शहरं
Join us  
Trending Stories
1
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा
2
ऐकावं ते नवलच! नाव डॉग बाबू, वडील कुत्ता बाबू अन् आई कुटिया देवी; कुत्र्यासाठी बनवले रहिवासी प्रमाणपत्र
3
दक्षिण कोरियाने मैत्रीचा हात पुढे केला, किम जोंग यांची बहिण म्हणाली, "कोणताही रस नाही..."
4
दहशतवादी पहलगाममध्ये घुसलेच कसे? PoK का घेतले नाही? काँग्रेसचा सरकारवर हल्लाबोल
5
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
6
VIDEO: जाडेजा-स्टोक्समध्ये हात मिळवण्यावरून राडा, सामना संपल्यावर 'शेक-हँड' नाकारलं?
7
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
8
‘डान्सबारमध्ये नाचणाऱ्या मुली लाडक्या बहिणी नाहीत का? मुली नाचवणाऱ्यांना वाचवणे कोणत्या हिंदुत्वात बसते?’, काँग्रेसचा सवाल   
9
Thailand Shooting: थायलंडमध्ये भर बाजारात बेछूट गोळीबार, सहा जणांचा मृत्यू, हल्लेखोराने स्वत:वरही झाडली गोळी  
10
महालक्ष्मी योगात नागपंचमी: ८ राशींवर शिव-लक्ष्मी कृपा, अपार धन-धान्य-लाभ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
Mangalagauri 2025: मंगळागौरीचे सौभाग्यदायी व्रत कसे केले जाते? जाणून घ्या संपूर्ण पूजाविधी
12
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
13
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
14
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
15
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
16
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
17
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
18
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
19
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
20
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन

अकोल्यात ३ हजार ३00 वृक्षांचे ‘जिओ टॅगिंग’

By admin | Updated: July 2, 2016 02:10 IST

अकोला महापालिकेचा दावा;प्रशासनासह स्वयंसेवी संस्थांचा उत्स्फुर्त सहभाग.

अकोला:पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय असून त्याअनुषंगाने महापालिका क्षेत्रात वृक्षारोपणाची मोहिम राबवण्यात आली. प्रशासनाच्यावतीने शुक्रवारी शहराच्या विविध भागात ३ हजार ३00 वृक्षांची लागवड करण्यात आली असून ह्यजीपीएसह्ण प्रणालीद्वारे 'जिओ टॅगिंग'करून त्यांची नोंद घेण्यात आली.झाडांची बेसुमार कत्तल होत असल्याचे दुष्परिणाम समोर येत आहेत. जंगले नष्ट होत असतानाच त्यातुलनेत वृक्षारोपण होत नसल्याने पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे. ही बाब केंद्रासह राज्य शासनाने गंभीरतेने घेत १ जुलै ते ७ जुलै पर्यंंत वृक्ष लागवड मोहिम व्यापक प्रमाणात राबवण्याचे निर्देश प्रशासकीय यंत्रणांना दिले आहेत. महापालिका प्रशासनाने समाजसेवी संस्था, मनपा शाळांचे शिक्षक,कर्मचार्‍यांसह सर्वपक्षीय नगरसेवकांना वृक्षारोपण मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले होते. प्रशासनाच्या आवाहनाला उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाल्याचे शुक्रवारी शहरात पहावयास मिळाले. प्रशासनाने शहराच्या विविध भागात ५ हजार वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरवले होते. राजकीय पदाधिकारी,नगरसेवक, स्वयंसेवी संस्था, मनपा शिक्षकांना देण्यात आलेल्या प्रत्येक वृक्षाची ह्यजीपीएसह्णप्रणालीद्वारे ह्यजिओ टॅगिंगह्णकरून नोंद घेण्यात आल्याचा दावा प्रशासनाकडून होत आहे. ही नोंद संगणकीकृत करून छायाचित्रांसह त्याची माहिती शासनाच्या वेबसाईटवर ह्यअपलोडह्णकरण्याचे काम प्रशासकीय स्तरावर सुरु झाले आहे. आता वृक्ष जगवण्याचे आव्हानवृक्षारोपण केल्यानंतर त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी अकोलेकर या नात्याने सर्वांंवरच आहे. तरच वृक्ष लागवडीची मोहिम खर्‍या अर्थाने सार्थकी लागेल. यापूर्वीचा वृक्ष लागवडीचा अनुभव पाहता, केवळ तीन ते चार टक्के वृक्षांचे संगोपन होत असल्याचे दिसून येते.वृक्ष लागवडीची होणार तपासणीमहापालिकेने स्वयंसेवी संस्था, पालिका शिक्षकांसह नगरसेवकांना वाटप केलेल्या वृक्षांची लागवड केली किंवा नाही,याची तपासणी होणार आहे. तपासणीसाठी शासनस्तरावरून पथकाचे गठन केले जाणार असल्याची माहिती आहे.