा अतिक्रमणधारकांच्या दुकानांची संख्या जास्त आहे. शहरातील मोक्याच्या जागांवर अतिक्रमणधारक टपरी टाकत आहेत. शहरातील रस्त्यालगत मोकळ्या जागांवर अतिक्रमण केले असून, रस्त्याने चालणे कठीण होऊन बसले आहे. नगरपालिकेचे पदाधिकारी किंवा नगरसेवक केवळ बघायची भूमिका घेत असल्याने शहराचे विद्रुपीकरण सुरूच आहे. अतिक्रमणधारकांकडून नगर परिषद रोज प्रत्येकी ३ रुपयांची पावती फाडून उत्पन्न घेत असल्याने नगर परिषदने या अतिक्रमणधारकांना वीज पुरवठा देण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र दिले असल्याने एकप्रकारे संमती दिली असल्याचे दिसून येते. यापूर्वी नगर परिषदचे पदाधिकाऱ्यांसोबत अनेकदा चर्चा केली; मात्र यावर तोडगा निघाला नाही. शहरात मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण वाढल्याने पायी चालणेही कठीण झाले आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देऊन अतिक्रमण हटविण्याची मागणी होत आहे. (फोटो)

----------------------------------------

सध्या प्राथमिकता कोरोनाला दिली जात आहे. कोरोनाचा उद्रेक थांबल्यानंतर अतिक्रमणधारकांवर कारवाई केल्या जाईल.

-गोपीचंद पवार, मुख्याधिकारी, न.प. तेल्हारा.

-------------------------------------------------------

सुरुवातीला कच्चे, नंतर पक्के अतिक्रमण

सुरुवातीला अतिक्रमण करताना ते हटविले जाण्याची शक्यता राहत असल्याने काही दिवस अतिक्रमणधारक साध्या झोपड्या उभातात. एखादी वर्ष प्रशासन कोणतीही कारवाई करीत नसल्याचे लक्षात आल्यानंतर पक्के बांधकाम केले जाते. याच माध्यमातून शहरात अतिक्रमण वाढत चालले आहे. पक्के बांधकाम झाल्यानंतर प्रशासकीय यंत्रणा सहजासहजी अतिक्रमण काढत नसल्याचा पक्का विश्वास येथील अतिक्रमणधारकांना अनुभवातून आला आहे. काही दिवसानंतर नगर पंचायत अतिक्रमणधारकांनाच वीज, पाणी यासारख्या सोयी-सुविधा पुरविते. त्यामुळे अतिक्रमण कायम होत चालले आहे.